चणे खावे लोखंडाचे ... तेव्हा मनुष्य वाचे??

चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे असे काही तरी वचन शाळेत मराठी अक्षरलेखनाच्या वहीत वाचले होते, त्याची मला आज आठवण झाली.

ब्रह्मपदी नाचायला लोखंडाचा उपयोग काय होईल ते जरी अद्याप कळलेले नसले तरी खाण्यात लोहाचे प्रमाण कमी असल्यास रक्तक्षय होतो हे आपल्याला माहित आहे. डब्ल्यू एच ओ च्या अंदाजाप्रमाणे जगातल्या पाच वर्षे किंवा कमी वयाच्या मुलांच्या जवळजवळ पंचमांश मुले, आणि सर्व स्त्रियांपैकी पंचमांश स्त्रिया अन्नात लोहाचे प्रमाण अत्यल्प असल्याने अनिमियाग्रस्त असतात. विकसनशील देशात ह्यामुळे सदोष प्रसूती, खालावलेली शालेय प्रगती, आणि रोडावलेली उत्पादकता अशा तऱ्हेने आरोग्य आणि अर्थव्यवस्था अशा दोन्ही प्रकारे हे महाग पडते. इंग्लंड सारख्या विकसित देशातही २१ टक्के मुली आणि महिला ह्याने प्रभावित आहेत असे म्हटले जाते.

सोयरा - ४

सोयरा ... 

परवा एकदा सोयराला फिरवायला घेऊन गेलो असताना सोसायटीतलं एक अनोळखी जोडपं समोर आलं. त्यांचा पहिला प्रश्न, "लॅब आहे ना?", दुसरा प्रश्न "किती महिन्यांची आहे", आणि लगेच तिसरा, "पॉटीची सवय लागली का?"

तिसऱ्या प्रश्नावरून यांना कुत्रा पाळण्याचा अनुभव आहे असं वाटलं आणि अंदाज खरा ठरला. "आम्हीही लॅबचंच पपी आणलं होतं, पण इतकं घाण करायचं घरात, की आमचा पेशन्स संपला. आम्ही देऊन टाकलं शेवटी त्याला." बाई हताशपणे म्हणाल्या. हेच उदाहरण नंतर अजून एकाकडून कानावर आलं. पण त्या सगळ्यांबद्दल सहानुभूतीच वाटली, कारण सोयराच्या पहिल्या दोन तीन महिन्यातली सत्वपरीक्षा आमच्याही मनात ताजी होती.

आवडतं काम?

यानंतर 

सोमवारी सकाळी ९ च्या आत ऑफिसामध्ये येऊन बसलेय. म्हटलं चला अजून एक प्रयत्न करून पाहावा, तुझ्यासारखं बनण्याचा. का? त्याचं एक कारण थोडीच आहे, पण मी तुझं कौतुक कशाला करू. :-) असो. तर बरेच दिवस तुला सांगावं म्हणत होते, अरे, तुला तो 'रॉड फार्मर' आठवतोय ना? आठवेलच म्हणा, रोज १०० मेल करून तू त्याला नको करून सोडलं होतंस.

अमेरिकायण! (भाग २: घर देता का कुणी घर..)

तर मी (एकदाचा) अमेरिकेत दाखल झालो.. आता पुढे काय? ऑफिसच्या गाडीने मला हॉटेलवर आणून सोडले होते. त्या बांगलादेशी टॅक्सीचालकाचे (माफ करा.. कॅबचालकाचे  ) मी टीप न घेतल्याबद्दल मनापासून आभार मानून हॉटेलच्या रूम मध्ये बसलो आणि दार लावून घेतलं!!

एक श्लोक

पुढे एक श्लोक देत आहे. कोणाला त्याचा कवी माहीत असेल तर कृपया कळवावे.

आला आला प्राणि जन्मास आला

झाला झाला वाढला थोर झाला

केला केला व्यापही सर्व केला

गेला गेला बापुडा व्यर्थ गेला.

गुरुजी.

