बीएमएम २०१५: निबंध स्पर्धा

माझ्या मनातील अधिवेशन
प्रॉव्हीडन्समधील आपले अधिवेशन तर उत्तमच झाले.  
काही गोष्टी आपल्याला आवडल्या, काही गोष्टी थोड्या वेगळ्या करता आल्या असत्या, काही गोष्टी अधिक करता आल्या असत्या.  

बीएमएम २०१५: बोधचिन्ह आणि घोषवाक्य स्पर्धा (लोगो आणि स्लोगन)

मंडळी,  
कुठल्याही संस्थेचे बोधचिन्ह आणि घोषवाक्य म्हणजे संस्थेचा अभिमान, तिचा इतिहास आणि कर्तृत्व जगासमोर थोडक्यात मांडायची संधी. पुढच्या पिढीला संदेश आणि दिशा द्यायची संधी.  
Dan Brown च्या दा विन्ची कोड पासून शिवाजी महाराजांच्या छत्रपती मुद्रेपर्यंत आणि रेड क्रॉस च्या चिन्हापासून हिटलरच्या स्वस्तिकापर्यंत आतापर्यंत आपण अनेक बोधचिन्हे पाहिली.  
जय जवान जय किसान, गर्जा जयजयकार क्रांतीचा या घोषवाक्यांनी आपण देशभक्ती साठी प्रेरित झालो आणि सागरा प्राण तळमळला सारख्या काव्यांनी आपण हळवे झालो.  

काळे पाणी ---- २

      गो एअरने आमचा प्रवास सुरू झाला तेव्हां १२ नोव्हेंबर उजाडलाच होता व केसरीबरोबर आमचा पहिला दिवसही सुरू झाला.त्या विमानात जवळ जवळ सगळेच प्रवासी वेगवेगळ्या प्रवासी कंपन्यांतर्फे किंवा स्वतंत्रपणेही अंदमानलाच चालले होते हे विशेष.चेन्नईला आमच्या विमानाचा एक थांबा होता .तो बहुतेक चेन्नईत उतरणाऱ्यांसाठी होता.

काळे पाणी -- १

एके काळी काळे पाणी म्हटल्यावर अंगावर भीतीने शहारे उमटायचे पण आता मात्र जो उठतो तो आपण होऊनच काळ्या पाण्यावर जातो. त्यास भरीस घालत असतात, केसरी सारख्या प्रवासी कंपन्या! अर्थातच त्यात जास्त भरणा असतो तो मराठी माणसाचा तेही स्वाभाविकच आहे. कारण मराठी माणसाला ज्यांचा अभिमान वाटतो अश्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तेथील सेल्युलर जेलमध्ये आयुष्यातील ऐन उमेदीचा काळ तेथील अंधार कोठडीत व्यतीत केला नुसताच व्यतीत केला नाही तर तेथील मरणसुद्धा बरे असे म्हणण्यासारख्या हाल अपेष्टांना धैर्याने तोंड दिले. बारीसारख्या निर्दय जेलरला नमवले, त्याने "मि.