आझाद हिंद सेना ८ - पूर्वेकडे प्रस्थान

नेताजींच्या आपल्या सेनेविषयी, आपल्या भावी स्वतंत्र राष्ट्राविषयी काही दृढ कल्पना होत्या. त्यांना स्वातंत्र्यप्राप्तीसाठी प्रसंगी असंगाशी संग करायचा कठोर निर्णय घ्यावा लागला तरीही त्यांनी आपली तत्त्वे सोडली नाहीत. आम्हाला तुमची मदत हवी आहे, आधिपत्य नको असे म्हणूनच ते हिटलरसारख्या सत्तांध हुकूमशहाला देखिल ठणकावून सांगू शकले. पुढे जपानच्या बरोबर उघडलेल्या संयुक्त मोहिमेतसुद्धा त्यांचा हा करारी बाणा आणि ताठ पवित्रा ठाम होता. आणि म्हणूनच त्यांनी अक्ष राष्ट्रांकडे आपल्या हंगामी सरकारला मदत करण्याची मागणी केली होती. आपल्या सैन्याला कुणी शत्रूच्या हातातील बाहुले बनलेली देशद्रोह्यांची फौज म्हणू नये यासाठीच त्यांनी आपले अस्तित्व वेगळे ठेवायची मुत्सद्देगिरी व ती तडीस नेण्याची हिंमत दाखवली. स्वतंत्र कचेरी, सेनेचा स्वतंत्र ध्वज, स्वतंत्र देशाचे राष्ट्रगीत, स्वतंत्र मानचिन्हे, इतकेच काय तर टपाल तिकिटे देखिल तयार करून घेतली. कर्ज म्हणून जर्मन चलनाच्या स्वरूपात अर्थसाहाय्य स्वीकारायचे व ते भारतीय चलनात परावर्तित करायचे आणि हिंदुस्थानातील कामगिरीसाठी वापरायचे अशी त्यांची योजना होती. हे कर्ज अर्थातच स्वातंत्र्य मिळाल्यावर परतफेडीच्या करारावर मागितले होते, मदत वा अनुदान म्हणून नव्हे. हिंदुस्थानी चलनानुसार दहा रुपयांच्या चलनी नोटा जर्मनीत छापून इकडे हिंदुस्थानात आणायचा प्रस्ताव त्यांनी मांडला होता. A H Insignia

`शहरी' श्रावणखुणा!!

