गोष्टी सांगेन युक्तीच्या चार - ब्लॉग लिहीण्या विषयी थोडेसे

मी ब्लॉग का लिहितो? हा प्रश्न मी सिगरेट का ओढतो? ह्या प्रश्ना इतकाच कूट किंवा गहन आहे. आणि ह्या दोन्ही प्रश्नांचं उत्तरही एकच आहे. मला आवडतं म्हणून. तसा मी ह्या ब्लॉग विश्वात नवीनच आहे. काही महिनेच झालेत लिहायला सुरुवात करून. नक्की सांगायचं तर मी मुंबई सोडून इथे बँगलोरला राहायला आलो तेव्हा पासून मला प्रचंड मोकळा वेळ मिळू लागला. मग नुसतंच घरी बसून बियर पिण्या पेक्षा बियर पिता पिता थोडं लिहिलेलं काय वाईट असा एक विचार मनात आला आणि मी सुद्धा की बोर्ड बडवायला सुरुवात केली.

एक भीषण भाषण...

सभ्य स्त्री पुरुषहो,
      आज तुमच्यासमोर उभं राहून बोलताना, काय बोलावे हा प्रश्न मला पडला आहे. सध्या जग एका वेगळ्याच आंबवण्याच्या प्रक्रियेतून जात आहे. जग हे प्रसरण पावत आहे त्याच प्रमाणे जगाचे एका लहान खेड्यात रुपांतर होत आहे अशी परस्परविरोधी विधाने करुन लोकांची दिशाभूल केली जाते. अर्थात यामागे कुणाचा हात आहे हे आम्ही जाणतो आणि त्यांचा पूर्णपणे बिमोड करण्याचे आश्वासन मी तुम्हाला देते. मात्र सध्या आपल्या समोर एक वेगळाच प्रश्न उभा आहे आणि त्या अनुषंगाने आपले आंतरराष्ट्रीय धोरण काय असावे याचा पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आली आहे.  हीऽऽ, कशाने मंदी आलीऽऽ? हाच तो प्रश्न होय. या प्रश्नाचे उत्तर देण्यास मात्र मी असमर्थ आहे.
           जगाच्या राजकीय पटलावर भारत आणि चीन यांचा उदय होत आहे हे तुम्ही जाणताच. त्यामुळे जगाचे सत्ताकेंद्र पूर्वेकडे सरकत आहे असा प्रचार काहीजण करत आहेत. असा खोडसाळपणा करणाऱ्यांचा देखील बंदोबस्त करण्यात येईल. लोकांना वाटते आता आमचे दिवस भरत आले आहेत. म्हणजे आता अमेरिकेचे दिवस भरत आले आहेत, असे लोकांना वाटते असे मला म्हणायचे होते. असो. या म्हणण्याला पुष्टी देतील अशा कित्येक बाबी समोर दिसत असल्या तरी ही परिस्थिती सुधारण्याची संधी तुम्ही मला द्याल अशी मला खात्री आहे.
         सगळ्या जगात महागाईचा भडका उडालेला आहे आणि भल्याभल्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आपल्यासारख्या एवढ्या समृद्ध देशाला आणि पर्यायाने तुम्हाला देखील याची झळ बसावी ही खरंच शरमेची बाब आहे. पण तुम्ही देखील जरा सहानुभूतीने या बाबीचा विचार करावा असं मी तुम्हाला कळकळीने सांगते. अहो जिथे टोनी बेअर यांनादेखील एवढी झळ बसत असेल तिथं तुमचा काय पाड लागणार? कालच मी श्रीमती बेअर यांना फोन लावला होता. हो! मी फोन बऱ्यापैकी वापरते कारण फोनचं बिल खूप आलं तरी ते पक्षाच्या खर्चात लावता येतं. हा तर मी काय सांगत होते? हां, तर फोनवर श्रीमती बेअर म्हणाल्या की त्यांनी नेहमीप्रमाणे श्रीयुत बेअर यांना ग्रोसरीत काहीबाही आणायला पाठवलं होतं, पण महागाई एवढी वाढलीय की नुसतं ब्रेड बटाटे घेण्यातच त्यांच्याकडचे पैसे संपले. त्यांना वाटलं कुणाला काही न कळता आपण घरी पोहोचू. पण कसलं काय, ट्रेनीत चढतानाच टिसीने पकडलं आणि त्यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला. अशी ही महागाई सगळीकडेच वाढलेली असताना आपला देशच मग याला कसा अपवाद राहणार?
