धुक्यातून उलगडणारे जी. ए. -५

जी. ए -  पूर्वग्रह - विसंगतींचे गाठोडे

'आपले पूर्वग्रह पूर्ण गाठी मारल्याप्रमाणे असंस्कृत आणि गावठी आहेत' या मताची जी. एं. नि आपल्या खाजगी लिखाणात मुक्तहस्ताने उधळण केली आहे. इतकी, की ते या मताचे आणि या मतातून निर्माण होणाऱ्या आपल्या प्रतिमेचे उदात्तीकरण करताहेत की काय अशी शंका यावी. मूकपणे, फार दुरून,   स्वतः झिजत भयंकर उच्च प्रेम करणाऱ्या शरदचंद्रांच्या नायिका त्यांना हास्यास्पद वाटत असत. पु. लं. च्या लिखाणाविषयी लिहिताना जी. एं. नि सुनीताबाई देशपांड्यांना एक आणि इतरांना भलतेच असे लिहिले आहे. यामागे 'सुनीताबाईंची निखळ, तीव्र वैचारिक मैत्री गमावू नये' असा एक रोख विचार असल्याचे काही लोकांचे मत आहे. पु. लं. च्या लिखाणाबाबत ' ते इतका गुलाल फेकतात की तो डोळ्यांत जातो' या मताशी आपण सहमत नाही असे ते लिहितात. इतरत्र बाकी त्यांनी पु. लं. चे लोकप्रिय होण्यासाठीचे लिहिणे, इन्स्टंट भारावून जाणे याविषयी असेच लिहिले आहे.

गॉड झिज मेट ऑन्स सुरीनाम (गॉड बी विथ अवर सुरीनाम)

(शिर्षक हे सुरीनाम नावाच्या देशाचे राष्ट्रगीत आहे. )