आमच्या "शहरी' श्रावणखुणा!!
'क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनि ऊन पडे' ..."श्रावणा'च्या कवितेतल्या या ओळी सहजपणे आठवाव्यात, असा श्रावण सध्या इथेही, आमच्या शहरातही बरसतोय. पहाटेच्या निळ्याशार आकाशातल्या पूर्वेला तांबडं फुटत असतानाच अचानक माथ्यावरच्या आकाशावरला एखादा काळा ढग हातपाय पसरायला लागतो आणि बघताबघता चारी दिशा कवेत घेतो. पूर्वेची लाली पार काळवंडून जाते, आणि पहाटस्वप्नातून जागे हाऊन किलबिल करणाऱ्या चिमण्यापाखरांची पळापळ सुरू होते. सिमेंटच्या जंगलातल्या एखाद्या कोपऱ्याला पत्र्याच्या आडोशाखाली काडीकाडी जमवून बांधलेल्या घरातून बाहेर पडून आताआत्ता घुमायला लागलेली जंगली कबुतरं भेदरल्यागत फडफड करत बसतात, आणि बिल्डिंगच्या आडोश्‍याला विसावून मिटल्या डोळ्यांनी आकाशाकडे माना लावून बसतात. पिवल्या फुलांचा बहर ओसरलेल्या बाहव्याच्या एखाद्या फांदीवरच्या एखाद्या विस्कटलेल्या, अस्ताव्यस्त दिसणाऱ्या घरट्यातली कावळ्याची पिल्लं उगीचच कलकलाट करायला लागतात, आणि चहूबाजूंनी कावळ्यांचा एकच कल्ला सुरू होतो. बिचाऱ्या चिमण्या त्या कलकलाटातच कुठेतरी हरवून गेल्यासारख्या चिडीचिप होऊन पाऊस झेलायच्या तयारीत पंख फुगवून बदामाच्या झाडावरल्या एखाद्या रुंद पानाखाली आसरा घेऊन दडी मारतात, आणि काळवंडलेलं आकाश एकदम ओथंबल्यागत होऊन सरसरा जमिनीवर बरसायला लागतं... एक सणसणीत सर मिनिटभरासाठी कोसळते आणि घराघरातला पंख्याचा वेग काहीसा मंदावतो... दमट, घामेजलेल्या हवेला एक थंडशी शिरशिरी येते आणि जराकुठे गारगार वाटायला लागतंय, तोवर ती सर गडप होऊन पुन्हा उन्हाचे कवडसे घराच्या खिडक्‍यांमधून आत दाखल होतात. पुन्हा तोच घामट उकाडा सुरू होतो, आणि पंख्यांच्या वेग वाढतो... श्रावणसरींचं सुख अनुभवू म्हणताम्हणता त्या सरीच गायब होऊन जातात, आणि झाडाच्या पानांआड, पत्र्याच्या आडोशाने आणि काटक्‍यांच्या घरट्यात घाबरून बसलेली तमाम पाखरं पुन्हा पंख पसरून बाहेर पडतात. क्षणभराच्या काळोखीनं केलेली फजिती लपविण्यासाठी, जणू काहीच झालंच नाही, अशा थाटात पुन्हा चिमण्यांचा चिवचिवाट सुरू होतो. आपल्या कोवळ्या पिल्लांवर डाफरल्यागत आवाज काढत कावळीही पुन्हा पंख पसरते, आणि मानेभोवती चोची खुपसून उगीचच साफसफाई केल्याच्या ढोंगात कबुतरं बुडून जातात. एखादं कबुतर मस्तपैकी गिरकी मारून पुन्हा येऊन विसावतं आणि घुमतघुमत, सारंकाही "आलबेल' असल्याचा इशारा देतं... मग अवघी फौज आकाशात भरारी मारायला पंख पसरते... एक काळा ढगच जणू एखाद्या इमारतीच्या भिंतीआडून आकाशाकडे झेपावतो...

वीस लाख नाणी वाया गेलीत..?

              
                                  ’वीस लाख नाणी वाया गेलीत?’

कोकण: आनंदसण!!

उजाडायच्या आधीच आसपास असंख्य पाखरांच्या किलबिलीचं संगीत सुरु होतं आणि एखाद्या कोंबड्याची बांग त्यात ‘र्‍हिदम’ पेरते... गोठ्यातल्या गायी-म्हशीचं लांबलचक हंबरणं आणि घराच्या पडवीतला पाडसाचा प्रतिसाद आतुरतेचे सूर आळवतात... रेडिओवरची ‘मंगलप्रभात’ पहाटेचं वातावरण पवित्र करते आणि या भारावलेपणातच आपण अंथरुणावरून उठून बाहेर पडतो.. जांभ्या दगडांच्या ओबडधोबड तुकड्यांनी बांधलेल्या ‘गडग्यां’च्या मधल्या खाचखळग्यांच्या रस्त्यावरून चालताना, बांबूच्या बेड्यापलीकडल्या एखाद्या दुपाखी कौलारू घरातली जागती चाहूल सकाळ झाल्याची जाणीव करून देत असते...

सहल साजिरी!

