मराठी माया - मराठी सिने-नाट्यसृष्टी संबंधीत वेबसाईट

मराठी सिने-नाट्यसृष्टीचा प्रचार आणि प्रसार  सार्‍या जगात व्हावा ह्या हेतूने आम्ही 'मराठी माया' ही वेबसाईट सुरू केली आहे. (http://www.marathimaya.com/)

मराठी सिने / नाट्य मनोरंजन संबंधीत माहीती, लेख, फोटो, व्हिडीओ ट्रेलर्स, आणखी बरेच काही ह्या संकेतस्थळावर मिळेल.

की मार्को बेटे (छायाचित्र)

काही महिन्यापूर्वी की वेस्ट चा दौरा केला होता. तेव्हा विमानातून जाताना एकदम अजब जमीन दिसली. इलेक्ट्रॉनिक सर्किट काढलेली जमीन. तिचा लगेचच फोटो काढला तो इथे डकवतो आहे.

गूगल अर्थ वर तब्बल २ तास शोध केल्यानंतर ही की मार्को बेटे असल्याचे दिसले. आहे की नाही जबरदस्त.

जगणे म्हणजे काय ?

माणसाने कसे जगावे,याबद्दल अनेकांनी उपयुक्त लिखाण केले आहे.त्यामध्ये संतांचे योगदान मोठे आहे.त्यांच्या उपदेशांप्रमाणे आचरण केले तर पूनर्जन्माचा फ़ेरा चुकेल,असे संतानी स्पष्टच सांगितले आहे.किमान चालू जन्म तरी सुखकारक जावा,असे बहुतेक सर्वाना वाटत असते.यादृष्टीकोनांतून विचार करु जाता,संत समर्थ रामदास यांच्या ''दासबोधा''तील तपशीलवार सुचना पुरेशा आहेत,असे म्हणता येईल.पण संतांचे उपदेश हे ,सारे करून सवरून झाल्यावर ,शेवटी भजन करण्यापुरते विचारांत घेण्याची परंपरा निर्माण झाली आहे.तसेच जीवनाकडे गांभीर्याने न बघता,''खा ,प्या ,मजा करा ''यावरच बहुतेकांचा भर आहे.यामुळे कांही महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष होऊन गेले आहे.पण एवढेच म्हणजे जगणे,नव्हेच ! तुमच्या घरावर प्रेम करणे याचा अर्थ घर सुंदर स्वछ असावे म्हणून तुम्ही प्रयत्नशील असायला हवे.ते बायकोवर किंवा फ़क्त नोकरांवर सोपवणे,पुरेसे नाही.तुम्ही ज्यागावात रहाता ,तेथील रस्ते,बागा,सार्वजणिक पाणी-व्यवस्था यामध्ये ही सहभाग घेवून या सर्व गोष्टी चांगल्याच रहातील यासाठी लक्ष दिले पाहिजे‌. समर्थ रामदास स्वामीनी दासबोधामध्ये जे तपशीलवार मार्गदर्शन केले आहे,त्यानुसार वैयक्तिक आचरण केले तर आपले वैयक्तिक व सार्वजणिक जीवन नक्कीच कृतार्थ झाल्याशिवाय रहाणार नाही.यासाठी प्रत्येकाने हे माझे ही कर्तव्य आहे,असे मानून इतर कोणीतरी करेल याची वाट पाहणे बंद केले पाहिजे.यातूनच जगण्याचा खरा अर्थ उमगेल.

