गृहिणी, सचिव, सखी एकांती

रूथ रेन्डेल ह्यांच्या "द क्लिंगिंग वुमन" ह्या कथेचा स्वैर अनुवाद

     शेजारील इमारतीच्या बाराव्या मजल्यावर सज्जाच्या कठड्याला एक मुलगी लटकली होती. तो नवव्या मजल्यावर राहत असल्यामुळे त्याला मान उंचावून पाहावे लागत होते. सकाळचे साडे-सहा वाजले होते. विमानाच्या आवाजाने त्याला जाग आली होती. डोळे चोळत निरभ्र निळ्या आकाशात विमान शोधताना ती त्याला दिसली.

एका रशियन गुप्तहेराची थरारकथा !!

पुस्तकः वर्ल्ड फेमस अडव्हेंचर्स
लेखकः अभय कुमार दुबे
आवृत्तीः 2008
प्रकरण 21: द सिक्रेट एजंट हू सेव्हड द वर्ल्ड
अनुवादः निमिष न. सोनार, धानोरी, पुणे

सोर्गी हा देशभक्त गुप्तहेर होता. केवळ पैसे आणि वलय यासाठी तो या क्षेत्रात आला नाही. तो देशभक्त होता आणि त्याची इच्छा नाझींचे निर्दालन करून रशियाला आणि जगाला त्यांच्यापासून वाचवणे ही होती. त्याने हे प्रत्यक्षात आणले ते अशी एक माहिती रशियाला पुरवून की जी हिटलर ची सद्दी संपवायला पुरेशी ठरली.  

सकारात्मक भाषा

मूळ ऑनलाईन छोटे पुस्तकः एक्झांपल्स ऑफ पॉझिटिव्ह लँग्वेज
स्रोतः इंटरनेट
अनुवाद : निमिष न. सोनार

प्रस्तावनाः

महात्मा गांधी एकदा म्हणाले होते  :
" शब्द नेहमी सकारात्मक ठेवा. शब्दानुसार आपली वागणूक बनते. आपली वागणूक, वर्तन सकारात्मक ठेवा कारण तेच आपल्या सवयी बनतात. आपल्या  सवयी सकारात्मक ठेवा कारण सवयी पुढे मूल्ये बनतात.   मूल्ये  आपलं  नशीब होतात.   जीवन चांगले जगण्यासाठी आपले नशीब सकारात्मक बनवा. त्यासाठी शब्द नेहमी सकारात्मक ठेवा  "

आणि मी यू.के. ला जाऊन आले....५

    पण आम्हाला पार्सलच घ्यायचे होते म्हणून मी निश्चिंत झाले. आम्ही हाक्का नूडल्स आणि राईसचे पार्सल घेऊन हॉटेलवर येऊन खाल्ले. 

    कधी मी माझ्या सहकाऱ्यांच्या घरीही जात असे. (ते जास्त दिवस राहणार असल्याने कंपनीने त्यांना रहायला एक घर दिले होते. ) कारण तेथे स्वयंपाकघर असल्याने आम्हाला हवे ते बनवून खाता येत असे. थालीपीठ, मूग डाळीची खिचडी, पोहे असे पदार्थ आम्ही बनवून खात असू. त्यातील अभिजीतला व मला चहा आवडत असल्याने तो मला चहा करून देत असे.
    पहिल्या आठवड्यात मी एके दिवशी अजेयबरोबर जाऊन यू. के.

ओदिशा - ५ : भुवनेश्वर परिसरातील मंदिरे

२०-११-२०११
सकाळी जाग आली तेव्हा कळले की आपण बसमध्ये आहोत. बाहेर फटफटले होते. घड्याळात पाहिले. जेमतेम पाच वाजत होते. आणखी पूर्वेला आलो होतो. पुढचे येणारे शहर कटक होते. बसवाल्यांकडे हॉटेल, वाहन वगैरेंची चौकशी केली. कटकपेक्षा भुवनेश्वर बरे पडेल असे एक प्रवासी म्हणाला. हॉटेले जास्त चांगली आणि रेलवे स्टेशनशेजारीच असलेल्या बसस्टॅंडवरून पुरी, कोणार्कला जायला सतत सिटी बसेस उपलब्ध. एक निघायच्या आत दुसरी हजर असते. एक तासात पुरी आणि अडीच तासात कोणार्क. सकाळी जाऊन काय पाहायचे ते पाहून हवे तर संध्याकाळी भुवनेश्वरला येऊ शकता. खाजगी गाड्यापण तिथे भरपूर. जास्त पर्याय उपलब्ध.