धुक्यातून उलगडणारे जी ए -२

लेखनाची सुरुवात - सोनपावले

जी.एं. च्या मृत्यूनंतर त्यांच्या अप्रकाशित कथा, अनुवाद आणि इतर साहित्यप्रकारांचे एक बाड जी.एं च्या भगिनी प्रभावती सोलापूरकर यांना मिळाले. त्यातल्या काही साहित्याचे परचुरे प्रकाशन मंदिराने 'सोनपावले' नावाचे पुस्तक प्रकाशित केले आहे.  हे तसे जुनेच पुस्तक ( ११ डिसेंबर १९९१). सु.रा. चुनेकर यांनी संपादन केलेल्या या पुस्तकात जी.एं. च्या लिखाणाच्या सुरुवातीच्या काळातल्या प्रयोगांचे चित्र दिसते. अगदी सुरुवातीला शालेय जीवनातले जी.एं. चे लेखन 'ओळखा पाहू', कोडी या स्वरुपाचे आहे. त्यानंतरच्या जी.एं. च्या स्वतंत्र कथालेखनाच्या पहिल्यापहिल्या प्रयत्नांवर   त्या काळी प्रसिद्ध असलेल्या लेखकांची, विशेषतः खांडेकरांची मोठी छाप आहे. जी.ए. आणि खांडेकर हे गणित आज ऐकायलाही विचित्र वाटत असले तरी खांडेकरांमुळे जी.ए. त्यांच्या तरुणपणी प्रभावित झाले होते हे निश्चित. 'बाबारे, जीवनसर्वस्व त्यागात आहे, स्वार्थात नव्हे', 'पंतांना वाटले, या दुसऱ्या बाळपणात सुगंध, पाकळ्या, रंग वगैरे सर्व जातात, फक्त काटे मात्र वाटणीला उरतात!, अश्रू जरी डोळ्यांवाटे बाहेर पडत असले तरी त्यांचे उगमस्थान हृदयच आहे' असली आज हास्यास्पद वाटणारी वाक्ये जी.एं. या त्या वेळच्या कथांमध्ये सर्रास दिसून येतात, हे आज काहीसे गमतीशीर वाटते. नंतरच्या काळात बाकी जी.एं. ना खांडेकरांच्या आदर्शवादी विचारांतला पोकळपणा कळालेला दिसतो. (स्वतः खांडेकरांना तो कळाला की नाही कुणास ठाऊक!) पण एकाच विचाराची पताका खांद्यावर घेऊन आयुष्यभर वाटचाल केलेला लेखक म्हणून जी.एं. ना खांडेकरांविषयी आदर वाटत आला होता. जी.एं. ची खांडेकरांशी प्रत्यक्ष भेट कधी झाली होती असे दिसत नाही, पण खांडेकरांबरोबर त्यांचा पत्रव्यवहार होता. खांडेकर दत्तक जाण्यापूर्वी त्यांचे नाव गणेश आत्माराम खांडेकर की असे काहीसे होते आणि म्हणून त्यांच्या व जी.एं. च्या नावाची आद्याक्षरे एकच -GAK- हे कळाल्यावर आपल्याला एक शाळकरी आनंद झाला होता, असे पुढे कधीतरी जी.एं. नी एका पत्रात लिहिले आहे.

इचलकरन्जी - काही आठवणी !!!


दोन मनोगतींच्या आग्रहाखातर इचलकरन्जीवर हा लेख...

१९८८-१९९२ मध्ये माझे बाबा इचलकरन्जीमध्ये "डेक्कन को-ऑप स्पिनिंग मिल्स मध्ये होते त्यावेळच्या काही आठवणी.खुपच पुसटसे आठवत आहे पण तरीही मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

मी जाणतो

मनोगतवर सध्या 'नवीन कविता', या सदराखाली असलेली,‘मी जाणतो’ ह्या मझ्या कवितेचे मनोगत.

या अशाच जाणारॅ दिवसात, मनाला त्याची फारशी जाणीव नसते. मन इथेच आसपास काही बघत असतं, डोळ्यांनी. (कधी कधी डोळे मिटल्यावर त्याला आपल्या अस्तित्त्वाची जाणिव होते.)
 