मात्र रात्र - एक अप्रतिम नाट्यप्रयोग

गेल्या महिन्यात मात्र रात्र चा प्रयोग सुदर्शन रंगमंच, पुणे येथे सादर झाला होता, तेव्हापासून हे नाटक पाहायची खूप इच्छा होती. आणि ८ ऑगस्ट ला तो योग जुळून आला. आधीचे प्रयोग हाउसफूल्ल झाल्यामुळे तिकीट मिळेल की नाही याची धाकधूक मनात होतीच. त्यामुळे मी सुदर्शन पाशी थोड्या लवकरच पोहोचलो आणि सुदैवाने तिकीट मिळाले.
यापूर्वी मोहित टाकळकरचं "फ्रीज मध्ये ठेवलेले प्रेम" पाहिलं होतं. त्यामुळे एक दमदार नाट्यप्रयोग पाहायला मिळेल याची खात्री होती. नाट्यप्रयोग ठीक साडे सात वाजता चालू झाला आणि तिथून पुढे सव्वा तास सर्वच प्रेक्षक एका वेगळ्या जगात होते. एका शब्दात नाटकाबद्दल सांगायचं तर निव्वळ अप्रतिम.

मियाऽऽउं! (भाग-३ अंतिम)

चिमा्ने जन्म दिलेल्या दोन छाव्यांमुळे अगदी नवजात अर्भक ते पूर्ण वाढलेलं मांजर इथपर्यंतचा प्रवास आम्हाला खूप जवळून पाहता आला, अनुभवता आला. चिमाला मोजून दोनच पिल्ले झाल्याने त्यांना सांभाळणं तसंही अवघड नव्हतंच. (तेव्हा आम्ही पहिल्या मजल्यावर रहायचो. पण मांजरं बाळगण्याच्या दृष्टीने तळमजला असलेला सर्वात योग्य असं मला कायम वाटतं). 'इवली' या शब्दाला सर्वात समर्पक असं उदाहरण म्हणजे मांजरीची नवजात पिल्लं! खरोखर इतके छोटे जीव असतात ते! डोळेही मिटलेली ती नाजूक त्वचेची, चिमणीपेक्षा बारीक आवाजात म्यावम्याव करणारी नाजूक बाळें पाहून यांचेच पुढे इरसाल बोके किंवा लबाड मांजरी होतील असं अजिबात वाटत नाही!
आमच्याकडचे हे दोन चिरंजीव रंगारुपात जवळपास सारखे होते, काळे-पांढरे. सिनेमात कसा जुळ्या भावांमध्ये तीळ किंवा जन्मखूण असा एकच फरकाचा मुद्दा असतो तसा यांच्यातही एक फरक होता. त्यापैकी एकाच्या कपाळावर, डोळ्यांच्या मधोमध चांगला मोठ्या टिकलीएव्हढा काळा ठिपका होता. त्यामुळे आम्ही ठेवलेल्या नावाव्यतिरिक्त 'टिकलीवाला' हे विशेष बिरुद त्याला माझ्या आजोबांकडून मिळालं होतं. पुढे मोठं झाल्यावर दोघांचे स्वभाव, आवाज इतके भिन्न झाले की बोलून सोय नाही. या दोन सख्ख्या भावांचं नाव आम्ही 'चंगू मंगू' ठेवलं. कपाळावर टिकली असलेला मंगू आणि दुसरा चंगू.