एक मजेशीर वल्ली - अमेरीकेतील वास्तव्यात

मी अमेरिके मध्ये ह्या वेळेस आल्यावर मला एक अजब वल्ली भेटली. तसे मला नेहमीच विचित्रा माणसे भेटत गेली आहेत. प्रत्येक ट्रिप मध्ये तसे मला कुणी कुणी विशेष माणसे भेटत आली आहेत. कधी Airport वर तर कधी फ्लाईट मध्ये, कधी जिथे stop over असेल तिथे तर काही office मध्ये, कधी रेस्टोरेंट मध्ये, तसे आपण जर आपल्या आजूबाजूला नीट लक्षा देऊन बघितले तर आसे बरेच नमुने आपल्याला भेटतात, फक्त आपण लक्षा द्यावे लागते, तुमच्या आजू बाजूला लोक कसे राहत आहेत, कसे वावरत आहेत, कोण कसा बोलतो, कसा चालतो, हे जर तुम्ही नीट बघितले तर खूप मजा वाटते की लोक कसे वागतात, त्याच्या सवयी काय आहेत.

अमेरिकायण! (भाग५ : जर्सी सिटी, मुक्काम पोस्ट भारत)

आतापर्यंत 'जर्सी' ह्या शब्दाशी माझा परिचय फक्त जर्सी गायींविषयी शिकताना आला होता. (मी शेतकी इ. विषय शिकलो नसलो तरी सामान्य विज्ञान नावाच्या विषयात गर्भशास्त्रापासुन ते भूगर्भशास्त्रापर्यंत सारी स्थिरचर सृष्टी कोंबली असल्याने, 'जर्सी गाय' याविषयी मुंबईकरांना सामान्य (वि)ज्ञान असणं त्यांनी गरजेचं समजलं असावं). त्यामुळे की काय कोण जाणे, पण जर्सी सिटी हे नाव मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा उगाचच डोळ्यासमोर हिरवी गार कुरणं, टुमदार घरं, त्यात चरणारे घोडे / गायी (जर्सी) इ. चित्र डोळ्यांपुढे आलं होतं. पण इथे आल्यावर मला इतका वेगळा धक्का बसला, की केवळ रस्त्यावर गायी नाहीत म्हणून या शहराला अमेरिकेतील शहर म्हणायचं!

संत एकनाथ- साधकाची मनोवस्था

 काही दिवसा पुर्वी  शोकीन चित्रपटा वरचा लेख वाचला. कुणा वानप्रस्थाश्रमी ला अजुन्ही विषया ची इच्छा जात नसेल तरि त्यानी खालील वेराग्यपर श्लोक जरूर वाचावा. यात विषया वर नियंत्रण ठेवायाचा प्रयत्न करणार्या साधकाच्या मनात कसे युध्द चालते त्याचे सुरेख वर्णन आहे. संत एकनाथ चरणी नमस्कार करुन मनोगतीं साठी.....

ऐल सुखावे, पैल खुणावे...

ऐल सुखावे, पैल खुणावे...

(सदर लेखन ईसकाळ या संकेतस्थळावरुन उतरवलेले आहे)

आपण जिथं आहोत तिथंच असायला हवं होतं,
की जिथून आलो तिथं परत जायला हवं...

