प्रेम ( स्वगत / नाट्यछटा )

खरंच सांगा, खरं प्रेम म्हणजे तरी नेमकं काय हो ?

आपलं संपूर्ण अस्तित्वच सुवर्णमय करुन टाकणारया या प्रेमाची घडणावळच आपल्या अंतःकरणात होत असताना, त्याचं कारण झालेला परिसस्पर्श आपल्याला बाहेर का शोधावा लागतो? स्वतःच्याच नाभीतून उमलणारया स्वर्गीय सुगंधाने वेडावून वणवण भटकणारया कस्तुरीमृगासारखी प्रेमात आपली गत का व्हावी ?

वारी -१०

             सुजित कामावरून आल्यावर घरात प्रवेश करताना एका हातात टपाल आणि दुसऱ्या हातात बराच छापील कागदांचा गठ्ठा घेऊन येत असे.संदेशवहनात इतकी प्रगती झाली तरी अजूनही अमेरिकन लोकांचा विश्वास टपाल खात्यावर आहे याचे कौतुक वाटले.आपल्याकडे मात्र टपालखात्याचे ९०% काम कुरियर सेवेनेच उचलले आहे.यात बहुतेक बँका,निरनिराळ्या कंपन्या यांचा समावेश होतो.एके काळी टपाल दिवसातून दोनदा आणि अगदी वेळच्यावेळी मिळत होते याच्यावर कोणाचा विश्वासच बसणार नाही. लग्न ठरल्यानंतर भावी पत्नीला मी दररोज पत्र पाठवून बेजार करीत असे त्यामुळे नाइलाजाने चार ओळीचे का होईना उत्तर तिला पाठवावे लागे त्या काळात मी पाठवलेले एक पत्र  दुसऱ्या दिवशी तिला मिळून तिने लगेच पाठवलेले उत्तर मला तिसऱ्या दिवशी देण्याचा चमत्कार पोस्ट खात्याने केला आहे. आमच्या पत्रवाचनातील आतुरता जणू टपालखात्याच्याही लक्षात आली होती.दुसऱ्या एका वेळी माझ्या बडोद्यात राहणाऱ्या बहिणीने माहेरपणासाठी घरी आल्यावर आपल्या पतिराजांना पाठवलेल्या पत्रावर सगळा पत्ता बरोबर लिहून बडोदा व पिन क्रमांक लिहिताना तिला कसली एवढी घाई झाली होती कुणास ठाऊक (कदाचित टपालपेटीतून टपाल निघण्याची वेळ झाली असावी) पण त्या जागी तिने फक्त " बी" एवढे एकच अक्षर लिहिले आणि तसेच पत्र पोस्टात टाकले आणि आश्चर्य म्हणजे पत्त्यातील खाणाखुणांवरून पोस्टखात्याने ते बी म्हणजे बडोदा असेल असा तर्क करून ते पत्र बरोबर इष्ट पत्त्यावर पोहचविले  हे आम्हाला कळण्याचे कारण म्हणजे लगेचच दोन तीन दिवसात आमच्या मेव्हण्यांचे एक जाडजूड पकीत आले.खरेतर त्यांचाही बायकोसाठीच्या प्रेमळ शब्दांचा साठा माझ्याप्रमाणेच लग्नापूर्वी लिहिलेल्या पत्रांमध्येच खतम झाला होता असे असताना त्यांच्या त्या जाडजूड पाकिटाचे सर्वांनाच आश्चर्य वाटले पण ते उघडून पाहिल्यावर बहिणीच्या पत्राचे पकीत(अर्थात तिने पाठवलेल्या पत्राचा कागद काढून घेऊन)  त्यात त्यांनी ठेवलेले आणि पाहा कसा बावळटासारखा पत्ता लिहिला आहेस असा शेरा असलेले पत्र त्यात मिळाले.एकेकाळी असे कार्यक्षम असणारे टपाल खाते थोड्याच दिवसात इतके बिघडले की मी एकदा परगावी गेलो आणि परत यायला उशीर होईल अशी तार केली ती मी प्रत्यक्षात शनिवारी घरी पोचल्यावर मिळाली आणि ती वेळेवर न पोचवल्याबद्दल सौ. ने तक्रार करताच हजरजबाबी पोस्टमनने " त्यात शनिवारी पोचत आहे असेच लिहिले आहे ना ? " असा मुंहतोड जवाब दिला.अलीकडे पोस्टखात्याकडे मुदतठेवीव्यतिरिक्त आणखी बऱ्याच गोष्टींच्या विक्रीचेही काम सोपवून शासनानेच त्यांच्या मूळ टपालवितरण कामाकडे दुर्लक्ष करण्यास उत्तेजन द्यायला सुरवात केली आहे.

