४०.जंव हें सकळ सिद्ध आहे । हात चालावया पाय ।
तंव तूं आपुलें स्वहित पाहें । तीर्थयात्रे जाय चुकों नको ॥१॥
जंव काळ असे दुरी ठेला । तंव तूं हरिगुण गाय आइक वहिला ।
मनीं भाव धरूनि भला । न वंचें त्याला चुकों नको ॥धृ॥
जोडोनि धन न घालीं माती । ब्रह्मवृंदें पूजन यति ।
सत्य आचरण दया भूतीं । करीं सांगाती चुकों नको ॥३॥
दशा यौवन बाणली अंगीं । पांगिला नव्हे विषयसंगीं ।
काम क्रोध लोभ मोह त्यागी । राहें संतसंगीं चुकों नको ॥४॥