हा लेख खरेतर कालच प्रसिद्ध होणे उचित होते, परंतु काही कारणाने जालाशी संपर्क साफ तुटल्याने मी हा लेख काल देऊ शकलो नाही, क्षमस्व!
२८ मे म्हणजे स्वा. सावरकरांची जयंती तर हु. भगवतिचरण व्होरा यांची पुण्यतिथी. दोघेही 'रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले' या विचाराचे होते. दोघेही स्वातंत्र्यप्राप्तीसाठी समर्पित जीवन जगले, दोघांनीही उपेक्षेची तमा न बाळगता आपले व्रत चालूच ठेवले.