खवय्यांचं इंदूर

लोक जगण्यासाठी खातात, पण इंदूरचे लोक खाण्यासाठी जगतात, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इंदुरच्या खवय्येपणाचे किस्से सर्वदूर पसरले आहेत आणि या किश्श्यांत कणभरही अतिशयोक्ती नाही हे इथे आल्या आल्या कळतं. त्याचबरोबर खाणं हे वेळेशी बांधील नाही. त्यामुळे खायचं केव्हा हा प्रश्न पडायचं (किमान इंदूरमध्ये आल्यानंतर तरी) कारण नाही.

गाव मनातले

खडकलाट..  नसेल ऐकले तुम्ही पण कर्नाटकातले एक छोटेसे खेडेगाव आहे हे.निप्पणीपासून २५ कि.मी असेल.. माझे आजोळ..

आजोळ- किती जिव्हाळा आहे ना ह्या शब्दात... आज अक्का आणि अण्णांना जाऊन १३ वर्षे झाली पण आठवणी तशाच ताज्या आहेत. दर मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही जायचो. खूप खूप मजा करायचो. 

इये इंदूर नगरी

अस्मादिकांचे वास्तव्य सध्या इंदूर शहरात आहे. काही गावांची नाव उच्चारली तरी अंगावर रोमांच उमटतात. ग्वाल्हेर, इंदूर, अटक, पानिपत ही गावं त्यापैकीच. कारण या गावांना इतिहासाचा स्पर्श आहे. उत्तर दिग्विजय करायला निघालेल्या मराठ्यांच्या फौजांनी नर्मदापार झेप घेताना अनेक ठिकाणी आपल्या पराक्रमाचे झेंडे गाडले. या मोहिमांमधील ही काही गावं. इंदूर हे त्यातले मध्य भारतातील महत्त्वाचे ठिकाण. मल्हारराव होळकरांच्या कर्तृत्वाचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाच्या काळात या या भागाची वाटणी झाली आणि ग्वाल्हेर शिंद्याच्या वाट्याला, इंदूर होळकरांकडे आणि धार पवारांकडे गेले. पण प्रामुख्याने अमराठी प्रांतातील प्रमुख मराठी गावे सांगताना ग्वाल्हेर व इंदूर ही नावं प्रामुख्याने येतात.

(थोडं विषयांतर, सुरवातीला उज्जैन शिंद्यांकडे होतं. पण तेथे महाकालेश्वर (ज्योतिर्लिंग) हा एकच राजा असतो, अशी समजूत आहे. तो इतरांना तेथे राहू देत नाही, असे मानतात. म्हणून शिंद्यांचा राजवाडाही गावाबाहेरच बांधण्यात आला. त्यानंतर त्यांनी तेथून सर्व काही हलवून ग्वाल्हेरला कूच केलं. धार व देवास ही पवारांच्या धाकटी पाती व थोरली पाती यांच्या वाटणीत वेगळी झालेली संस्थानं आहेत.)

त्यापैकी इंदुरात मी रहातो. मराठ्यांच्या विशेषतः पेशवाईच्या काळात उत्तर दिग्विजयासाठी मराठी फौजांनी स्वाऱ्या केल्या. त्यानंतर मराठी सत्ता येथे प्रस्थापित झाल्यानंतर अनेक मराठी कुटुंबे येथे स्थिरावली. त्यानंतरही येत राहिली. अगदी विसाव्या शतकातही रेल्वे खाते वा केंद्र सरकारच्या नोकरीच्या निमित्ताने अनेक कुटुंबे महाराष्ट्रातून येथे आली. स्थिरावली. त्यामुळे मध्यप्रदेशात ठिकठिकाणी मराठी कुटुंबे सापडतात. अनेक ठिकाणी त्यांच्या वेगळ्या गल्ल्या आहेत. इंदूर, ग्वाल्हेर व्यतिरिक्त धार, देवास, महेश्वर, जबलपूर, झाबुआ अशा अनेक ठिकाणी मराठी लोक आहेत.