१५ ऑगस्ट ची सकाळ! मित्रांना लघूसंदेशांद्वारे शुभेच्छा देत होतो. देशभक्तीपर गाणी ऐकू येत होती. प्रसन्न वातावरण होते. तितक्यात आनंदचा फोन आला. मढे घाट म्हणून एका निसर्गरम्य ठिकाणी जायचे का अशी विचारणा करण्यासाठी म्हणून त्याने फोन केला होता. त्याला ही कल्पना किरणने सुचवली होती. दै. सकाळच्या पुरवणीमध्ये या ठिकाणाविषयी लिहून आले होते. किरण आणि दीपक देखील येणार होते. दीपक, किरण, आनंद आणि मी असे आम्ही चौघे कराड अभियांत्रिकी महाविद्यालयात एकाच वर्गात होतो. इतकेच नव्हे तर वसतिगृहातदेखील आम्ही चारही वर्षे सोबत राहिलो. त्यानंतरही आजपर्यंत म्हणजे शिक्षण संपून सात वर्षे होऊन गेल्यावर देखील आमची मैत्री तितकीच घट्ट आहे. अगदी चौघांपैकी तिघे विवाहीत असून देखील! (दीपकचेही आत्ताच ठरले आहे; वाजेल आता लवकरच त्याचाही बँड! बिच्चारा!!) आमच्या तिघांच्याही बायका पुण्यात नव्हत्या. बऱ्याच दिवसांनी असे मनमुराद भटकायचा योग आला होता. ठरले! साडे नऊ वाजता आम्ही आनंदच्या गाडीतून हमरस्त्यावरून साताऱ्याच्या दिशेने निघालो. सुसाट वेग आणि जोडीला अमाप उत्साह! आम्हाला भेटून तसे बरेच दिवस झाले होते. आणि ते भेटणे ही कसले भेटणे? जास्तीत जास्त अर्धा-पाऊण तास आणि ते ही काहीतरी प्रसंगानिमित्त! थोडेफार जुजबी सगळ्यांशी बोलून सतत निघण्याची घाई! आज खूप निवांत वेळ होता, खूप उत्साह होता, कुठेतरी मस्त ठिकाणी फिरायला जाण्याची उत्सुकता होती, सगळे कसे उत्तम जुळून आले होते. गप्पा सुरू झाल्या. हसत-खिदळत आम्ही नवा कात्रज बोगदा पार केला. जवळच्याच पुलावरून जातांना निसर्गाने केलेली सौंदर्याची मुक्त उधळण आणि माणसाच्या अचाट बुद्धीमत्तेची आणि आकाक्षांची झेप यांचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळाला. साधारण एक किलोमीटर लांबीचा तो बोगदा बघून आम्ही मंत्रमुग्ध झालो. उंच डोगर पोखरून केलेली ती स्थापत्त्य अभियांत्रिकीची कमाल श्रेष्ठ की आजू-बाजूला असलेले नेत्रसुखद निसर्गाचे अनमोल सौंदर्य श्रेष्ठ असा विचार मनाला चाटून गेला.

झोपु संकुलातला स्वातंत्र्यदिनोत्सव

झोपु योजनेखाली बांधण्यात आलेल्या एका संकुलात अनेक प्रकारची घरे होती. झोपड्यामध्ये राहणाऱ्या मूळ रहिवाशांसाठी एकदीड खोल्यांचे गाळे बांधून उरलेल्या जागेत मध्यमवर्गीयांसाठी दोन किंवा तीन खोल्यांच्या सदनिका आणि श्रीमंत ग्राहकांसाठी आलीशान निवासस्थाने असलेल्या गगनचुंबी इमारती उभ्या केल्या होत्या. या वर्षी संकुलातील सगळ्या लोकांनी एकत्र येऊन स्वातंत्र्यदिनोत्सव साजरा करावा असे कांही उत्साही लोकांना वाटले. त्याचा कार्यक्रम ठरवण्यासाठी त्यांनी सगळ्या इमारतींमधील रहिवाशांच्या प्रतिनिधींची एक सभा घेतली.