तसं मिंग्लिश येत नाही, पण तुम्ही हा महत्त्वाचा विषय मांडलात आणि म्हणूनच, मी पहिल्यांदा माझे मत लिहीतो आहे.
अमेरिकेत येऊन दोन वर्ष होत आली, त्यामानाने मी अजून कच्चा खिलाडीच आहे पण हळूहळू इथे स्थायिक होण्याचा विचार करत आहे. मनात भारताबद्दल खूप ओढ आहे, पण व्यवहार जेव्हा भावनांवर मात करतो, तेव्हा अमेरिका सोडवत नाही.
आता चोवीस वर्षांचा आहे. बौद्धिक कुवत असतानाही मला भारतात शिकण्यासाठी खूप कष्ट करावे लागले कारण मी श्रीमंत नव्हतो किंवा जातीने आरक्षित नव्हतो. त्यामुळे मला प्रत्येक वेळी तडजोड करावी लागली. माझ्या पुढच्या पिढीने अशा बुरसटलेल्या समाजात पहिला श्‍वासघ्यावा अशी इच्छा होत नाही. अमेरिकेत कोणाची आर्थिककुवत किती आहे किंवा तो कोणत्या जातीचा आहे, किंवा तोकोणा बड्या हस्तीचा मुलगा आहे हे न बघता तुमची बौद्धिककुवत आणि दुर्दम्य महत्त्वाकांक्षा यावर प्रगती होते. प्रत्येक ठिकाणी व्यवहाराच्या कागदपत्रांवर हे नमूद केलेले असते की हा व्यवहार जाती, वर्ण, आर्थिक परिस्थिती, लिंग, यापैकी कोणत्याही निकषांवर नसून समान नागरी हक्कांन्वये होत आहे. जेव्हा मी असे ऍग्रीमेंट वाचतो तेव्हा मला अमेरिकन नागरिक नसल्याचे दुःख होते. भारतात समान नागरी कायदा माझ्या हयातीत तरी होईल याची शाश्‍वती नाही.
अमेरिकेत मी अजून एक महत्त्वाची गोष्ट पाहिली ती ही की प्रत्येक जण, ज्या गोष्टींवर मानवाचे नियंत्रण असू शकत नाही अशा गोष्टींबाबत अतिशय आदर ठेवतो. उदाहरणार्थ निसर्ग, वेळ, वयोवृद्ध व्यक्ती आणि लहान मुले. भारतात या गोष्टींचे हसे होते. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून रोज तुम्ही याचा अनुभव घ्याल.
    बऱ्याच गोष्टी मिस करतो. पावसात चिंब भिजत खाल्लेली भजी, वडापाव विथ कट चहा, गणपती विसर्जनाच्या दिवशी बेधुंद होऊन केलेला नाच आणि रस्त्याच्या गाड्यावर खाल्लेली भेळ आणि पाणीपुरी. आजारी असताना डोक्‍यावर फिरणारा आईचा प्रेमाचा हात. जेव्हा हे आठवते, तेव्हा सगळी सुखे सोडून घरी जावेसे वाटते. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांना सोन्याची लंका नाही आवडली तेव्हा तुमच्या आमच्यासारख्यांची काय कथा. आता चिंता आहे ती फक्त नवीन पिढीची, ती पिढी हा जातीयवाद, गलिच्छ राजकारण आणि तडजोड करण्याची वृत्ती शिकेल की नाही किंवा या सगळ्याचा उद्रेक होऊन एक मोठी क्रांती होईल आणि नवीन, उज्ज्वल भारत उदयाला येईल.