माझे लग्न ४ जानेवारी २००५ ला  होवून लगेचच ९ जानेवारी ला मी गिरीश बरोबर सुरीनाम नावाच्या देशात गेले. तेथील Suralco नावाच्या ऍल्युमिनिअम च्या  प्लॅंट मध्ये तेव्हा गिरीश च्या कंपनी चे ६ engineers प्रोजेक्ट साठी तिकडे गेले होते. त्यांच्यात गिरीश चाही समावेश होता.   त्यांच्यापैकी आणखी २ जणांची कुटुंबे देखिल होती. तिकडे जाण्यासाठी ५ जानेवारी ला आम्ही मॅरेज सर्टीफीकेट मिळवले आणि ६ तारखेला गिरीश च्या कंपनीत व्हिसा साठी डोक्युमेंटस देउन आलो. ८ तारखेला आमच्या हातात व्हिसा आला. आणि आम्ही ९ तारखेला निघालो सुद्धा. हे सगळे दिवस अतिशय गडबड चालू होती. त्याच्यात पॅकिंग ही होतेच. तरी नशिब आम्हाला मुंबई हून फ्लाईट न मिळाल्याने पुणे ते दिल्ली डोमेस्टीक आणि मग पुढे इंटरनॅशनल फ्लाईटनी आम्ही ऍमस्टरडॅम ला गेलो. आणि मग तिथून पुढे सुरीनाम ला गेलो. त्यामुळे मुंबई ला आम्हाला जावे लागले नाही. तरी पण गिरीश ला इंटरनॅशनल ड्राइव्हर्स परमिट घेण्यासाठी १ दिवस मुंबई ला जावे लागले. जाताना दिल्ली एअरपोर्ट वर आमची बरीच चौकशी केली. कारण सुरीनाम ला जाणारे लोक नसतील च जवळपास. दिल्ली डोमेस्टीक एअरपोर्ट ते दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट तसे अंतर बरेच आहे. पण आमची जाण्याची सोय जेट एअरवेजनीच केल्याने सगळे सुरळीत पार पडले.
सुरीनाम हा देश दक्षिण अमेरिका खंडात ब्राझिल च्या उत्तर दिशेला आणि ब्रिटीश गयाना, फ्रेंच गयाना च्या मध्ये वसलेला आहे. ह्या देशाची राजधानी पारामारिबो आहे. तिकडे जाण्याच्या आधी मला ह्या देशाबद्दल काहीच माहिती नव्हती. तसेच कोणी ह्या देशात गेल्याचे ऐकिवात ही नव्हते. म्हणून मग मीच लग्नाच्या आधिपासूनच इंटरनेट च्या सहाय्याने आणि गिरीश च्या अनुभवांवरून माहिती मिळवायला सुरुवात केली होती.
ह्या देशाचे हवामान दमट आणि उष्ण आहे. पाउस पण बराच पडतो. राष्ट्रभाषा टोंगो म्हणून आहे. डच भाषेशी  बऱ्यापैकी साम्य आहे. बोलली जाणारी भाषा ताकीताकी आहे. देश लहान आहे. क्षेत्रफळ १६३, ८२० km² आहे. भात आणि केळी यांची शेती केली जाते. लोकसंख्या सुमारे   ४४०, ०००  आहे. तेथील रहिवासी सुरिनामी, हिंदुस्तानी, चायनीज आणि जावानीज़ आहेत. १८ व्या शतकात ब्रिटिश लोकांनी उत्तर भारतीयांना  (बिहारी लोकान्ना) सुरीनाम मध्ये bauxite च्या खाणीन्मध्ये काम करण्यासाठी नेले होते. हेच ते तेथील हिंदुस्तानी लोक. हे लोक हिंदी भाषा बोलतात. पण त्यांची हिंदी तशी खूप च जुनी असल्याने समजून घ्यावी लागते. आपले हिंदी चित्रपट आणि बॉलिवूड सुरीनामीन्मध्ये लोकप्रिय आहे. आम्ही पुण्याचे (मुंबई हून फक्त ३ तासान्वर आहे) असे म्हणालो की लगेच तिकडचे लोक विचारायचे की तुम्हाला अमिताभ बच्चन रस्त्यात दिसतो का? बोलतो का लोकान्शी?
हा देश विकसित नाहीये अशी कल्पना गिरीश नि आधीच मला दिल्याने ह्या देशाबद्दल माझ्या मनात खेडेगावासारखा अशीच प्रतिमा होती. परंतु एअरपोर्ट वरून घरी जाताना मला दिसले ते खड्डे नसलेले रस्ते आणि ट्रॅफिक चे नियम पाळणारे लोक. तिथे दुचाकी गाड्या कमी आणि चारचाकी गाड्या जास्ती आहेत. सगळे सिग्नल पाळत होते. हॉर्न वाजवत नव्हते.
तिकडे पोचल्यावर  गिरीश च्या ग्रुप कडून आमचे खूप च जंगी स्वागत झाले. आमच्यासाठी एकाच्या घरी डिनर पार्टी होती. ग्रुप मधले सगळेच खूप co-operative होते. आमचे घर म्हणजे संदीप, तृप्ती बरोबर चे ट्वीन बंगल्यातले शेयर केलेले घर होते. तृप्ती पण स्वभावानी चांगली असल्याने मी तिकडे लगेचच set  झाले. पण २ऱ्या दिवशी सकाळी ६ ला गिरीश ऑफिस ला जायला निघाला. त्या दिवशी मलाही जेटलॅग होताच म्हणून गिरीश नि डबा नेलाच नाही. मी उशिरा उठून मग unpack केले. घर ही लावत होते.   आणि अधून मधून झोपत ही होते. प्लॅंट घरापासून सुमारे ४५ मिनिटे अंतरावर असल्याने आणि काम ही खूप असल्याने गिरीश खूप च उशिरा घरी यायचा. तृप्ती पण प्लॅंट वर जायची म्हणून त्या दिवशी अक्ख्या बंगल्यात मी १ टी च होते. आणि मी झोपलेली असताना अचानक जोरजोरात आवाज यायला लागला.