       माझी मैत्रीण कोंदूलिझा म्हणते त्याच्याशी तर मी पूर्णपणे सहमत आहे. भारत आणि चीनमुळेच एवढी अन्नधान्याची जागतिक टंचाई निर्माण झाली आहे. तुम्हाला माहित आहे का की भारतातले बरेच लोक आता अर्ध्या चपातीऐवजी पाऊण चपाती खातात आणि जे चपाती खात नाहीत ते भाकरीच्या चार तुकड्यांऐवजी सहा तुकडे खाऊ लागले आहेत. मग टंचाई होईल नाहीतर काय? बिच्चाऱ्या कोंदूलिझाची तर खूपच कोंडी झाली आहे! बिचारी कोंड्याचा मांडा करुन कसंतरी भागवत आहे. उगाच आडनाव राईस असलं म्हणून राईस काय फुकट मिळतो का?
      अशा या महागाईचा मी ताबडतोब निषेध नोंदवते. आपल्या बायाबापड्यांवर पण किती आपत्ती ओढवली आहे याची तुम्हाला कल्पना नसेल. अहो आपल्या देशातल्या पोरीबाळींना आता पोटापाण्यासाठी भारतात जाऊन, तोकड्या कपड्यात कंबर हलवून, अंगविक्षेप करुन पोट भरावं लागतंय. खेळ राहतो बाजूलाच आणि लोक त्यांच्याकडेच बघत बसतात. खरंच ही किती शरमेची गोष्ट आहे! या भारताकडून आपण आपली कामं आउटसोर्सिंगने करुन घेत होतो तिथं आपल्याच मुलींना आता काम करावं लागतंय. म्हणूनच जॉर्ज फुस् यांनी आपल्याला पण दोन मुली आहेत या भावनेने या बाबीचा विचार केला तर बरे होईल.
     बाकी नुकत्याच एका प्रकरणात भारताची जी नाचक्की झाली ती योग्यच झाली. आपलेच दात आणि आपलेच ओठ असूनही, मैदानावर 'अ-शांत' वर्तन केल्याबद्दल त्यांच्या खेळाडूला शिक्षा केल्याबद्दल मी भारताचे अभिनंदन करते. त्याच खेळाडूने अँड्र्यू डायमंडस् याला मनुष्याचा पूर्वज असे हिणवले होते तेव्हा मला देखील खूप वाईट वाटले. भारत ऑस्ट्रेलिया संबंध तेव्हा माकडाच्या शेपटीसारखे ताणलेले होते. अर्थात अमेरिका क्रिकेट खेळत नसल्याने मध्ये हस्तक्षेप करण्याची संधी आम्हाला गमवावी लागली. लोकहो, तरीदेखील भारतासारख्या देशाकडून पण बरेच काही शिकण्यासारखे आहे. त्यामुळे त्यांचेच अनुकरण करत मी देखील तुम्हाला सरसकट कर्जमाफी देऊन सबप्राईमच्या पेचातून सोडवण्याचे आश्वासन देते. मात्र यासाठी तुम्ही माझे सहकारी 'खुराक' यांना मते न देता मलाच निवडणूकीसाठी निवडून दिले पाहिजे. तुम्ही जर एवढं मनावर घ्याल आणि तुमच्या पाठिंब्याने मी निवडून आले तर तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. सभ्य स्त्री पुरुषहो, पुन्हा एकदा सांगते, काळ मोठा कठीण आला आहे. पूर्वी होते त्यासारखे दिवस आता राहिलेले नाहीत. शेवटी जो काय निर्णय घ्यायचा तो तुम्हालाच घ्यावा लागणार आहे. त्यामुळे तुम्ही मला निश्चितच संधी द्याल अशी आशा करते. जय अमेरिका!

तुला धाडते रे तुला धाडते!

निखिल आणि वृषाली हे युगुल म्हणजे अगदी समसमासंयोग होता. दोघेही अतिशय बुद्धिमान. प्रत्येक गोष्टींत त्यांची एकमेकाला अशी साथ असायची की शरीरे दोन पण मन एकच आहे असे पाहणाऱ्याला वाटावे.

परवा ह्याचेच प्रत्यंतर आले.

