कात्रज ते सिंहगड

--------- हा लेख आमच्या कात्रज ते सिंहगड प्रवासाचे (ट्रेकचे) संक्षिप्त वर्णन आहे.

ट्रेक :- कात्रज ते सिंहगड

दिनांक :- २४/१२/२००७

                       मी (श्रीकांत), मानसी, प्रवीण, इंद्रजीत आणि पुरुषोत्तम, आम्ही कात्रज ते सिंहगड ट्रेक ची सुरुवात २४ डिसेंबर ला रात्री केली. रात्री १०.३० च्या दरम्यान आम्ही कात्रज बोगद्या जवळ पोचलो. प्रवीण आमच्या मध्ये अनुभवी माणूस होता त्याच्या म्हणण्यानुसार आम्ही कात्रज च्या बोगद्या वर पोचलो ती रात्र पूर्णचंद्रा ची रात्र असल्या मुळे प्रवास करण्याजोगा उजेड होता. पुरुषोत्तम चा पहिलाच ट्रेक होता आणि त्यात पहिल्याच डोंगरावर जाण्याची पायवाट चुकल्यामुळे त्याच्या चेहऱ्या वरचे भीतीचे भाव साफ दिसत होते. प्रवीण ने मग आपल्या तल्लख मेंदूवर जोर दिला आणि आम्ही आमच्या प्रवासच्या पहिल्या पडावावर येऊन पोचलो. पहिलाच डोंगर थोडा अवघड होता, वर पोचताच आम्हाला आमच्या ट्रेकचा अंतिम पडाव म्हणजेच सिंहगडावरचा लाल लाईट दिसला.

मोदीन्च्या यशाचे न उलगडलेले रहस्य

मुळ लेख महाराष्ट्र टाईम्स दि. २६ डिसेंबर, २००७

गोध्रा दंगलीच्या पार्श्वभूमीवर सत्तेत आलेल्या नरेंद मोदींचा गुजरात जातीय-धामिर्कदृष्ट्या अत्यंत संवेदनशील बनला होता. पण मोदींनी सत्तेवर येताच हाक दिली ती गुजरातच्या विकासाची. पाच वर्षांत विकासाची आखणी करताना समाजातील सर्व घटक विश्वासात घेण्याची किमया केली. गुजरातच्या साडेपाच कोटी जनतेचा विचार करून त्यांनी अल्पसंख्य-बहुसंख्य वादाला मूठमाती दिली. सर्वच गोष्टींत अल्पसंख्यवाद पाहणाऱ्यांना यामुळेच मोदींच्या यशाचे गमक कळले नाही.

निकृष्ट पत्रकारितेचा कहर

भरपूर वेळा, भरपूर ठिकाणी वृत्तपत्रांनी, वृत्तवाहिन्यांनी बातमीला मसाला लावून सांगणे, खोट्या प्रकारे एखाद्या गोष्टीला पुढे आणणे, किंवा एखाद्या गोष्टीचा त्यांच्या स्वार्थाकरीता फायदा कसा करून घेतला ह्याबाबत चर्चा होत असते. त्यांच्या वागण्यावर नेहमीच प्रश्नचिन्ह उभे असते. आता मी नेहमीच प्रसारमाध्यमांच्या विरोधात नाही. त्यांच्यामुळे बऱ्याच गोष्टींना वाचा फुटते. सामान्यांना फायदा होतोच. पण त्यांनी स्वत:ला काही मर्यादेत ठेवावे असे सर्वांचेच मत आहे.

हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे, परवाच्या दैनिकात वाचलेली बातमी. ती वाचून वाटले की हे लोक स्वत:च्या वृत्तपत्राला वाचक मिळावेत म्हणून एखाद्या गोष्टीला मोठ्ठी करून सांगतात.

'तारे जमींन पर'!

सावधान: खालील मजकुरात कथानक उघड केलेले असण्याची शक्यता आहे.

आमिरखानचा 'तारे जमींन पर' नुकताच प्रदर्शित झालाय. मी चक्क हा चित्रपट नजीकच्या चित्रपटगृहात लागलीच जाऊन पाहिला! (एरवी चित्रपट प्रदर्शित होऊन, अनेक दिवस लोटून तो व्यवस्थित जुना झाल्यावर आणि तोपर्यंत चारी दिशांनी त्याच्याविषयीची मतं कानावर आदळल्यावर मग आरामात बघणार्‍यांपैकी मी एक!:)) पण 'तारे..' च्या आधीपासून झळकणार्‍या झलका हा चित्रपट लगेच पाहायचा निर्णय घ्यायला पुरेश्या ठरल्या! कारण मुख्यत्वे प्रेमाचे त्रिकोण, चौकोन, पंच किंवा षट्कोन, लंडन-न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर उबळणारे देशप्रेम, भांगडा आणि सरसों का साग, उबग आणणारे आलिशान प्रासादातले बेगडी कौटुंबिक जिव्हाळे या सर्वांचा सुखद अभाव त्यात प्रकर्षाने जाणवला!