चतुराई

ch5a

चतुर. एक साधा किटक. पण थेट काही दशके मागे नेणारा. शाळेतले दिवस आठवायला लावणारा. फुलपाखरे, टाचण्या आणि चतुर हे विशेष कुतुहलाचे विषय. काही मुले फुलपाखरे पकडायची व बाटलीत ठेवायची. मग ती मेल्यावर पंख पुस्तकात घालायचे! हा प्रकार मला कधीच आवडला नाही. त्या काळी प्रकाशचित्रणाचा नाद नव्हता आणि अक्कलही नव्हती (अजुनही नाहिये म्हणा; पण हातात क्यामेरा तर आहे? )

एक हट्टी `देशप्रेमी'

... तरीही 'भारतकुमार' विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तो पुन्हा कपाटातल्या 'ओम शांती ओम'च्या सीडीपाशी गेला. सीडी काढून त्यानं खिशात टाकली अन थेट न्यायालयाचा रस्ता धरला. विक्रमादित्य चालत असताना सीडीतून शाहरुख नावाचा वेताळ बाहेर आला.
"काय रे मिळतं तुला बॉलिवूडच्या बादशहाला त्रास देऊन? प्रसिद्धी? " वेताळानं विचारलं.
विक्रमानं चेहऱ्यावरचा हात हलकेसे बाजूला केला.
वेताळ आणखी कावला. म्हणाला, "बरं, असो. एक गोष्ट ऐक! आटपाट नगराचा एक राजा होता. तो काही राजघराण्यात जन्मला नव्हता. 'काहीतरी मिळविण्यासाठी काहीतरी गमावावं लागतं, ' हे तत्त्व त्यानं स्वीकारलं आणि त्याला यशाचा राजमार्ग सापडला. नंतर तो स्वतःच एक 'ब्रॅंड' झाला. 'बाजीगर'चा 'किंग' झाला. एकदा 'किंग'नं स्वतः एक मोठा प्रकल्प हाती घेतला. त्यात तो स्वतः तर सहभागी होताच, पण देशातल्या सगळ्या राजांना घेतलं. देशप्रेमात बुडालेल्या एके काळच्या एका राजाला मात्र त्यानं अजिबात घेतलं नाही. उलट, आपल्या प्रकल्पात त्याची टवाळीच उडवली. त्या राजाला आपल्या 'राष्ट्रभक्ती'चा हा अपमान वाटला. असं करताना, स्वतःच्या काही प्रकल्पांत चांगल्याचुंगल्या 'राण्यां'ना वाईट वाईट दृश्यं करायला लावून त्यानं स्वतःच देशाची संस्कृती धुळीला मिळवली होती, याचा त्या राजाला स्वतःलाच विसर पडला होता... आता मला सांग विक्रमा, त्या 'किंग'चं काय चुकलं? तू जर बरोबर उत्तर दिलं नाहीस, तर तुझ्या डोक्याची शंभर शकलं होतील. "
विक्रमानं थोडा वेळ विचार केला. मग तो म्हणाला, "किंग'चं एवढंच चुकलं, की त्या राजाचं आधीचं कर्तृत्व लक्षात घेऊन त्याला मान द्यायला हवा होता. पण 'किंग'नं स्वतःच त्याची नक्कल केली. आणि जो स्वतःच दुसऱ्याची नक्कल कायम करत आला आहे, त्याची नक्कल होऊच शकत नाही! "
"शाब्बास! विक्रमा, कधी नव्हे ते खरं बोललास! पण तू बोललास, आणि आपलं वचन मोडलंस. आता मी चाललो. पण एक लक्षात ठेव. तू नकलेच्या दृश्यांवर बंदी आणलीस, ती सगळ्या लोकांच्या घराघरात ती नक्कल पोचल्यानंतर! आता फक्त किरकोळ ठिकाणचं प्रदर्शन तू रोखू शकतोस. घराघरात पोचलेल्या सीडींचं काय करशील? "
वेताळ पुन्हा सीडीमध्ये गेला आणि चार बोटांनी चेहरा झाकून आणि दुसऱ्या हाताची घडी घालून विक्रमादित्य पुन्हा विचारात पडला...

