ग्रॅन्ड कॅनियन सहल- घरी सुखरूप परत

घरी सुखरूप परत
               विमानतळावर आलो. गाडी परत केली. आमचे सामान चेक ईन केले. तिकिटे घेतली. सुरक्षा व्यवस्थेतून आम्ही आमच्या विमानथांब्यावर गेलो. 'परतीच्या प्रवासात आता आणखी कोणते अनुभव येतात' या विचाराने मन धास्तावले होते.

हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#५)

                      ॥
श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥    

अभंग # ५.
योगयागविधी येणे नोहें सिद्धी । वायाची उपाधि दंभधर्म ॥
भावेविण देव न कळे निःसंदेह । गुरूविण अनुभव कैसा कळे ॥
तपेंविण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेविण हित कोण सांगे ॥
ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात । साधूचे संगती तरणोपाय ॥

पाठभेदः कळे निःसंदेह=तुटे संदेह ,सांगात

ज्ञानदेवांनी हरिपाठ लिहिला आहे तो संसारात राहून भगवतप्राप्तीची इच्छा असलेल्या संसारी माणसांसाठीच. "असोनी संसारी जिव्हे वेगु करी" नामस्मरण केल्याने  "समाधी संजीवन"
प्राप्त करून घेता येते हे त्यांना सांगायचे आहे. ते स्वतः योगमार्गात
प्रवीण असावेत हे ज्ञानेश्वरीतील ६व्या अध्यायातून कळतेच. नव्हे! ते तर
"योगिराज"होते असे इतर संतांनी त्यांच्याबद्दल लिहिले आहे. योगमार्गातील
अडचणी त्यांना ठाऊक होत्या. संसारी माणसांना हा मार्ग सोयीचा नाही हे
त्यांना कळत होते. ज्ञानेश्वरीतील सहाव्या अध्यायात ते लिहितात,
"नाहीतरी योग । साधन जे होय ॥
सर्वही ते काय । अप्रमाण ॥
परी अभ्यासाची । गाठावया तड ॥
आपणासी जड । ऐसे म्हण ॥"
मनाच्या सामर्थ्याची त्यांना जाणही आहेच. म्हणून ते त्याच अध्यायात लिहितात,
"पार्था जरी होय । अंगी योगबळ ॥
त्यापुढे चपळ । मन किती ॥"
इतर संतांनीही सर्वसामान्य साधकाला बजाविले आहेच,
"योग मार्ग धरू नका ।कष्ट उरतील जे का ॥
कर्मधर्म नव्हती सांग । उण्या अंगे पतन ॥
अष्टांगयोग
साधनेत जी बाह्य अंगे आहेत ती म्हणजे यम ( अहिंसा,सत्य,अस्तेय,ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह),नियम(अंतर्बाह्य शुचिता,संतोष,तप,अभ्यास आणि परमेशपूजन), आसन ( सहज आणि स्थिर अशी बैठक),प्राणायाम ( प्राणवायूच्या गतीचे नियमन). हीच सर्वसामान्य संसारीजणांना करण्यास कठीण असतात. खरी आंतरिक साधना सुरू होते ती प्रत्याहार( इंद्रियांना त्यांच्या विषयातून परतवून चित्तरूपात त्यांची स्थापना करणे) पासून. हळूहळू धारणा,ध्यान आणि मग समाधि असा
हा प्रवास आहे.समाधीतून योग्याला काही शक्ती प्राप्त होतात. त्यांचा मोह
टाळणे अतिशय कठीण असते.त्यामुळे जगांत मोठेपणा येतो. पण ह्यापायी असे साधक
योगभ्रष्ट होतात. प्रसिद्धीचा परिणाम दंभधर्मात होऊन साधक शेवटी अधोगतीला
जातात.  याग म्हणजे यज्ञ. प्राचीन वेदग्रंथ आणि धर्मशास्त्रांत अनेक
यज्ञ सांगितले आहेत. त्यामधील कर्मकांड अतिशय गुंतागुंतीचे आणि खर्चिक
असते. बहुतेक यज्ञांचे ध्येय हे स्वर्गप्राप्ती हेच असते. पण पुण्यसंचय
संपला की त्याला परत यावेच लागते.ज्ञानेश्वरीत ज्ञानदेव लिहितात,
"स्वर्गात पुण्यात्मके पापे येईजे । पापात्मके पापे नरकात जाईजे ॥
मग माते जेणे पाविजे । ते 
शुद्ध पुण्य ॥"

पल्ली (डोसा चटणी)

वाढणी
४ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

फाउंटनहेड - कथा ६

टूहीच्या स्थापत्यशास्त्रावरील पुस्तकाने त्या विश्वात एकदम खळबळ माजवली. स्वतःला बुद्धीमान आणि विचारवंत म्हणवणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून वाचावं असं ह्या पुस्तकाबद्दल म्हटलं जाऊ लागलं. आणि अर्थातच स्वतःला (च) बुद्धीमान आणि विचारवंत म्हणवणारे समाजात पैशाला पायलीभर असतात, त्यांनी ह्या पुस्तकाला डोक्यावरच धरलं! काहीही कष्ट न करता, कोणत्याही ज्ञानाशिवाय केवळ पुस्तक वाचूनच अधिकारवाणीने बोलायची सोय अशा महाभागांची ह्या पुस्तकामुळे झाली. त्या पुस्तकाचा नुसता उल्लेख करून आपली महती वाढवणाऱ्यांत चढाओढच लागली. ख्यातनाम घरांच्या दिवाणखान्यांतून टूहीचं आणि स्थापत्यशास्त्राचं नाव जोडीनं घेतलं जाऊ लागलं.

आधुनिक म्हणी .

प्रत्येक भाषेत [बोलीभाषेतही] म्हणींचा वापर होत असतो. चालीरिती , स्वभाव, वस्तु इ. वरून खूप म्हणी  तयार झालेल्या आहेत. आता  एकविसाव्या शतकात आधुनिक राहणीमानानुसार नविन म्हणी तयार करा.   जसे ...


     १] अडला उमेदवार मतदारांचे पाय धरी. [अडला नारायण]

गाजराचे पराठे

वाढणी
दोन जणांना. या प्रमाणात साधारण आकाराचे ७-८ पराठे होतात.

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • २-३ गाजर किसून
  • २ वाट्या कणीक
  • १ टेबलस्पून डाळीचे पीठ
  • ४-५ हिरव्या मिरच्या, आले लसूण वाटून
  • १ टेबलस्पून जिरे किंवा धने-जिरे पावडर किंवा चिमूट्भर ओवा
  • मीठ चवीनुसार

मार्गदर्शन

कृतीः

किसलेले गाजर, कणीक, वाटण, मीठ असे सगळे जिन्नस एकत्र करावेत. पोळ्यांची कणिक ज्याप्रमाणे भिजवतो तशीच पण किंचितशी घट्ट भिजवावी.