झाले काय, की कंपनीत वरिष्ठांच्या बैठकीत निखिलला त्याने बनवलेल्या एका उपकरणाचे प्रात्यक्षिक करून दाखवायचे होते. तो एक निखिलने लावलेला शोधच होता म्हणा ना. कंपनीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आणि संवेदनशील. ते उपकरण घरी आणून निखिल जवळ जवळ रात्रभर त्याची वेगवेगळ्या प्रकारे चाचणी करत होता. सर्वप्रकारे ते यशस्वी व्हायलाच पाहिजे, ह्याचा ताण त्याच्या मनावर आला होता. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. दुसऱ्या दिवशी कंपनीत पोहोचला तेव्हा त्याच्या लक्षात आले, सकाळी गडबडीत उपकरणाचा एक महत्त्वाचा भागच बरोबर घ्यायचा राहून गेला होता.

प्रतिमासृष्टी (एक छोटीशी गोष्ट)

काल घरी गेलो.
दाराने रोजच्यासारखे स्वागत केलेच नाही.
काय झालंय तेच कळेना. म्हटलं जाऊन त्या आरशाच्या काचेला विचारावं झालंय तरी काय?
तर तीही जागची गायब.
काहीच कळेना. अजब शांतता. माझे रूम मेट्स ते दार, ती आरशाची काच धड कोणीच दिसेना.
जे दिसताहेत ते बोलेनात. वैतागून खिडकीवर ओरडलो:-
" अरे, झालंय तरी काय इथे?काल पर्यंत तर हे दार आणि आरसा प्रेम गीत म्हणायचे. मला जरा बरं वाटायचं आनंदी
जोडप्याकडे पाहून. ह्यांना प्रायव्हसी हवी म्हणून मी नाइट शिफ्ट सुद्धा घेतली होती ना मागे(आणि म्हणूनच लेका तुझा जन्म झाला)
काय, चाललंय तरी काय इथे?"

ससा की कासव?

नाही नाही.... मी ते गोष्ट किंवा तिच्या अनेक आवृत्त्यांपैकी एक अजिबात सांगत नाहीये. आपण ही गोष्ट लहानपणापासून हजारो वेळा वाचली, ऐकली आणि ऐकवली असेल. आणि त्या गोष्टीचं तात्पर्य समजावून सांगितलं असेल "स्लो अँड स्टेडी विन्स द रेस'. हे तात्पर्यच इतक्या वेळा आपल्या मनावर ठसवलेलं असतं की 'स्लो अँड स्टेडी' होण्याचा नादात आपण 'फास्ट अँड फ्यूरियस' होणं विसरून जातो. अर्थात ह्यात कासवाला अजिबात कमी लेखण्याचा हेतू नाही. पठ्ठ्यानी कष्टांने, श्रमाने, जिदीने आणि चिकाटीच्या बळावर सशाला 'फेअर अँड स्क्वेअर' म्हणजे निर्विवाद हरवलं होतं. पण त्या सशाचा जरा विचार करा की राव! एका चुकीबद्दल बिचारा शतकानुशतकं आपले टोमणे ऐकतोय ! खरंतर धावण्याची कला, वेग, दमसास, चपळता ह्या सर्वच बाबतीत ससा कासवापेक्षा कितीतरी सरस असतो.

माकडछाप दंतमंजनाचा बागुलबुवा

माझ्या जाहिरात एजंसी मध्ये आजकाल गर्दी वाढली होती. हाताखालचे लोकं सुद्धा वाढले होते. दररोज नवनवीन क्लाएंटस त्यांच्या उत्पादनाच्या जाहीराती साठी येत होते. असेच एक दिवस दोन जणं माझ्या केबीन मध्ये आले.

"नमस्कार!!! मी बागुल आणि हे बुवा" बागुल म्हणाले.

चिरतारुण्याचे वरदान..

पुराण कथांमधे पारिजातकाच्या झाडाचा एक संदर्भ आहे.. कृष्णाची राणी सत्यभामा हिला तो वृक्ष चिरतारुण्य प्रदान करतो अशी काहीतरी... त्यावरून एक कथा आठवली..
गुगली' नावाचं एक पुस्तक आहे सुबोध भावे यांचं त्यात ही कथा आहे..दोन मित्र असतात त्यातला एक मित्र अरुणाचल प्रदेश सारख्या दुर्गम ठिकाणी जातो तेथील लोकांची जीवनशैली अभ्यासण्यासाठी... तिथे गेल्यावर त्याच्या नजरेस एक जमात पडते ज्यातील लोक कधी म्हातारेच होत नाहीत...त्यांना मृत्यु हा केवळ अपघाताने अथवा रोगामुळे होतो.म्हातारपण हा प्रकारच नसतो...ते लोक खात असलेल्या काही वनस्पतींचा तो अभ्यास करतो अणि कायम चिरतरुण ठेवाणारे असे एक औषध तो शोधून काढतो..उंदरावर त्याचा प्रयोग करतो..आणि नंतर त्याच्या मित्राला कळवतो की मी सगळे संशोधन नष्ट केले आहे ...