देसी अभियांत्रिकी

१) माझ्या सीपीयू मध्ये जर चुकून सीडी ठेवायची विसरले आणि सीडी प्लेयरचा खाचा (स्लॉट) रिकामा राहिला तर तो इजेक्ट बटन दाबला तरी बाहेर येत नाही. तो सहज बाहेर यावा ह्यासाठी माझ्या हार्डवेयर अभियंत्याने अगदी सोपी युक्ती सांगितली आहे. प्रत्येक सीडी ड्राईव्हवर इजेक्ट बटनाशेजारी एक उघडझाप करणारा छोटा दिवा असतो. त्या दिव्याच्यावर एक बारीक भोक असते. त्या बारीक भोकात सहज जाईल अशी पण टाचणीपेक्षा जरा जाड तार घालायची आणि तिच्या टोकाला किंचित दाब द्यायचा आणि त्याच वेळी इजेक्ट बटन दाबत राहायचे. ती तार हळू हळू आत जाते आणि सीडी खाचा बाहेर येतो.

रशिया-जॉर्जिया युद्धातील विरोधाभास

रशिया आणि जॉर्जियातील युद्ध आज थांबले आहे. पण जसे हे युद्ध सुरू झाले तसेच या युद्धातील विरोधाभास स्पष्टपणे दिसून येऊ लागला. मुळात रशियातील जे परदेशी नागरिक व इंग्रजी भाषा समजणारे व आंतरराष्ट्रीय मिडियाचे दर्शक असणारे रशियन नागरिक यांना तर या युद्धाने एकदमच confuse करून टाकले. त्यामुळे युद्ध सुरू करण्यात हात नक्की कुणाचा होता हे अजूनही येथे स्पष्ट झालेले नाही. आंतरराष्ट्रीय मीडिया म्हणजे सीएनएन, बीबीसी पुर्णपणे जॉर्जियाच्या बाजूने बातम्या देत होता व रशियन मीडिया त्याच्या बरोबर विरुद्ध बातम्या देत होता.

प्रवास (२)

सकाळ. ११. ३०.
आटपाडीहून करगणीकडे आम्ही निघतो. मुख्य रस्त्यावरचंच हे गाव. पण आम्हाला मुख्य रस्त्यावरून जवळच्या एका वाडीवर जायचं असतं. तिथं डाळिंब उत्पादकांची एक कार्यशाळा सुरू आहे. त्याच ठिकाणी लोकांशी अधिक उपयुक्त चर्चा होऊ शकते यासाठी.

ओल्या नारळाची चटणी

वाढणी
२ जण

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • अडीच वाट्या ओल्या नारळाचा खव,
  • चिरलेली कोथिंबीर २-३ चमचे,
  • हिरव्यागार मिरच्या २-३
  • अर्ध्या लिंबाचा रस
  • मीठ, साखर अर्धा चमचा

मार्गदर्शन

हौतात्म्याची शताब्दी आणि अजरामर हौतात्म्यगीत

हिंदुस्थानातील १८५७ साली भडकलेला क्रांतिचा वणवा शमला कि काय असे वाटत असतानाच विसावे शतक सुरू झाले आणि भारतमातेला मुक्त करण्यासाठी हिदुंस्थानातील क्रांतिकारकांनी पुन्हा एकदा क्रांतिदेवतेची आराधना सुरू केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांची ’अभिनव भारत’ हा क्रांतिदेवतेच्या मंदिराचा पाया, शचिंद्रनाथ संन्यालांच्या प्रेरणेतून निर्माण झालेली ’हिंदुस्थान समाजवादी प्रजासत्ताक सेना’ हा त्या मंदिराचा गाभारा तर राशबिहारीबाबू व नेताजींची ’आझाद हिंद सेना’ हा मंदिराचा कळस मानावा लागेल.

पर पप्पू कांट डान्स साला!