काळजी करण्यासारखे काय आहे त्यात ???

आधीच जाहीर करतो, इंटरनेट वरून साभार...............

आज फक्त २ गोष्टी काळजी करण्यासारख्या आहेत ......

एक म्हणजे तुमची तब्येत चांगली आहे का तुम्ही आजारी आहेत ?

जर तुमची तब्येत ठणठणीत असेल तर मग काळजी कशाची करता, मस्त जीवनाचा आनंद घ्या .......

एक ढासळलेली अर्थव्यवस्था

अर्थव्यवस्था म्हटले की समोर येते शेअर बाजार, सेन्सेक्स,विदेशी गुंतवणूक, चलनाचे दर, कर्ज, भाववाढ वगैरे वगैरे. पण ह्यात मी ह्याबद्दल काही लिहिणार नाही. इथे आहेत ते फक्त मी एक कॉलेज विद्यार्थी म्हणून माझे अनुभव. आता त्यात पैसे कमावण्याचा संबंध फारच कमी लोकांचा येतो. असतो तो फक्त खर्च. आईवडिलांनी दिलेल्या पैशांचा. कधीतरी लिहिल्याप्रमाणे, आज काल जेव्हापासून नोकरी करतोय तेव्हापासून पैसे हातात असतात. स्वत:चा/घराचा खर्च करू शकतो. अर्थात त्यामुळे उगाच उधळणे करत नाही. पण कधीही पैसे खर्च करताना कमी पडले की वसतिगृहातील अनुभव आठवतात. आजकाल ते दिवस आठवले मन भरून येते. ते होते काही वेगळे दिवस...

भाषा आणि लैंगिक भेदभाव

काल सायंकाळी बायकोबरोबर घराजवळच्याच एका मॉल मध्ये गेलो होतो. तिथे जेवणाचा आस्वाद घेताना शेजारच्या टेबलाकडून एक दोनेक वर्षाची (माझ्यामते) मुलगी (माझ्यामते) धावत आली आणि आमच्या टेबलाशेजारी उभी राहिली. दिसायला एकदमच गोड होती आणि अमेरिकन असूनही आमच्याकडे बघून अगदी हसत खिदळत होती. नाहीतर बहुतांश अमरू बाळे एकदम गोबरी गोबरी पण मख्ख असतात. ट्रेनच्या डब्यात अमरू बाळ असेल तर त्याच्या आई वडिलांखेरीज कुणालाही फारसे कळत नाही पण देसी किंवा चायनीज  बाळ असेल तर ते शेजारच्या डब्यात पण कळते.

" मर्फीचे नियम " - १

    ............... " मर्फीचे नियम " :- बसप्रवास ................

१. जर बाहेर खूप पाऊस येत असेल अथवा खूप थंडी असेल अथवा दोन्हीही असेल............

    तर बसला नक्की उशीर होणार ................

२. जर तुम्हाला बसमधून प्रवास करताना इच्छित स्थळी पोहचण्यास उशीर होत असेल ........

माधुरीची मोहिनी!!!

अहो माधुरीचा नवीन चित्रपट आला ना आज.. आजा नचले!!

कसली भन्नाट नाचली आहे ना माधुरी आजा नचलेच्या ट्रेलरमध्ये!!! मला तर बाबा खूप आवडली. चित्रपट कसाही असो आपण तर जाणार बुवा चित्रपट बघायला. एक माहिती द्यावीशी वाटली ती म्हणजे.. .

बुकमायशो डॉट कॉम वर जा ... त्यावर एकावर एक फ्री आहे हो त्तिकिट करा लवकर बुकिंग पण फक्त आय सी आय सी आय च्या क्रेडिट कार्ड असणार्यानाच संधी !!! मी काही मार्केटिंग नाही करत आहे हो!!