पशूदफनभूमी-अंत

'चिनू तू आम्हाला परत हवायस. कोणत्याही अवस्थेत परत आलास तरी आम्ही तुला प्रेमाने आपलं म्हणू....मला जग काय म्हणेल याची पर्वा नाही..


किर्र अंधार होता. सुहास खांद्यावर पोते घेऊन चालत होता. चढापाशी आल्यावर तो क्षणभर थबकला. त्याला गजाननरावांचे शब्द आठवले 'ती जमिन परत बोलावल्याशिवाय राहत नाही..' सुहासला वाटलं, 'कदाचित आपण चूक करतोय. चिनू परत आला तरी तो पूर्वीसारखा नसेल.' पण त्याच्या मनाने परत ग्वाही दिली, 'चिनू कसाही परत आला तरी तो आम्हाला आवडेल. चिनूच्या मृत्यूला मी जबाबदार होतो आणि सीमाला तिचा चिनू परतही मीच मिळवून देईन.' 

कौतुक करताना घ्यावयाची काळजी

आपण एखाद्याचे कौतुक करायला जातो. पण ते कौतुक होते की हिरमोड?


एखाद्या कवीला आपण म्हणतो 'तुमची शैली बालकवींसारखी आहे'. आपल्या हे लक्षातच येत नाही की असे करताना आपण त्या कवीच्या किंवा लेखकाच्या स्वतंत्र प्रतिभेवर अन्याय करत आहोत. कारण 'तुमची कविता वाचून अगदी बालकवी आठवले' म्हणजे 'त्यांनी जे आधीच लिहून ठेवले आहे तेच तुम्ही लिहिताय. त्यात नवीन काय?' म्हणजे कवीने एवढी मेहनत घेतली त्याचे काहीच नाही.

पशूदफनभूमी-४

चिनूचा लहानसा बूट फक्त रक्ताने माखून बेवारशासारखा सुहासच्या पुढे पडला होता..  


चिनूचा देह कापडात गुंडाळून ठेवला होता. सीमाची आई वडील बातमी ऐकून लगेच विमानाने आले होते. सीमाला अजूनही काही कळत नव्हतं. 'चिनू असा का झोपला आहे? सगळे का आले आहेत?' 
'सीमा, तू जाऊन जरा विश्रांती घे बरं. चिनू आता कधीच येणार नाही.पण आपल्याला पिंकीकडे बघून तरी सावरायला हवं.'
सीमाला एकदम सर्व आठवलं.. ट्रकचा आवाज, चिनूची किंकाळी..ती किंचाळली 'तूच मरु दिलंस आपल्या चिनूला! तू त्याच्याकडे लक्ष ठेवलं असतंस तर असं झालंच नसतं!'
गजाननरावांनी सीमाला समजावलं. ती रडत रडत ग्लानीत झोपली.
गजाननराव सुहासला म्हणाले, 'सीमाला कुठेतरी पाठव. ती हे सर्व नाही बघू शकणार.कुठेतरी गेली तर तिच्या डोक्यातून हे विचार हळूहळू का होईना, जातील.'

पशूदफनभूमी-३

सकाळी सुहास उठला तेव्हाही त्याचं अंग ठणकत होतं. ब्रश घेऊन तो बाथरुममध्ये गेला आणि.....


पिंकीचा लाडका मनू चकाकत्या डोळ्याने पाहत बेसिनवर बसला होता!!!


सुहासने डोळे चोळले. दुसरं एखादं मनूसारखंच दिसणारं मांजर? पण इतकं सारखं? आणि त्याच्या मानेवर मरताना मनूच्या मानेवर होती तशी जखमेची खूण. सुहास ब्रश घेऊन स्वयंपाकघरात गेला आणि तिथूनच ब्रश करुन दाराला कुलूप लावून बाहेर पडला.

परप्रांतीयांमुळे गुन्हे वाढतात का?