एकदा आई मला म्हणाली,‘इतका सुंदर सोन्यासारखा दिवस आहे, कशाला वाया घालवतोस? कर, काहीतरी कर.’ (मी मनात म्हटलं,‘ हो आई मी जाणतो, सुंदर सोनेरी सुर्यकिरणांत उजळून निघणारे दिवस.' जे चराचराला रोज काही कर म्हणतात... नाविन्याच्या तेजाने या सृष्टीतलावर अवतीर्ण होऊन, पाना-फुलांना, फुलपाखरांना आणि त्यांच्या इतक्याच कोमल मनाला आशा आणि नवचॆतन्य देणारा ‘सोनेरी सूर्यकिरण’.)
नंतर ती एकदा मला कॊतुकाने म्हणाली,‘खुप खुप मोठ्ठा होऽ’ ( खरंच मी जाणतो, तुझी माझ्यावरील मोठ्ठी माया... आणि माझं जीवन सुखी व्हावं यासाठी असलेली तुझी तळमळ.)
(मला केवळ जाणायचं आहे की, ह्या जीवनापलीकडे काय आहे? असेच सुंदर सोनेरी सूर्यकिरण की आईची माया?...)

साठवण शाळा....!!!!

"बेंचवर कोरलेलं माझं नाव 

 आणि तुमचं चित्रही तसंच असेल

पाठीवर फुटलेलं तुमचं घड्याळ

अन तुमचंही काचेचं मन असेल

देवाशपथ सांगतो सर,

देवाशपथ सांगतो सर

माझ्यासारखंच तडफडणारं

एक तरी वेडं मन असेल

सर असल्या आठवण वेड्यांची

अमेरिकायण! (भाग १७ : वेडे खेळ)

उन्हाळा सुरू झाल्यापासून दर सप्ताहान्ती कुठे ना कुठे जाणं चालू होतं. यात पुन्हा एकदा अटलांटिक सिटीची वारी झाली, महाराष्ट्र मंडळातला गणेशोत्सव झाला. पण त्याआधी आम्ही एका सप्ताहान्ती "सिक्स फ्लॅग्स" नावाच्या मनोरंजन उद्यानात (ऍम्युझमेंट पार्क) गेलो होतो. आपल्याकडेही त्या धर्तीवर 'एस्सेलवर्ल्ड', 'अप्पूघर' आदी मनोरंजन उद्याने सुरू आहेतच. पण आपल्याकडे असणारे खेळ आणि इथल्या राक्षसी राईडस याची तुलना न केलेलीच बरी. आपले अतिप्रसिद्ध रोलरकोस्टर्स इथल्या राईडस पुढे घसरगुंड्या वाटाव्यात अश्या इथल्या राईडस.

नेमेची येतो मग संकल्प

नेमेची येतो मग पावसाळा प्रमाणे, नेमेची येते नवीन वर्ष आणि नेमेची येतो नवीन वर्षाचा संकल्प.

१५ दिवसांनी नवीन वर्ष सुरू होणार. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासोबतच बहुतेक जण प्रश्न विचारणार," मग नवीन वर्षाचा काय संकल्प केलास?"
आता काय म्हणावे. दरवर्षीच सुरुवातीला ठरवतो की हे करणार, ते करणार. पण ते अमलात आणणे नीटसे जमत नाही. आहे, त्यात आळस हा भाग आहेच. परंतु काही वेळा वाटते, एवढे काय आपल्याला करायचे असते की जे इतके वर्ष आपण करावयाचे ठरवतो आणि मग करत नाही. सगळे नेहमीचेच.

हो, जर मी ठरविले की दररोज सकाळी लवकर उठायची सवय लावीन, तर प्रयत्न करू शकतो. पण कामावरून उशीरा आल्यावर कसले लवकर उठणे आणि कसला संकल्प. व्यायामाचेही तेच.

गेल्या (ह्याच) वर्षाचेच बघा की, कार्यालयातील कामाचा आढावा, मीटिंग, पुढील कामे लिहिण्याकरिता एक प्लॅनर विकत घेतला. पण तो प्लॅनर नीट वापरणे जमलेच नाही. कारण काय तर एका कामातच एवढा गुंतलो की पुढे काय करायचे तेच ठरवता आले नाही. मग प्लॅनर मध्ये काय लिहिणार?  @^%&@^@((@#%">%&@^%

