काही नोंदी अशातशाच... - २

'कोकणकडा' एवढाच शब्द खरं तर या प्रवासाला जाण्यासाठी पुरेसा होता. पण तेवढंच नव्हतं. त्याहीपलीकडे काही गोष्टी होत्या. पहिली म्हणजे जायचं होतं तो भाग आंबेगाव तालुक्यातला होता. जैववैविध्याच्या दृष्टीने सह्याद्रीच्या रांगा या विश्वातील मोजक्या 'हॉटस्पॉट'पैकी एक. त्यात भीमाशंकरचं अरण्य (सरकारदरबारी ते 'अभयारण्य'ही आहे) महत्त्वाचं. त्याचा थोडा भाग पाहण्याची ही संधी होती. दुसरं कारण होतं डिंभे धरण. कधी तरी एकदा पूर्ण पुनर्वसन झालेलं धरण असं त्याचं वर्णन झाल्याची बातमी वाचली होती. वास्तव अर्थातच वेगळं होतं. निघालो होतो ते धरणाच्या आतल्या गावांमध्येच. जाण्याचं ठरलं तेव्हा थोडी चौकशी केली.

नावात काय आहे ? (भाग १)

"नावात काय आहे? " असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलच आहे. आता काही नतद्र्ष्ट मंडळी हे वाक्य एखाद्या इंग्रजी लेखकाचं आहे, हे म्हणायला कमी करणार नाही. काही तर ठामपणे शेक्सपिअरचे नावही घेतिल. असो. नावात काय आहे, तुकाराम काय अन शेक्सपिअर काय. बाकी आम्हाला शेक्सपिअरशिवाय दुसरा कोणी ठाउक नाही ना  . तसही आजकाल परदेशी (म्हणजे अमेरिका बरं का) लोकांनी काही शोधून काढलं की आमच्या पुर्वजांनी ते आधीच शोधलं होतं, असं म्हणायची टुमच निघाली आहे.

पालक भजी.

वाढणी
तीन माणसांकरीता.

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • पालकाची तिस पाने(शक्यतो मोठी पाने)
  • तळण्यासाठी तेल.
  • एक मोठी वाटी डाळीचे पीठ
  • दोन चमचे तांदळाचे पीठ
  • एक चमचा मैदा(ऐच्छिक)
  • दोन चमचे तिखट, दोन चमचे ओवा, एक चमचा हिंग,एक चमचा हळद
  • चवीपुरते मीठ.

मार्गदर्शन