एक आमिरखान सोडल्यास एकही सुस्थापित 'स्टार' चेहरा यात नाही. पण म्हणून या बाकीच्या अपरिचित तार्‍यांची प्रभा काही कमी नाही. सगळ्यात प्रभावी तारा तर 'ईशान' (दर्शिल सफारी) आहे. या मुलाची या भूमिकेसाठी निवड करून आमिरखानने 'पर्फेक्ट निवड' म्हणजे काय याचं एक उत्तम उदाहरणच समोर ठेवलंय. हाही चेहरा पूर्वी कुठे पाहिल्याचं स्मरणात नाही...त्याच्या ट्प्पोर्‍या डोळ्यांत अनेक भाव उमटतात...डोळ्यांनी हा मुलगा बोलतो! त्याच्या ओठातून पुढे झुकलेले आणि ठळकपणे दिसणारे सशासारखे दोन दात त्याचा तिसरीतल्या मुलाचा अबोध आणि निरागस चेहरा पूर्ण करतात. अभिनय तर त्याने लाजवाब केलाय. कित्येकदा त्याच्या टपोर्‍या डोळ्यांतलं पाणी आपल्याही डोळ्यांतनं कधी पाझरू लागतं आपल्यालाच कळत नाही!

कोणी सांगा सुख म्हणजे काय असतं?

दोन जुळ्या मुली. सारखाच पोषाख, सारखीच चप्पल, अगदी केशभूषाही सारखी. एक आजीबाईंच्या कडेवर तर दुसरी वडिलांच्या. पती-पत्नी, सासू-सासरे आणि दोन जुळ्या मुली असा हा संपूर्ण परिवार पोहचलां होता, एका भव्य प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारावर.

उपासमार

मेसचा डबा खा‌ऊन संपला तेव्हा आपण अंमळ जास्तचं जेवल्याची जाणीव त्याला झाली. काल अर्धवटं राहिलेली एक कथा वाचून संपवली तेव्हा खूप काही चांगलं वाचल्याच्या तृप्तीनं त्याचं मन भरून आलं. त्याला कुणाशीतरी बोलायची तीव्र इच्छा झाली.

रूम पार्टनर अभ्यासाचं पुस्तक समोर धरून फोनवर बोलण्यात मग्न होता. त्यानं स्वतः:चा फोन उचलला आणि वाचलेल्या कथेविषयी आता बोलू शकू अशा एखाद्या मित्राचा नंबर शोधू लागला. नंबर डायल करून त्यानं फोन कानाला लावला.
"हॅलो मी बोलतोय."
"अरे वा! बऱ्याच दिवसांनी."
तो मनातल्या मनात म्हणाला हा शेवटचे दोन फोन विसरला वाटतं. विसरणारंच म्हणा कारण दोन्ही वेळेस पठ्ठ्या मीटिंगमुळे "अरे बिझी आहे. नंतर कॉल करतो" या एक वाक्याच्यावर बोलला नव्हता.
"काही नाही रे... सहजंच... कसं चाललयं तुझं?"
"मस्त मजेत... तुझं काय चाललयं?"
"विशेष काही नाही... नवीन काय वाचलंस?"
"सध्या सर्टिफिकेशनची तयारी चालू आहे. या विक‌एण्डला आहेत पेपर."
"ओके..... म्हणजे बिझी दिसतोयस..."
"हो रे... सध्या जरा बिझीच आहे. मी नंतर कॉल करतो तुला"
"ओके. चल बाय."
"ओके. बाय."
दुसऱ्या एका मित्राबरोबरपण असंच काहीसं संभाषण झालं. तो मित्र जिमॅटच्या तयारीत बिझी होता.
त्यानं लॅपटॉप उघडला आणि गूगल टॉक उघडलं. एक मित्र आणि मैत्रीण असे दोघजणं ऑन ला‌इन दिसतं होते. त्यानं मित्राला "हाय" असा मेसेज टाकला आणि उत्तराची वाट बघत तो थांबला. तब्बल पाच मिनिटं वाट बघितल्यानंतर त्यानं मैत्रिणीला तसाच मेसेज टाकला आणि पुढच्या पाच सेकंदातच तिचं स्टेटस "बिझी" दिसायला लागलं. वेदनेची एक तीव्र कळ त्याच्या काळजात उमटली. आपल्याला टाळत तर नसेल ना ती अशी दाट शंका ये‌ऊन त्याची विचित्र तगमग व्हायला लागली.

