प्रश्न?

आता वाचावं की लिहावं की झोपावं की मेल चेक करावे की चॅटिंग करावं की किचन साफं करावं की लॊंड्रिचे कपडे आवरावे? वाचायचं तरी काय? कथा की कादंबरी की साधना की वाचायची राहिलेली वर्तमानपत्रं की अभ्यासाचं काही? आवराआवरीच्या कामाचा एवढा कंटाळा का येतो? आणि संध्याकाळीच ऒफिसमधून निघताना मेल चेक करून झाल्यानंतर मधल्या वेळात आपल्याला कोण मेल करणार आहे? आणि चॅटिंगला सगळी दररोज भेटणारी मित्रमंडळी, वेगळं काय चॅट करणार? पण झोपलो तर मग लिहिणार कधी? आणि लिहायचं तरी काय? एवढी निरनिराळी पुस्तकं वाचून आणि चित्रविचित्र पिक्चर्स बघूनसुद्धा लिहायला काहीच का सुचत नाही? आयुष्यात काही वेगळं घडत नाही म्हणून का?

बिजवराच्या पत्नीच्या खुनाचे प्रकरण - भाग ४

"असं नाही बाई. तपशीलवार सांगा. " देवदत्तने फर्मावले.  

जीवनसाथींच्या नजरेतून साहित्यिकांचे अंतरंग (अंधारातील अक्षरे... भाग-१ )

(सुप्रसिद्ध पुस्तकांव्यतिरिक्त आणखीही पुस्तके प्रकाशित असतात पण ती प्रकाशात आलेली नसतात. त्यांचा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न... अंधारातील अक्षरे)

साहित्यिकांची नावे, त्यांचं जीवन, कारकीर्दीची माहिती, जीवनातील काही किस्से साहित्यावर लक्ष ठेवून असणा-या रसिकाला माहीत असतात. लेखनाची शैली, विचाराचा परिचय असतो. साहित्यिक स्वतंत्र व्यक्ती म्हणूनच डोळ्यांसमोर येतो. त्याच्या कुटुंबाचा विचार कदापिही मनात येत नाही. वस्तुतः, त्याच्या अर्ध्याअधिक साहित्यिक कारकीर्दीला त्याच्या कुटुंबाने व विशेषतः जीवनसाथीने जवळून पाहिलेले असते. वाचकाच्या हे लक्षातही येत नाही.

ती येत आहे

हो! हो!! ती येत आहे. अरे हो, पण ती कोण? असे वैतागू नका!! ती म्हणजे कोणी तारका नाही हो. पण एखाद्या नव तारकेच्या आगमना इतकीच अनेक तरुण तिची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर, ती आहे...... यामाहा एफ - १६. यामाहा इंडिया लिमिटेडचे नवीन उत्पादन, नवीन मोटर सायकल, नवी यामाहा एफ झेड - १६.


दही बटर

वाढणी

पाककृतीला लागणारा वेळ
10

जिन्नस

  • साखर, मीठ, लाल तिखट चूर्ण, भाजलेले जिरे-धणे भुकटी, चाट मसाला
  • बटर
  • दही

मार्गदर्शन

घट्ट दही प्रथम थोडेसे पाणी घालून नीट घुसळून घ्यावे. त्यात रुचीप्रमाणे साखर, मीठ, लाल तिखट चूर्ण, भाजलेले जिरे-धणे यांची भुकटी, चाट मसाला घालावे. पुन्हा थोडे एकजीव करावे.

माझा पहिला रेडिओ

       आजकाल अभियांत्रिकीचा निकाल लागताच लग्नाळू उमेदवाराकडे अडलेल्या वधूपित्याची रांग लागावी तशा  निरनिराळ्या कंपन्यांकडून इंजिनियर झालेल्या मुलाना मागण्या यायला लागतात. कधीकधी या कंपन्या अगोदरच महाविद्यालयात जाऊन मुलाखती घेऊन भावी इंजिनियरना नेमणुकीची पत्रेही देऊन टाकतात. पण आम्ही इंजिनियर झालो त्यावेळचा काळ असा नव्हता.  त्यामुळे आम्हालाच निरनिराळ्या दैनिकात येणाऱ्या छोट्या मोठ्या जाहिराती वाचून आपल्या  माहितीसह अर्ज टाकून वाट पाहत बसावे लागायचे.