जन्मत:च मांजरांचे डोळे मिटलेले असतात. अर्थात नंतर ते उघडतात पण तेव्हा ते गडद काळेच दिसतात. छोटे काळे मणी जणू. मोठे होऊ लागतात तसतसा त्यातला घारा अंश दिसू लागतो. या नवजात बालकांना हात लावायचा नाही अशी सक्त ताकीद मिळालेली असल्याने त्यांचं निरीक्षण करण्याव्यतिरिक्त फारसं काही करता यायचं नाही. तसंही या वयातील पिल्लांशी फारसं खेळताही येत नाही हेही खरंच कारण अजून तितकी मोठी ती झालेली नसतात. पण ही जोडी मोठी होऊ लागली तशी लुटुलुटु चालूही लागली. दिसेल तो पदार्थ हुंगुन खाण्यालायक आहे का ही सवय लागण्याचा हाच तो काळ. दुडदुडत त्यांनी त्यांच्या संचाराचा परीघ आधी टोपलीतच, टोपलीच्या बाहेरील परीसर, मग पूर्ण गॅलरी आणि मग पुढे अगदी घरभर असा क्रमाक्रमाने वाढवत नेला.  या वयातली पिल्लं निरागस मुलांसारखी निर्व्याज आणि अबोध वाटतात.  मोठेपणातले बिलंदर भाव चेहेर्‍यावर उगवायला अजून बराच अवकाश असतो ना!
सर्वत्र संचारी चंगूमंगूच्या लटक्या मारामार्‍या, पळापळी आणि लुटुपुटीची भांडणं वगैरे पाहून एकाऐवजी घरात दोन समवयीन मांजरे असल्याची मजा काही औरच असल्याचा साक्षात्कार झाला. तसंही एकच मांजर असलं तरी ते आपल्याशी किंवा आपण त्याच्याशी कसंही खेळू शकत असल्याने मजा ही येतेच पण दोन मांजरं असली तर आपण स्वत:ही खेळाडू बनण्यापेक्षा निरीक्षकाची भूमिकाच हळूहळू आपल्या अंगवळणी पडत जाते. कारण बहुतेक वेळेस दोन पिल्लं आपापसातच खेळत असतात. आपण एखादा खेळ सुरु करुन द्यायला निमित्त होतो इतकंच. पुढे फक्त ती गंमत अनुभवायची.
पण एकमेकांशी खेळून पोट भरलं की कधीकधी दोघं गुपचूप चोरपावलांनी मोर्चा आमच्याकडेही वळवायचे. वर्तमानपत्र पूर्णपणे जमिनीवर अंथरुन वाचायची सवय मला बराच काळ होती. मग आता ही वाचतेय तर आपल्याकडे लक्ष वेधून कसं घ्यायचं याची चांगली क्लृप्ती त्यांनी शोधून काढली होती. चंगूमहाराज सरळ मी वाचत असलेल्या बातमीवरच येऊन बसायचे! तसंच अभ्यास करायला चटई घालून बसलं की अभ्यास कसा न होईल या दृष्टिने अथक परिश्रम ही जोडगोळी करायची. लिहित असले तर हलणार्‍या पेन्सिलीवर डावल्याच मार, दप्तर जरा उघडं दिसलं की त्यात घूस, कंपासपेटीत तोंड घाल एक ना दोन!