अमेरिकायण! (भाग ३: न्यूयॉर्कशी भेट)

न्यूयॉर्क! जगातील मोठ्या शहरांचा राजा. पण माझ्यासाठी हे शहर फार विशेष ठरलं कारण या शहराचं असलेलं मुंबईशी साधर्म्य. मला इथे जागोजागी मुंबई भेटत गेली किंबहुना अजूनही भेटते. ज्याप्रमाणे मुंबई भारताची प्रदर्शिका (शोकेस) आहे त्याप्रमाणे न्यूयॉर्क जगाची प्रदर्शिका आहे. इथे साऱ्या रंगांचे, वंशाचे, देशांचे, हरतऱ्हेच्या संस्कृतीचे लोक आहेत. इथे लोकलची गर्दी आहे, धक्के खात होणारा प्रवास आहे, गाड्यांनी तुडुंब फुगलेले आणि तितकेच माणसांनी फुललेले रस्ते आहेत, छोट्या छोट्या गल्ल्या आहेत, तिथे खाण्याच्या गाड्या आहेत, चणे शेंगदाण्यापासून ते कपड्यांपर्यंत सगळं काही विकणारे फेरीवाले आहेत, रस्त्यांत खेळणारी पोरं आहेत; अगदी भिकारीसुद्धा आहेत.

`हरवलेला' श्रावण!

`हरवलेला' श्रावण!...

समधून उतरून रेल्वे स्टेशनातल्या फलाटावर पोहोचण्यासाठी रस्ता क्रॉस करायची वाट पाहात असतानाच अचानक पावसाची एक सर अंगावरनं सरसरत पुढे सरकली, आणि "श्रावणा'च्या जाणीवेनं मन क्षणभरासाठी सुखावून गेलं... मुंबईतल्या श्रावणाची छटा मुंबईवर आजूबाजूला उमटत नाही. श्रावणाचा पहिला दिवस काही फारसं वेगळं रूप घेऊन येतो, असं इथल्या सिमेंटच्या जंगलात आजवर कधी जाणवलेलंच नाही. नेहमीचाच दिवस, कामाची गडबड, ट्रेनची गर्दी, बसच्या रांगा आणि डबे-पिशव्या सावरत गाडी पकडण्यासाठीची धावपळ... बारा महिन्यांच्या या कसरतींनी श्रावणाच्या या सरीचं अवघं अप्रूप खरं म्हणजे कधीचंच धुवून टाकलेलं. पण आजच्या या अवचित सरीनं मात्र मन कधीकाळच्या "श्रावणभरल्या' आठवणींनी भिजून गेलं, आणि ओथंबतच ते कोकणातल्या हिरव्याकंच गावात पोहोचलं...

भारत अधुन मधुन माझा देश आहे

भारत माझा देश आहे? खरंच आहे का? असेल बहुदा.

आजच्या दिवशी म्हणे भारताला स्वतंत्र्य मिळालं. हं, स्वातंत्र्य. हे बाकी चांगलं झालं हं. म्हणजे काय की प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य हे हवंच. आत बघा आमची हयात गेली स्वातंत्र्य मिळवण्यात. म्हणजे लहान होतो तेव्हा अभ्यासापासून स्वातंत्र्य, थोडे मोठे झालो तसे पालकांच्या कटकटीपासून स्वातंत्र्य, मग वेगवेगळ्या गर्ल फ़्रेंड्स ना भेटताना ओळखीच्या माणसांच्या नजरांपासूनचे स्वातंत्र्य, लग्न करण्याचे स्वातंत्र्य, लग्नाआधी लग्नानंतरचे करायचे स्वातंत्र्य, आणि लग्नानंतर लग्नाआधीचे करायचे स्वातंत्र्य.

तिसरा वर्धापन दिन...

मनोगताच्या तिसऱ्या वर्धापन दिना निमित्य सर्व मनोगतींचे , प्रशासकांचे  आणि वाचकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.

केशवसुमार