Image of: Rattus rattus (house rat)

चित्रपट हे एकंदरीतच आयुष्याबरोबर एक सुरेल लेहरा धरून आहेत. 'क्या करूं गुरुदेव, मेरे तो डायलॉगही खत्म हो गयें, वरना मैं आपकोभी मात दे जाता' यामागची वेदना, 'दोनों बातें हैं मां, जादा पैसा आयें, तो नींद नही आती, नींद आये तो जादा पैसा नही आता' यामागचा विचार आणि 'तुम उस लडकेसे शादी नही करोगी जिससे तुम प्रेम करती हो, तुम उस लडकेसे शादी करोगी जिससे मै प्रेम करता हूं, यानेके रामप्रसादसे'  यामागचा विनोद... हे सगळे आहे कित्येक वर्षांपूर्वीचे, पण आजही तेवढाच आनंद देऊन जाते. गाणी तर काय, नेहमीच आपले बोट धरून चालत आलेली आहेत. आणि हे सगळे फक्त कालच्या जमान्यात होते असे नाही. आजही एखादा 'तारे जमीं पर' एखादा 'रंग दे बसंती', एखादा 'मेट्रो', एखादा 'हनीमून ट्रॅव्हल्स' अगदी 'जब वी मेट' या चमत्कारिक धेडगुजरी नावाचा चित्रपट...  असा अपूर्व आनंद देऊन जातात. करमणूक, विरंगुळा आणि चार घटका सुखाच्या जाव्यात हा हेतू हे चित्रपटांच्या मागचे असावेत हे ठीक, पण एखाद्या चित्रपटाने काही घसघशीत प्रश्न समोर टाकले, एखाद्या प्रसंगाने अस्वस्थ, अंतर्मुख केले तर ते त्या चित्रपटाचे यशच म्हणावे लागेल. किंबहुना चित्रपट हे माध्यम प्रगल्भ झाल्याचे ते लक्षणच ठरावे. एका विशिष्ट वयानंतर किंवा वाचनानंतर फिक्शन वाचायचा जसा कंटाळा येतो, तसेच निव्वळ मनोरंजन करणारे उथळ चित्रपटही नकोसे वाटतात. करमणूक हे उद्दिष्ट असावे, पण फक्त तेवढेच असू नये इतकेच.

"तुम्हारी जनरेशन के पास सवाल बहोत है... " कुलभूषण खरबंदाच्या तोंडून गुलजारने हा प्रश्न विचारला त्यालाही बरीच वर्षे झाली. आजच्या पिढीसमोर खूप आहेत, पण किमान प्रश्न तरी आहेत असे समाधान त्या 'हुतूतू' या चित्रपटात मिळाले होते. पण तीही आता जुनी गोष्ट झाली. प्रश्न? आणि तेही चित्रपटात? छट! काहीतरीच काय! चित्रपट असे प्रश्न वगैरे टाकण्यासाठी किंवा सोडवण्यासाठी काढायचा नसतो. असलाच तर प्रश्न असा असावा की मी माझी आत्ताची गर्लफ्रेंड (किंवा बॉयफ्रेंड) सोडून देऊन नवी / नवा कसा मिळवू? आणि हा काही कमी महत्त्वाचा प्रश्न नाही बरे!

'जाने तू ना जाने ना' हा आजच्या पिढीमध्ये कमालीचा लोकप्रिय झालेला चित्रपट असेच काही मौलिक प्रश्न समोर टाकतो. 'दिल चाहता है' जिथे संपतो तिथे 'जाने तू' सुरू होतो असे कुणीसे म्हणाले. 'दिचाहै' चांगलाच होता. प्रेम म्हणजे काय याच्या शोधातले तीन तरुण आणि प्रत्येकाला आपापल्या परीने त्याची झालेली उकल ही थीम दिचाहै मध्ये नीट व्यवस्थितपणे हाताळली होती. म्हणून उत्सुकतेने आणि तसा बऱ्याच उशीरा 'जातूयाजाना' ला गेलो.