दोघे जसजसे मोठे होत गेले तसतसा त्यांच्या आवाजात, अंगलटीत आणि स्वभावातदेखील फरक पडत गेला. चंगूचा आवाज तर काय सांगू! त्याच्या आवाजाने "चि. चंगू हल्ली दुपारी वरचेवर शेजारच्या बोक्याशी उंच स्वरात बोलत असल्याने आमच्या बाळूचा अभ्यासात अडथळा निर्माण होतो. बाळूचे सध्या दहावीचे वर्ष असल्याने या गोष्टीची त्वरीत दखल घ्यावी" अशाप्रकारच्या चिठ्या मिळतायत की काय अशी भिती वाटायला लागली. कारण चि. चंगूचा आवाज कर्कश्य, घोगरा, चिरका, फाटलेला की काय म्हणतात तसल्या प्रकारांत मोडायचा. पण त्याला हे कळलं होतं की काय माहित पण जरुरीशिवाय त्याने कधी आपला आवाज ऐकवला नाही. त्यामुळे सुदैवाने चिठ्याही आल्या नाहीत. पण एक आवाज सोडल्यास चंगू हे एक सडपातळ, हुशार, चपळ आणि स्मार्ट मांजर होते. अगदी त्याच्या भावाविरुद्ध.

आठ ते सोळा व सतरा ते चोवीस महिन्यांच्या मुलांची बौध्दिक वाढ

आठ ते सोळा व सतरा ते चोवीस महिन्यांच्या मुलांची बौध्दिक वाढ
वरील वयोगटातील मुलांची बौध्दिक वाढ व्हावी म्हणून कांही पालक डीवीडी/व्हिडिओ टेपस् यांचा वापर करतात.मंगळवार दि.७-८-०७च्या दि जर्नल
ऑफ़ पेडियाट्रिक मध्ये १००० कुटूंबांतील मुलांचा अभ्यास करून असा निष्कर्ष प्रसिध्द् केला आहे की,मुलांवर त्यांचा काही ही परिणाम होत नाही.

आव्हान

आयुष्यात काही वेळा आव्हाने पुढे उभी रहातात. अश्याच एका आव्हानाची कथा:

"हे ड्रॉइंग घ्या आणि काम सुरु करा. प्रायोगिक तत्त्वावर हे स्ट्रक्चर (सांगाडा) बनवुन पाठवायचे आहे. कामाचा अंदाज घेउन मला पुर्णत्वाची तारीख सांगा, जी २ महीन्याच्या आतील असली पाहीजे, काय ?" वरीष्ठ साहेब .

आझाद हिंद सेना ६ - जर्मनीत आगमन

नेताजींचे आयुष्य हा सर्वार्थाने आणि सातत्याने एक संघर्ष होता. नजरकैदेतुन इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन निसटलेले नेताजी प्रथम पेशावरला आले. तिथे अकबरमिया हजर होते. पेशावरात फार दिवस न काढता नेताजी मजल दरमजल करत अनेक हाल अपेष्टाना तोंड देत अखेर काबुलमध्ये पोहोचले. talwarत्यांच्या बरोबर भगतराम तलवार सावलीसारखा होता. रस्ता कितीही खडतर असला तरीही लवकरात लवकर त्यांना हिंदुस्थानची सरहद्द ओलांडायची होती, आपण ज्या कार्यासाठी देश सोडुन निघालो आहोत ते पूर्ण न होता शत्रूच्या हातात पडु नये यासाठी त्यांच्या जीवाची तगमग सुरू होती. अखेर एकदाचे काबुल गाठले. बर्फाने आच्छादलेले उजाड डोंगरसुद्धा त्यांना सुंदर भासत होते कारण ते इंग्रजांचे अंकित नव्हते. मात्र काबुलमध्ये पावला पावलावर धोका होता. प्रत्येक उतारुकडे संशयाने पाहिले जात होते. आपले अस्तित्व लपवण्यासाठी नेताजींना अत्यंत खबरदारी घ्यावी लागणार होती. अखेर भगतरामने आपल्या जुन्या   साथीदाराला साद घालायचे ठरवले. तो साथिदार म्हणजे उत्तमचंद मल्होत्रा. हुतात्मा भगतसिंहाच्या काळातच तुरुंगवास सोसून बाहेर पडलेला उत्तमचंद काबूलमध्ये स्थायिक झाला होता, त्याचे काचसामान व रेडिओ दुरुस्तीचे दुकान होते. काळाबरोबर माणसे व त्यांचे विचार व तत्त्वेही बदलतात हे कटु सत्य माहीत असलेल्या भगतरामने आधी चाचपणी केली. आपण एका हिंदुस्थानी क्रांतिकारकाला घेऊन आलो आहोत आणि तो लवकरच रशियाला जाणार आहे, तेव्हा आपल्याला त्याच्यासह आसरा देण्याची गळ घातली. उत्तमचंदाने गमतीत विचारले की तो क्रांतिकारक म्हणजे सुभाषचंद्र बोस तर नव्हेत? आणी ते तेच आहेत हे समजताच त्याने हात जोडून त्यांना घेऊन येण्याची विनंती केली व आपल्या घरात आसरा दिला व उत्तम आदरातिथ्य केले.