एका लग्नाची गोष्ट!

लग्न! दाराशी केळीचे खुंट,आंब्याचे टहाळे आणि झेंडूच्या फुलांची तोरणं,पैठण्यांची सळसळ, अत्तराचा दरवळ, करवल्यांचे मिरवणे,भटजींची बोहल्यावरची लगबग, "आता मुलीला आणा... मुलीचा मामा कुठे आहे? " अक्षता, मंगलाष्टका आणि 'तदेव लग्नं..' झालं की 'वाजवा रे वाजवा..' चा इशारा! होमाचा धूर,सप्तपदी, ते ४,५ दा साड्या बदलणे,विहिणींच्या ओट्या,मानपान,रुसवेफुगवे,व्याही भेटी, पंगतीतला आग्रह,जिलेब्यांची ताटे आणि संध्याकाळचे आईसक्रीम!
असं किवा यातलं कोणतंच दृश्य जरी मानहाईमच्या चर्च च्या दाराशी अपेक्षित नव्हतं तरी इतकी सामसूम सुद्धा अपेक्षित नव्हती.३ चा मुहुर्त आणि आम्ही २.३० ला तिथे पोहोचलो म्हणजे वेळेतच होतो. नक्की आजच आहे ना लग्न? अशी शंका येऊन मी हळूच पत्रिका पाहिली. एकात एक गुंतलेली बदाम हृदयं आणि आतल्या पानावर
"आम्ही लग्न करीत आहोत,तरी अगत्य येण्याचे करावे.." अशा अर्थाचा मजकूर! " आमचे येथे श्रीकृपेकरून..." असा मजकूर लग्नपत्रिकेवर वाचायची सवय असलेल्या डोळ्यांना चि. सौ.का. सुझान आणि चि. ख्रिस ने पाठवलेली आपल्या स्वतःच्याच लग्नाची पत्रिका आहे हे मान्य करायला खूप वेळ लागला होता.चर्चच्या आत डोकावून पाहिले,तर तिथेही शांतता!थोडे तिथेच रेंगाळून बाहेर आलो तर समोरच मोनिका!

नकार!

"नकार" किती नकारात्मक शब्द आहे आणि तेवढाच भयानक एखाद्याचे आयुष्य उध्वस्त करून सोडतो तर एखाद्याला आयुष्य जगायचे कसे ते दाखवून देतो. साहजिक चं आहे माझ्या ही बाबतीत असेच काही तरी घडले म्हणूनच तर लिहितो आहे.

प्रेमाच्या सुंदर स्वप्नांतून जागा होतो नाही तोच आयुष्याने त्याचे रंग दाखवायला सुरवात केली. ज्या स्वप्नावर आता पर्यंत जगत होतो ते डोळ्या समोरून धूसर होत चालले होते, मनात नुसती चिडचिड होत होती. काही करून पण ती थांबायला तयार होईल असे वाटत नव्हते. उलट काही केले तर अजून बिघडून परिस्थिती हाता बाहेर जाऊ शकत होती. कारण माजे सगळे बोलणे हे तिला माजे स्पष्टीकरण चं वाटत होते, आणि माला नेमके याच वेळी काही शब्द फुटत नव्हते. माझ्या डोळ्या समोर मात्र तोच दिवस दिसत होता...

मी नवीन कॉलेज मध्ये नुकताच रुळू लागलो होतो, तोच एके सकाळी कूलर जवळ पाणी पीत असताना बाजूला काही तरी हालचाल जाणवली म्हणून बघितले, सडपातळ, मध्यम उंची सावळसर पण उजळ रंगाची एक मुलगी भरभर चालत वर्गात चाललेली, माझ्या कडे बघून जरा तिला धीर आलेला पण तरी न थांबता सरळ वर्गात घुसली, माला ही त्याच वर्गात जायचे होते पण मी उगाच टगळ मंगळ करत राहिलो आणि तिचे वर्गात गेल्या नंतर थोड्याच वेळात मी: "मे आई कम इन" करत वर्गात एंट्री मारली, तर पहिली नजर त्याच मुलीवर थांबली आणि ती ही मलाच पाहत होती एका आश्चर्यचकित नजरेने ! मी मनातल्या मनात इतका सुखा ऊन गेलो होतो की पूर्ण लेक्चर काय होत हे तर माला आजही आठवत नव्हते. आठवत होते ते फक्त तिचे ते निरागस रूप, तिने मला पाहणे आणि मी तिला, क्षण भर मी कुठल्या दुनियेत हरवलो कुणास ठाऊक. लेक्चर संपले आणि मी भानावर आलो, आणि नजर वळली ती थेट तिच्या कडेच. आणि मला प्रत्यय आला की ती ही त्याच नजरेने माझ्या कडे बघत आहे एका परिचित नजरेने. सगळे हळू हळू वर्गांतून निघायला लागले आणि मी एका वेगळ्याच आंतरिक ओढी ने तिच्या कडे चलला गेलो. तिला याची जाणीव होताच थोडे सांभाळून ती तिच्या मैत्रिणींच्या ग्रुप मधून मागेच राहिली. आणि मी तिच्या जवळ पोहोचलो. तोंडातून शब्द निघाले "हाऽऽऽय" ते ही दोघांच्या ही एकावेळीच. मी आजही अजून पण इतका हळहळ तो की, त्या एका शब्दावर माझ्या मनामध्ये खोलवर कुठे तरी असे काही तरी हळू लगते आणि वाटते जणू समुद्रा च्या त्या खळखळत्या लाटा माझ्या मनाच्या किनाऱ्यावर येऊन विरून जात आहेत.