शौकीन - तीन हिरवट म्हाताऱ्यांची कथा

Shaukeen DVD: Standard Edition

स्त्रीचे तारुण्य - यौवन म्हणा हवे तर - मर्यादित काळासाठी असते, पण पुरुष हा आयुष्यभर - निदान मनाने तरी - हिरवटच रहातो, अशा अर्थाची एक ग्राम्य म्हण आहे. पंचावन्न -साठीच्या आसपास घोटाळणाऱ्या पुरुषाची हीच व्यथा असते. आता सगळ्या जबाबदाऱ्या संपलेल्या असतात. लैकिकार्थाने निवृत्ती सुरू झालेली असते. गृहस्थाश्रम संपलेला आहे, पण वानप्रस्थाकडे बाकी काही केल्या पावले वळत नाहीत अशी सांजवेळेसारखी सैरभैर अवस्था असते. एकीकडे वैवाहिक आयुष्यात आजवर साथ देणारी सहधर्मचारिणी आता 'त्या'तून निवृत्त झालेली असते, तर दुसरीकडे शरीरात आणि मनात कसलीशी भूक अजूनही ढुसण्या देत असते. आसपास घोटाळणारे यौवन परतपरत खुणावत असते. प्रलोभनांकडे मन वळते तर आहे, पण किंचित अपराधी भावनेने. जोवर आपण बाजूला होत नाही तोवर हा तारुण्याचा प्रवाह पुढच्या पिढीकडे जाणार नाही, हे पटते तर आहे, पण... हा 'पण' फार मोठा आहे.'अचपळ मन माझे नावरे आवरीता...'
बासू चटर्जींच्या 'शौकीन' मधल्या तीन म्हाताऱ्यांची हीच कहाणी आहे. त्यांच्या आयुष्याची भरती ओसरली आहे, काहींचे संसार फुलले आहेत, काहींचे विझून गेले आहेत... पण एकंदरीतच उतार सुरु झाला आहे. स्कॉचच्या बाटल्यांच्या जागी आता होमिओपॅथीच्या गोळ्यांच्या बाटल्या आल्या आहेत.सिग्रेटींच्या पाकिटांच्या ठिकाणी मफलर आणि कानटोप्या आल्या आहेत. 'तसल्या' पुस्तकांच्या कप्प्यात आता (बायकोची) जपाची आणि स्तोत्रांची पुस्तके आली आहेत. पांढरे, पिकलेले केस आणि टकले, सुटलेली, ओघळलेली पोटे आणि चष्मे, 'वॉकिंग स्टिक्स' आणि औषधांच्या गोळ्या...पण मन? मन मात्र अद्याप कुठेतरी अतृप्त आहे. खरोखरच सगळे संपले आहे का? आयुष्य सार्थ झाले असेल कदाचित, पण ते संपूर्ण झाले का? शरीर सुखाने भरुन गेले आहे. पण ते काठोकाठ भरले आहे की कदाचित एखादा शेवटचा घोट?
मग ही अस्वस्थ अधिरता कुठूनकुठून डोकावत रहाते. काहीतरी उफाड्याचे दिसते आणि नजर तिथे चिकटून रहाते. एखादा अजाण स्पर्श होतो आणि मग हात तिथे रेंगाळलेलाच रहातो. कुणी 'काका', 'आजोबा' म्हणतं आणि या कारंज्यावर विरजण पडतं. मन हिरमुसून एवढंएवढं होऊन जातं. पण ते क्षणभरच. परत कुठेतरी एखाद्या पैंजणाची छुमछुम ऐकू येते  आणि मन मिटलेले डोळे उघडतं...
पुरुषाची ही चमत्कारिक अवस्था बासुदांनी 'शौकीन' मध्ये अचूक पकडली आहे. अशोककुमार, ए.के. हंगल आणि उत्पल दत्त हे ते तीन शौकीन म्हातारे. हंगलबाबू एका कंपनीत उच्च अधिकारपदी आहेत आणि आपल्या तरुण आणि सुंदर सेक्रेटरीपासून काहीशा वेगळ्या अपेक्षाही  बाळगून आहेत. उत्पल दत्त एका चाळीचे मालक आहेत आणि महिन्यातून एकदा भाडे वसूल करायला जाताना एकट्याच रहाणाऱ्या आपल्या भाडेकरु तरुणीकडून इतरही काही पदरात पडेल अशी उम्मीद बाळगून आहेत. अशोकदा सुखाचे निवृत्त आयुष्य जगताहेत आणि घरातल्या नवीन मोलकरिणीपासून रस्त्यावरुन जाणाऱ्यायेणाऱ्या पोरींपर्यंत सगळ्यांना चवीचवीने न्याहाळताहेत. जवानीच्या गावाला परत एकदा जाण्याची या तीघांची इच्छा तर आहे, पण ते धाडस काही होत नाही. 'क्या सब कुछ खत्म हो गया है?' हा प्रश्न तीघांनाही भेडसावतो आहे, पण त्याचे उत्तर मिळवण्याची काही हिंमत होत नाही. मग सगळे मिळून ठरवतात की चला एकदा सोक्षमोक्ष करुनच टाकू. पण इथे, या गावात नको. लांबवर फिरायला म्हणून जाऊ आणि जे उरलंसुरलं आहे ते सगळं उधळून टाकू...