ज्या उंदरावर प्रयोग केला त्याला काही दिवसात कळाले की आता काही आपण म्हातारे होत नाही..मग त्याची जिगिषाच संपुन गेली...असेच काहीतरी त्या जमातीचे सुद्धा झाले..अत्यंत आळशी अणि अकार्यक्षम अशी जमात निपजली...
आपल्या कुठल्याही लगबगीमागचे खरे कारण हे " वेळ माझ्या हातातुन निघुन जात आहे" ही भीतिच आहे...आपण आत्ता जर काम केले नाही तर कदाचित पुन्हा संधी मिळणार नाही हि भीतिच हितकारक आहे.. मी अमर आहे असे वाटले तर
आज करे सो कल
कल करे सो परसों...अशीच वृत्ति निर्माण होते.

पण.... जर खरचं मानवाला चिरतारुण्याचे वरदान लाभले तर ???

ते वरदान ठरेल की शाप ??

गझलांची `सप्तरंगी` मैफल !

अनेक दिवसांपासून अनिरुद्ध अभ्यंकर, ओंकार जोशी आणि त्यांच्या मित्रमंडळींच्या मनात गझलवाचनाचा एखादा कार्यक्रम पुण्यात घ्यावा असे होते. कविवर्य सुरेश भट यांच्या ७७ व्या जन्मदिनानिमित्त सप्तरंग हा गझलवाचनाचा कार्यक्रम पुण्यात भरत नाट्यमंदिरात १८ एप्रिल रोजी झाला. अनिरुद्ध अभ्यंकर आणि त्यांच्या मित्रमंडळींनी गझलांवरील एक सुंदर कार्यक्रम ऐकण्याची संधी त्यांनी पुण्याच्या चोखंदळ गझलरसिकांना दिली, त्याबद्दल अभ्यंकर आणि मित्रमंडळींचे आभार वृत्तान्ताच्या सुरुवातीलाच मानणे अनुचित होणार नाही. कवी म. भा. चव्हाण, चंद्रशेखर सानेकर, वैभव जोशी, अभिमन्यू आळतेकर, डॉ. अनंत ढवळे, चित्तरंजन भट व प्रदीप कुलकर्णीअशा सातजणांनी या गझलमैफलीत भाग घेतला. गझलकार सात म्हणून कार्यक्रमाचे नावही सप्तरंग ! या मैफलीने खरोखरच मराठी गझलेचे विविध रंग रसिकांपुढे आणले आणि त्यांना उपस्थितांनी दादही भरभरून दिली. अरुण म्हात्रे यांच्या संयत आणि नेटक्या निवेदनाने या मैफलीची रंगत वाढविली.

बासुदांचे 'अनुभव'

बासू भट्टाचार्य एक बिनधास्त व्यक्तिमत्त्व होऊन गेलं. मानवी नातेसंबंध विशेषतः स्त्री-पुरूष संबंध हा त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. त्यावरच अनुभव, आविष्कार आणि गृहप्रवेश ही चित्रत्रयी त्यांनी दिली. काही वर्षांपूर्वी आलेला आस्था हा चित्रपटही त्याच साखळीतला होता, असे म्हणायला हरकत नाही. नुकतंच बासूदांचं 'अनुभव' हे आत्मकथनपर पुस्तक वाचलं. 'सकाळ'मध्ये काही वर्षांपूर्वी हे आत्मकथन सदरातून प्रसिद्ध होत होतं. पण एकत्रितरीत्या पुस्तकातून वाचताना त्याचा आनंद काही औरच.

मॉप्स

 अधिक माहिती इथे पहा.    MOPS means Mothers Oriented Preschoolers. 

मॉप्स दर महिन्याच्या दुसऱ्या गुरवारी भरतात. त्याकरता एक चर्चमध्ये जागा घेतली जाते. त्याची जाहिरात डेकेअरच्या दरवाज्याजवळ आधी लावली जाते. इथे मला काम करण्याची संधी मिळाली त्याचा एक छोटा अनुभव मी इथे देत आहे.