चिरकाल

जसं जसं आपण मोठे होऊ लागतो, आपल्यासमोरील ध्येये निश्चित होऊ लागतात. हे जीवन काय आहे? अणि ह्या जीवनविश्वात देवानं आपली जागा नेमकी कुठं निश्चित केली आहे? ह्या गोष्टींचा आंदाज घेण्यापासून, इथं टिकून राहण्यासाठी पुढं काय केलं पाहिजे?  इथपर्यंत येऊन माणूस विचार करत राहतो. आपल्या ध्येयांना मग सुंदर स्वप्नांची सोनेरी किनार लाभते. ध्येयपूर्ती होण्याआधीच आपण उंच उंच स्वप्नांमध्ये हरवून जाऊन, ध्येयपूर्तीचा आनंद घेत असतो. आणि तो आनंदच महत्त्वाचा असतो. शेवटी समाधान हीच तर जीवनाची सार्थकता असते. त्या निर्मळ स्वप्नांची हॄदयपटलावर उमटलेली तेवढीच सुंदर चित्रं, म्हणजेच प्रत्येक मानवाची, त्याच्या अंतरीच्या चित्रकाराची अभिजात कलाकृती आहे. आणि हळूहळू ह्या कलाकृतीचं जेंव्हा ध्येयपूर्तीमध्ये रूपांतर होतं, तेंव्हा ती स्वतःपूर्तीच मर्यादीत न राहता, तीचा सुगंध सर्वत्र दरवळू लागतो. व इतरांसाठी आनंदाचे आणि समाधानाचे प्रेरणास्थान ठरते. ती क्षणभंगुर जीवनातील पूर्णत्त्वाची कलाकृती, विश्वाच्या भिंतींवर, चिरकालाच्या संग्रहात, प्रत्यक्ष देवाकडूनच जतन करून ठेवली जाते...

नाते तुझे नि माझे...आई

नाते तुझे नि माझे...

नाते तुझे नि माझे
मायेच्या सावलीखाली वाढलेले,
अकुंरत्या ईवलूष्या बीजाला
तू पंखाखाली हळुवार जपलेले..
असंच एक नातं जे जिव्हाळ्याचं , प्रेमाचं अन आपुलकीचं प्रतीक मानलं जातं ते म्हणजे आईचं अन तिच्या तान्हुल्याचं. अश्याच या पवित्र नात्यावर शब्दांची फुले उधळावी तेवढी कमीच म्हणावी लागतील. नऊ महिन्याचा या खडतर प्रवासात सतत एक दर्द उरात घेऊन पोटच्या गोळ्याला जपायचं अन अखेर त्या जीवघेण्या प्रसूतिवेदनांना एका आनंदाच्या आभासाखाली हसत हसत सहन करायचं अन एका नाजूक फुलाला जन्म द्यायचा, हे सारं आपल्याला ऐकायलाच किती थरारक वाटतं, पण तुम्ही कधी विचारलं आहे त्या आईला , जिने नुकतंच एका अभ्रकाला जन्म दिलाय, तुम्हाला तिच्या चेहर्‍यावर एक विलक्षण आनंद अन मनात तिच्या दरवळलेला परमानंद दिसेल. का तिच्या चेहर्‍यावर हे सारं दिसून येतं अन का एखाद्या स्त्री ला आई होण्याचं स्वप्न बघावंस वाटतं याचा अर्थ अजून कोणालाच नाही सापडला आहे.
जगात आई-मुलाच्या नात्यापेक्षा काहीच श्रेष्ठ नाही हे आपल्यालाच माहीत आहे . " स्वामी तीनही जगांचा आईविना भिकारी " हे ते आपण खूपं पूर्वीपासून वाचत आलोय. आईच्या नात्यात एक मर्मपणा लपलेला असतो , हळव्या मनाची ती जननी अन उदार काळजाची ती देव असते. आज देवासमोर हाथ का जोडावेत अगर दैवंच आईच्या प्रेमासमोर नतमस्तक होत असेल तर. आपण पाहतोच आपल्या तोंडातून जो पाहिला शब्द बाहेर येतो तो काय असतो आ..ई. अन आई या नात्याचं महत्त्वं तर साऱ्या जगातल्या देवांना हि माहीत आहे. पुराणातली कितीतरी उदाहरणे याची साक्ष देऊन जातात. याचा अर्थ अस आहे की आईचं नातं विश्वात कायम होतं कायम आहे अन असच कायम राहिलं.

एक प्रदीर्घ संवाद....( पुस्तक परीक्षण - अंतर्वती )कवी -किरण संघवई

 संवेदनेची विशुध्द अभिव्यक्ती हा चांगल्या कवितेचा सार्वकालीन निकष आहे.प्रत्यक्षात मात्र  या निकषावर अनेक कवी अयशस्वी होताना दिसून येतात,आणि यामुळेच बहुधा आजकाल सरावाने कविता लिहिणार्‍या कवींची संख्या बरीच असली , तरी चांगली कविता त्या मानाने कमी आढळून येते.मानवी मनाचे जटील व्यवहार समजून उमजून कविता लिहिणे , हा काहिसा कठीण भाग अनेकांना न साधल्याने , कवितेच्या नावाखाली पाडलेले शब्दांचे निर्जीव ढीगच आधिक्याने दिसून येतात्.या परिवेशात किरण संघवई यांचा 'अंतर्वती ' हा हिंदी कवितांचा संग्रह आपल्या वेगळेपणाने निश्चितच  उठून दिसतो.