काय वाट्टेल ते होईल!

अनुवाद वाटतच नाही इतक्या सहजसुंदर भाषेत पु. लं. नी लिहिलेली ही एका अमेरिकेत पोटापाण्यासाठी आलेल्या जॉर्जियन माणसाची आत्मकथा.

जॉर्जियामधल्या लहानश्या खेड्यातून फक्त पडेल ते काम करण्याची तयारी आणि जगण्याचा उत्साह एवढंच भांडवल घेऊन एका ग्रीक बोटीने जॉर्जी आयव्होनिच अमेरिकेत प्रवेशतो. किनाऱ्यावर पोहचण्याआधीच या माणसाने खाण्यापिण्यात आपल्याजवळ असलेले तुटपुंजे पैसे संपवलेले. बोटीत शिरलेला एक टोप्या विकणारा जॉर्जीची नवीकोरी रशियन फरटोपी घेऊन त्याला बदल्यात एक डॉलर आणि दुसरी 'अस्सल अमेरिकन' टोपी देतो. 'अमेरिकेत गुजराण होण्याइतका पैसा' असल्याशिवाय अमेरिकेत प्रवेश करण्याची परवानगी नाही. पण नोटांचे एक बंडल भाड्याने देणारा त्यांच्यातलाच एक माणूस जॉर्जी ला भेटतो आणि हे नोटांचे बंडल दाखवून झाल्यावर परतीच्या बोलीवर एक डॉलर भाड्याने घेऊन जॉर्जी अमेरिकेत प्रवेश करतो.

हास्यास्पद निरिक्षणे

आपल्या आजूबाजूला काही घटना घडतात त्या पाहून काहीवेळा हसु अनावर होते अशा काही घटनांची चर्चा करूया का?


माझे एक निरिक्षण देते.


पूर्वी आमच्या शेजारी एक बाई रहायच्या. त्या व मी कित्येकदा भाजी आणायला जायचो. जाताना त्या कुलूप लावायच्या. कुलूप लावल्यावर त्या लगेच निघायच्या नाहीत. त्या कुलूपाला ३-४ वेळेला हलवायच्या. खडखडखड  खडखडखड खडखड

आव्हान - काही मनोगते - (अज़ून)एक रसग्रहण!!!


कुमार ज़ावडेकरांच्या आव्हानाला मनोगतावरील वीर बाजीरावांसारखे (दीड?) पराक्रमी (की दीड बाजीरावांसारखे वीर पराक्रमी?), रावसाहेब नि जिजींसारखे रथी-महारथी असूनही रसग्रहणाच्या रुपात अज़ून कुणीच आव्हान दिलेले नाही, हे पाहून मला स्वस्थ बसवेना. त्यातून गुरुवारी रात्री स्वयंपाकाची पाळी असली, की माझ्या अंगात अनायसे वीरश्री संचारलेली असतेच. तिचाच परिणाम म्हणून हे काहीतरी लिहितोय. हे रसग्रहण "पाडले" आहे की "झाले आहे" (म्हणजे तात्या अभ्यंकरांना कविता होते, तसे मला रसग्रहण झाले आहे, या अर्थी नव्हे!!) हे माझ्यापेक्षा इतर ज़ाणकारच जास्त चांगले सांगू शकतील. मात्र तरीही, हे जे काही आहे, ते माझ्या(च) साइज़च्या गंजीफ़्रॉकात घट्ट बसवले आहे, हे मात्र आवर्ज़ून नमूद करावेसे वाटते.

सांस्कृतिक राष्ट्रवादाचा धोका

म.टा. मधील खालील लेख वाचनीय वाटला- जरी त्याचे शिर्षक त्यातील विषयाला धरून वाटले नाही तरी...


____________________


सांस्कृतिक राष्ट्रवादाचा धोका -


गोविन्द तळवळकर


मुंबईत मराठी लोकांचा प्रभाव कमी असणे आणि राज्यात मराठी भाषेची चिंताजनक अवस्था असणे या एक प्रकारे वेगळ्या गोष्टी आहेत; तर दुसऱ्या अर्थाने त्या संबंधित आहेत. मुंबईत कित्येक वर्षांपूवीर् विद्वान मराठी प्राध्यापक व लेखक होते; नामवंत डॉक्टर, वकीलही होते. त्यांचा त्यांच्या क्षेत्रात प्रभाव होता. तथापि, मुंबई पूवीर्पासून देशाची आथिर्क राजधानी असताना या राजधानीतील आथिर्क नाड्या गुजराती, पारशी अशांच्या हाती होत्या. युद्धानंतर पंजाबी, सिंधी इत्यादी आले आणि तेही आथिर्क क्षेत्रात पाय रोवून उभे राहिले. आथिर्क नाड्या अन्य भाषिकांकडे असताना मराठी लोकांचा मुंबईवर किती प्रभाव पडणार?

