वांगी बटाटा रस्सा

वाढणी
तीन/चार जणांना पोटभर

पाककृतीला लागणारा वेळ
60

जिन्नस

  • वांगी पाव किलो
  • बटाटे पाव किलो
  • कांदे अर्धा किलो
  • सुके खोबरे १०० ग्रॅम (२०० ग्रॅमपर्यंत चालेल)
  • लसूण एक मोठी गड्डी (दोन गड्ड्या चालतील)
  • तेल, फोडणीचे साहित्य, मीठ

मार्गदर्शन

वांगी व बटाटे स्वच्छ धुऊन घ्यावेत.

वांग्यांचे मध्यम काप (अर्ध्या पेराच्या आकाराचे) करून पाणी भरलेल्या पातेल्यात टाकावेत.

बटाट्यांचे (सालीसकट) मध्यम काप करून पाणी भरलेल्या पातेल्यात टाकावेत.

सागरगड

आम्ही एकदा  अलिबाग जवळच्या सागरगड नावाच्या किल्ल्यावर गेलो होतो. हा किल्ला पेठ, पेब सारखा चढावयास सोपा आणि फारसा प्रसिद्ध नसल्यामुळे अजून स्वच्छ सुद्धा आहे.

किल्ल्यावर अजून सुद्धा बालेकिल्ला, तटबंदी शाबूत असून पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था १२ ही महिने असते. तिथेच वांदरटोक हा कडा असून तेथून रायगड जिल्ह्याचे अत्यंत विलोभनीय दर्शन घडते.

"म्हणी' मॅटर्स!

बोलण्यात अनेकदा म्हणींचा वापर आपण करत असतो. लिहितानाही करतो. त्यांचा अर्थ काही वेळा आपल्याला पूर्णपणे कळलेला असतो, काही वेळा फक्त म्हण माहीत असते. म्हण ही अतिशय कमी आणि चपखल शब्दांत जास्तीत जास्त आशय व्यक्त करणारी असते. म्हण ही त्या-त्या भागाचं वैशिष्ट्यही असते. आमच्या कोकणात अनेक वैशिष्ट्यपूर्ण म्हणी आहेत. हा धागा सुरू करतोय, आपल्याला माहिती असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण म्हणी आणि त्यांचा अर्थ सागण्यासाठी.

विचार तर कराल...? (अंधारातील अक्षरे-भाग २)

    नरेंद्र दाभोलकर यांचे कार्यक्षेत्र महाराष्ट्राला 'सुपरिचित' आहे. अंधश्रध्दा निर्मूलनाचे त्यांचे कार्य मूलभूत स्वरूपाचे मानले जावे, असेच आहे. त्यांच्या चळवळींच्या केवळ कार्यक्रमांचीच माहिती समाजाला असते परंतु, त्यांनी या कार्यासंदर्भात काही पुस्तकेही लिहिली आहेत. मराठी साहित्याच्या दालनातील एक निश्चित जागा त्यांच्या पुस्तकांसाठी दिली जावी.