नाटाचे अभंग... भाग ४१

४०.जंव हें सकळ सिद्ध आहे । हात चालावया पाय ।
    तंव तूं आपुलें स्वहित पाहें । तीर्थयात्रे जाय चुकों नको ॥१॥
    जंव काळ असे दुरी ठेला । तंव तूं हरिगुण गाय आइक वहिला ।
    मनीं भाव धरूनि भला । न वंचें त्याला चुकों नको ॥धृ॥
    जोडोनि धन न घालीं माती । ब्रह्मवृंदें पूजन यति ।
    सत्य आचरण दया भूतीं । करीं सांगाती चुकों नको ॥३॥
    दशा यौवन बाणली अंगीं । पांगिला नव्हे विषयसंगीं ।
    काम क्रोध लोभ मोह त्यागी । राहें संतसंगीं चुकों नको ॥४॥