साईबाबा!

नमस्कार,


आज २ आठवडे उलटले शिर्डीला जाऊन साई बाबांचे दर्शन घेऊन. आजहि ती मुर्ती डोळ्यासमोर तशिच दिसते, फ़ार बरें वाटले होते तेव्हा, पण मनात एक सल राहिली.


आज आपल्या भारत वर्षात असंख्य मंदिरे आणि देवालये आहेत, त्यात देवही बरेच आहेत. त्यांच्या दर्शनाला जाणारा जनसमुदायही बराच मोठा आहे. आता तुम्ही म्हणत असाल मी हे का सांगतोय? त्याची कारण असें कि आपल्या मनोगतींपैकि जवळजवळ सगळ्यांनी शिर्डीला भेट दिली असावि. आता आपल्याला माहित आहेच (आपल्याला माहित आहे हे गृहित धरून) कि बाबांच्या दर्शनाला किती संख्येने लोक येतात आणि किती भलिमोठी रांग असते.

ओल्या नारळाच्या वड्या

वाढणी
२ जण

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • ओल्या नारळाचा खव दीड वाटी/स्वादची कोकनट पावडर
  • २ चमचे साजूक तूप
  • अदपाव वाटी दूध
  • १ वाटी साखर
  • साखर बुडेल एवढे पाणी

मार्गदर्शन

मुगाची खिचडी

वाढणी
४ जण

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • दीड वाटी तांदूळ, अर्धी वाटी मुगाची डाळ
  • ६ वाटया पाणी,
  • १ चमचा धनेपूड, ५-६ कडीपत्त्याची पाने, २ चमचे तिखट, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, २ चमचे काळा मसाला,
  • तेल, मोहरी, हिंग, १ चमचा जिरे,
  • २ चमचे साजूक तूप, खवलेले खोबरे , कोथींबिर,
  • २ चमचे चिंचेचा कोळ, १ चमचा गुळ

मार्गदर्शन

अरुण साधूंचा सत्कार

नमस्कार ,


सध्याच महाराष्ट्र साहित्य परिषदेतून ८० व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री अरुण साधू यांच्या सत्कार समारंभाला हजेरी लावून येतोय.


साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावरचा साधूंचा हा पहिलाच जाहीर सत्कार. मसाप चे अध्यक्ष श्री द. मा. मिरासदार कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.

हे दोघे गौतम ऋषी, एकच का वेगवेगळे ?

रामायणात प्रभू रामचंद्रांनी गौतमऋषींच्या आश्रमाला भेट दिल्याचा उल्लेख आहे तसेच गोदावरी नदीचा उगमा बद्दलच्या आख्यायिकेत सुद्ध गौतमऋषींचा उल्लेख येतो . संदर्भा करिता दोन विकि दुवे देत आहे. तर हे दोन उल्लेख असलेले ऋषी एकच का वेगवेगळे ?

राहिलो न अता कुणाचा दास मी - अमिताभ बच्चन

या गजलेच्या विडंबनाचे दीड बाजीराव यांनी केलेले रसग्रहण वाचून आम्ही कमालीचे व्यथित झालो आहोत. कविता कवीकडून लिहून झाली की वाचकांनी आपापल्या मगदुराप्रमाणे तिचे अर्थ काढावेत वगैरे सगळे ठीक आहे आणि 'औदुंबर' चे आमच्या कुळकर्णीमास्तरांनी सांगितलेले विविध अर्थ आम्ही आमच्या वर्गभगिनींच्या पाठमोऱ्या आकृत्या न्याहाळत मनोभावे ऐकलेही होते. पण कोणतीही सांकेतिकता नसताना इतक्या उघडउघड अर्थाच्या कवितेते दी.बा. यांनी एक साईज कमी असलेल्या बनियनमध्ये पोट कोंबावे तसे कोंबलेले अर्थ वाचून आम्हाला मराठी कवितेच्या भवितव्याविषयी काळजी लागून राहिली आहे. आमच्या मते कारकून यांच्या या गजलेइतकी कळायला सोपी गजल गेल्या दहा हजार वर्षांत झाली नाही. दी. बा. यांनी आपल्या कल्पनेचे वारू चौखूर उधळवून कारकून यांच्या करवतकाठी धोतरावर आपल्या नसत्या रसग्रहणाचे डिनर ज्याकेट चढवले आहे. मुळात कारकून यांची ही गजल अभिनयसम्राट मधुशालाकर्तासुत राजमान्य राजश्री अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यावर बेतलेली आहे हे अगदी तात्या अभ्यंकरसुद्धा सांगू शकतील.