अशी जिवाचे मुंबई करायला ते गोव्याला येतात. तेही त्यांना अकस्मात मिळालेल्या ड्रायव्हर मिथुन चक्रवर्तीच्या सांगण्यावरुन. मिथुनची मैत्रिण रती अग्निहोत्री गोव्यातल्या एका नाईटक्लबमध्ये गायिका आहे. तिच्याच बंगल्यात हे तीघे मुक्काम ठोकतात. रती स्वभावानं मोकळी आणि बिंधास आहे. या बुढ्ढ्यांना तिचा हा मोकळेपणा म्हणजे आमंत्रण वाटतं. मग ते ठरवतात की रोज दोघांनी मिथुनला घेऊन फिरायला जायचं, एकानं रतीबरोबर बंगल्यात थांबायचं आणि...
आणि काय? अहो, या जवानांचं मन भलेही असेल तरुण, पण शरीर? त्याचं काय? शरीर त्यांना त्यांच्या वयाची, त्यांच्या बुढाप्याची आठवण करुन देतं. आधी एकमेकांपुढं नाचक्की व्हायला नको म्हणून ते गड सर केल्याच्या बाता मारतात, पण शेवटी आपण काहीच करु शकलो नाही याची कबुली देतात. बिचारे शेवटी निसर्गापुढे आपली हार मान्य करतात आणि  रतीसमोर आपला खरा इरादा स्पष्ट झाला नाही यातच सगळं आलं असं मानून खालच्या मानेनं परत येतात. मग आपल्या हातून चुकून झालेल्या या पापाचं परिमार्जन म्हणून कुणी मिथुनला मुंबईत नोकरी देऊ करतं, कुणी या लवकरच लग्न करणाऱ्या जोडप्याला मुंबईतल्या आपल्या चाळीत जागा, तर कुणी आणखी काही...  
पुरुषी फणा ठेचला गेलेले हे म्हातारे आता आपापल्या घरी आले आहेत. पराभूत भावनेनं आणि आता आपण म्हातारे झालो हे मान्य करुन. पण जित्याची खोड अशी थोडीच जाणार?  काही दिवस गेले आणि हंगलबाबू पुन्हा एकदा आपल्या सेक्रेटरीशी गूळपीठ जमवण्याच्या नादात गुंतून गेले, दत्तसाहेब भाडेवसुलीला जाताना पुन्हा आपला पोशाख ठीकठाक करु लागले, अशोकदांना रस्त्यावरुन जाणारं काहीतरी रंगीबेरंगी दिसलं आणि त्यांनी जवळचा चष्मा काढून लांबचा चष्मा लावला...
असा हा हलकाफुलका, गमतीदार 'शौकीन'. जरा नाजूक विषयावरचा पण कमालीच्या संयमानं हाताळल्यानं कुठेही उतू न गेलेला. अशोककुमार, ए. के. हंगल आणि उत्पल दत्त यांच्या सहजसुंदर आणि नैसर्गिक अभिनयानं अधिकच मजेदार झालेला. संपूर्ण साहेबी 'एटिकेट' सांभाळणारे हंगलबाबू, काहीसे रांगडे, चिक्कू आणि कमालीचे अधिर असे दत्तसाहेब आणि मोहात अडकणारे पण आता आपण ती शिखरे ओलांडून पुढे आलो आहोत हे शहाणपण आलेले अशोकदा हे मिश्रण 'शौकीन' मध्ये फक्कड जमून गेलं आहे. अर्धीच सिग्रेट ओढायची हा निग्रह करुन अर्धी तोडून टाकताना हळूहळू तिच्या टोकाकडं सरकणारी बोटं, डाक बंगल्यात स्पेशल मसाजसाठी आलेल्या तरुणीला नाकारताना 'ये डर नही था की कुछ कर न बैठूं, बल्की ये की कुछ कर न पाउं' हा कबुलीजबाब आणि 'जिन चीजोंसे जिंदगी जिंदगी लगती है, डॉक्टर उन्हीं को मना कर देते है' हा चिरंतन संवाद यातून अशोककुमार कायम लक्षात रहातात. 'चलो हसीन गीत इक बनायें' हे रतीबरोबरचे गाणे गाताना त्यांची झालेली दमछाकही अशीच गमतीशीर. 'वही चल मेरे दिल' हे सुरेश वाडकरांचे गाणेही सुश्राव्य आहे. पण सगळ्यात जास्त लक्षात रहाते ते 'शौकीन' मधले आनंद बक्षींचे आर्डीनी संगीतबद्ध केलेले किशोरदांचे सुरेल आणि अर्थपूर्ण गाणे:
जब भी कोई कंगना बोले, पायल छनक जाये
सोयी सोयी दिल की धडकन, सुलग सुलग जाये
करूं जतन लाख मगर मन मचल मचल जाये
यातले 'जीवन से ये रस का बंधन तोडा नही जाये' हे अगदी पटते.   