आजच ई-सकाळ मधल्या दोन बातम्या वाचल्या की 'खंडणी / अपहरण पुण्यातील गुन्हेगारीचा ट्रेंड' आणि 'मित्रानेच केले अपहरण व मागितली एक कोटीची खंडणी'


त्यात परप्रांतीयांचा प्रमुख सहभाग आहे असे म्हटले आहे. माझे तर मत असेच आहे की निश्चितच परप्रांतीयांमुळे गुन्ह्यात वाढ झालेली आहे (खास करून बिहार, दिल्ली, राजस्थान येथून आलेली मंडळी)

पशूदफनभूमी-२

'याला माझं नाव कसं कळलं?तो दफनभूमीबद्दल काय बडबडत होता? तो तसं खरंच बोलला की तो काहीतरी बरळला आणि मी माझ्या मनातले शब्द ऐकले?' सुहास विचारात पडला.


संध्याकाळी सुहास घरी आला तेव्हा तो खूप थकला होता. शरीरापेक्षाही मनाने जास्त. त्याच्या डोळ्यासमोर तो उमदा तरुण -(विकास भालेराव नाव होतं त्याचं असं त्याच्या प्रेयसीने सांगितलं.) मेला. त्याचं शव पंचनाम्यासाठी शहरात रवाना झालं.रजेनंतरच्या पहिल्याच दिवशी पूर्ण दिवस या भयाण सोपस्कारात गेला. सीमाशी बोलून जरा हलकं वाटलं. पिंकी चिनूशी खेळता खेळता झोपायची वेळ झालीच.   

पशूदफनभूमी-१

भर रणरणत्या दुपारी धुरळा उडवत गाडीने ब्रेक्स लावले आणि काहीश्या वैतागलेल्या अवस्थेतच सुहास, सीमा, पिंकी आणि छोटा चिनू आपल्या 'नवीन' घरासमोर थांबले. पिंकीचा लाडका बोका मनू मात्र त्या गोंधळातही शांतपणे तिच्या मांडीवर झोपला होता. 

नकळत सारे घडले ! (४)

संध्याकाळी रेवाला बराच वेळ तिष्ठत ठेवून तो आला....
भडकलेली रेवा काही बोलण्याच्या आतच त्याने अक्षरशः दोन्ही हात जोडून तिची माफी मागितली, "बाई गं, येथे रस्त्यात काही नको बोलूस, माझ्यावर तेव्हढी मेहरबानी कर !"
त्याचा तो अवतार पाहून हसावे की रडावे हे न कळलेल्या रेवाचा राग मात्र कुठल्या कुठे पळाला.
"मला हे सांगा, आपणांस ह्या सगळ्या गोष्टी माहीत कुठून झाल्या ?" खुर्चीत बसल्या बसल्याच तिने विचारले.
"स्त्रियांना धीर नाही धरवत का ?" मिश्किलपणे त्याने संभाषण तोडत तिला विचारले "मला एकाच व्यक्तीवर अवलंबून राहायचे नव्हते, तू जर 'मदत करीत नाही...ज्जा' असे सांगितले असतेस तर ?"
"अजून कोणाला पकडले आपण ?"
"काळजी करू नकोस, तो तुला ओळखतही नाही व वासंतीशी संबंधीतही नाही"....
हळूहळू रेवाने त्याला सगळी हकीकत सांगितली. मध्येच रेवाला एखादं दुसरा प्रश्न करीत तो ऐकत होता. तिचे बोलणे त्याने शांतपणे ऐकून घेतले होते....
शेवटी उठण्याच्या आधी रेवाचे टेबलवर आधारासाठी ठेवलेले दोन्ही हात त्याने अचानक हातात घेतले, "तू खरोखर आज मला जी मदत केली आहेस, मी जन्मभर विसरणार नाही."
एक सेकंदासाठी तो क्षण तसाच तेथेच थांबावा असे रेवाला वाटले.
"चल, तुला घरी सोडू ?"
"नको, मी जाईन बसने" रेवाला हो म्हणावेसे वाटत होते पण तिने स्वतःला सावरले.
बसस्टॉप वर बस येई पर्यंत दोघे गप्पा मारीत होते. बस आल्यावर तिला बसमध्ये चढवून तो निघाला तेंव्हा रेवा मागच्या काचेतून तो गेला त्याच दिशेकडे बघत होती......
कुठूनतरी घंटीचा तो मधुर किणकिणाट आपणांस का ऐकू येतो ते मात्र तिला कळत नव्हते.