तो दोन लेक्चर मधला वेळ, वर्गाबाहेर खूप वर्दळ, कोणी तरी ओरडले "नेक्स्ट लेक्चर ऑऽफ" आता वर्ग पूर्ण खाली पण मनात मात्र खूप प्रश्न तेच बाहेर पडत होते, नाव, गाव, कुठे राहते इत्यादी इत्यादी, मग त्या वर प्रतिक्रिया आणि त्यावर पुन्हा प्रतिक्रिया अश्या गप्पा चालूच एक-मेकां न बद्दल जाणून घ्यायला दोघे ही उत्सुक, पुन्हा कोणी तरी ओरडले प्लीज कीप रूम व्हेकंट. देअर इज अनदर लेक्चर इन धिस रूम. मग आमची स्वारी बाहेर निघाली कुणी इकडे कुणी तिकडे सगळे विखुरले गेले, नवीनं ओळख झालेले माझ्या कडे वेगळ्याच नजरेने पाहू लागले, आणि मला थोडे ओशाळल्या सारखे वाटू लागले पण आम्हाला मात्र किती बोलू आणि किती नको असे जाले होते. नकळतच आम्ही पायऱ्या उतरून खाली आलो आणि कट्ट्यावर बसून उरलेल्या गप्पा पूर्ण करू लागलो. गप्पा संपताच नव्हत्या आणि माजे तिला आणि तिने मला न्याहाळणे देखील का कुणास ठाऊक अनोळख्या जागी कोणी तरी ओळखीचे भेटले याचा आनंद होत होता की जणू ही ओळख खूप दिवसां पासून ची असल्याची जाणीव होत होती. त्या नंतर मला असे सुखद धक्के मिळतच गेले आणि मी आणि ती जेवढे सुखावत गेलो तेवढेच जवळ ही येत गेलो. या नंतरचे सर्व काही एका स्वप्ना प्रमाणे घडत गेले आणि त्या सुंदर क्षणां मध्ये मी इतका हरवून गेलो की मी माझाच न राहिलो अन मैत्रीच्या त्या नात्यामध्ये विरून गेलो. दोघांनी मिळून कुठली गोष्ट सोडली नव्हती की जी वाटून घेतली नसेल. लेक्चर नोट्स, पासून ते घरून आलेल्या खाऊच्या डब्या पर्यंत, लहानपणा पासून ते अगदी आतापर्यंत सर्व घटना आणि सर्व गोष्टी दोघांच्या एकमेकांना इतक्या पाठ झाल्या होत्या की विषय निघायची सुरवात पुढील सर्व संवाद आपोआप पूर्ण होत असे. माझ्या मना सारखी मैत्रीण मिळाल्यामुळे मी इतका आनंदी होतो की या हून ही जास्त आनंद जर कुठे असतो असे मला जर कोणी सांगितले असते तर मी त्याला वेड्यात काढले असते. त्या मुले या पुढे जायचा मी कधी विचारच केला नाही. कारण... अगदी गौरव जोशींच्या कविते सारखे मला ही वाटू लागले होते "मला वाटायचे तिचे माझ्यावर जिवापाड प्रेम आहे, फक्त विचारायची देरी आहे..."

भेटलेले लेले

हा मजकूर माझ्या ईपत्त्यावर फिरत आला आहे तो तुम्हा मंडळींसाठी करमणूक म्हणून (मनोगतावरील सर्व लेले बंधू-भगिनींची माफी मागून) टंकलिखित करीत आहे. (मूळ मजकूर सुरेश करंदीकर)
आमच्या कॉलेजात दोन लेले होते.