सायकल चोर आणि उडती कासवे

मला चित्रपट बघण्याची हौस म्हणजे जबरदस्त. दर आठवड्या-पंधरवड्याला एक या दराने माझं चित्रपट बघणं व्हायचं. पुढे चित्रपटगृहांचे दर वाढले आणि आमचा हा दरही कमी झाला. अनेक पडद्यांवर अनेक चित्रपट एकावेळी दाखवून अनेकांकडून अनेकपटींनी जास्त पैसे घेण्याची शक्कल (की अक्कल?) चित्रपटगृहाच्या मालकांकडे आली आणि आमचा वेग मंदावला.
तसंही आतापर्यंत मराठी, हिंदी आणि इंग्रजी यांच्यापलीकडे चित्रपट बघण्याचा योग क्वचितच! (नाही म्हणायला "रोजा" एकदा व्हिडियो कोच बस मध्ये तमिळमधून--तमिळच होतं ना हो ते?-- पहिला होता. पण त्याआधी तो हिंदीतून पाहिला असल्याने कळला). पण आता इथे न्यूयॉर्कमध्ये आलो आणि पहिलं काम लायब्ररी शोधण्याचं केलं. एन.वाय.पी.एल. (न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररी) मध्ये गेलो. आणि तेथील ग्रंथसंपदा आणि विडियोंचा संग्रह बघून खात्री पटली आता फावल्या वेळेत काय हा प्रश्नच पडणं शक्यच नाही. वेगवेगळ्या भाषेतील पुस्तकं (अगदी मराठीसुद्धा), चित्रपट यांचा खजिनाच. आणि मुख्य म्हणजे हे सारं फुकट (हे खरं विशेष  !!). सुरवातीला माझे राहिलेले अनेक इंग्रजी चित्रपट पाहून घेतले. "सिंडरेला मॅन", "आइस एज", "मॅट्रिक्स३" इ. परवा लायब्ररीत गेलो तर कोणतीच खास डीव्हीडी दिसेना, तेव्हा सहज म्हणून (खरंतर काही हिंदी दिसतंय का) बघायला परभाषिक विभागात गेलो. तिथे इटालियन, फ्रेंच, चायनीज, जॅपनीज, कुर्दी, रशियन, जर्मन अश्या विविध भाषांमधील चित्रपटांचा खजिनाच होता. मी बघूया पाहून असा विचार केला, आणि, 'अवॉर्ड विनिंग' विभागातील एक इटालियन आणि एक कुर्दी अश्या दोन डीव्हीडी उचलल्या. त्या पाहिल्या आणि जाणवलं की आतापर्यंत मी एका छान दुनियेला मुकलो होतो.

ऐश्वर्याची मंगळागौर!

नवीन लग्न झालेल्या ललनांची पहिली मंगळागौर चांगलीच रंगात आलीये .. ऐश्वर्याच्या आईच्या आग्रहाखातर तिची मंगळागौर बच्चन मंडळींनी धुमधडाक्यात साजरी केली . या ' स्टार मंगळागौरी ' ला बॉलीवुडचं अवघं तारांगण अवतरलं , सोबत अमरचाचा होतेच . मग खेळ , फुगड्या , उखाणे यांनी जी धमाल आली , ती काय वर्णावी ... ?