नाटाचे अभंग... भाग ३०

२९. आतां माझा नेणों परतों भाव । विसावोनि ठायीं ठेविला जीव ।
 सकळ लाभांचा हा ठाव । ऐसा वाव झाला चित्ताठायीं ॥१॥
 भांडवल गांठीं तरि विश्वास । झालों तें झालों निश्चयें दास ।
 न पाहें मागील ते वास । पुढती सोस सेवेचाचि ॥धृ॥
 आहे तें निवेदिलें सर्व । माझा मोडियेला गर्व ।
 अकाळीं काळ आघवें पर्व । झाला भरंवसा कृपें लाभाचा ॥३॥
 वेव्हारीं वेव्हारा अनंत । नाहीं यावांचूनि जाणत ।
 तरी हें समाधान चित्त । लाभहानी नाहीं येत अंतरा ॥४॥
 करूनि नातळों संसारा । अंग भिन्न राखिला पसारा ।

गल्लीत शेवटी राहणारी मुलगी

       मी अकरावीत गेलो आणि ती नववीत गेली. तिच्या आईची आणि माझ्या आईची तोंडओळख. माझ्या आईला पाककृतींचं पुस्तक परत करायला आली होती. तसं तिला अगदी लहानपणी पाहिलं होतं. त्यानंतर आताच पाहात होतो. तिला पाहून मला आमच्या अकरावीच्या वर्गातल्या मुली आठवल्या. जेव्हा मी वर्गात असतो आणि त्या मुलींना पाहतो तेव्हा मला ती आठवते. ती आमच्याच कॉलनीत राहते पण गल्लीत शेवटी.
        माझ्या एफ.वाय.च्या वर्षी एकदा मी बसस्टॉपवर उभा होतो. अकरावीचं कॉलेज संपवून घाईघाईत ती तिथे आली होती.