गाजराची कोशिंबीर

वाढणी
४ माणसांसाठी

पाककृतीला लागणारा वेळ
5

जिन्नस

  • ४ ते ५ मध्यम आकाराची गाजरे
  • कोथींबीर अर्धी जूडी बारीक चिरून
  • दोन हिरव्या मिरच्या चिरून
  • अर्ध्या लिंबाचा रस
  • मीठ
  • साखर
  • दाण्याचा कुट
  • तुप आणि जिरे फोडणीसाठी

मार्गदर्शन

  प्रथम गाजरे खिसून घ्यावीत . नंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथींबीर मिसळावी.

दाण्याचा कुट , लिंबाचा रस , मीठ , साखर घालून मिक्स करून घ्यावे.

फोडणीसाठी तुप गरम करावे नंतर जिरे टाकून तडतडीत फोडणी घालावी.

आजोळजवळचा नळदुर्ग

अज्जाबाबाकडं येऊन चार दिवस झाले. ते नेहमीप्रमाणं कसं गेले कळलंच नाही. दरवेळी आलं की, मी हट्ट अज्जाबाबा नि रंजाकडं बारीकमध्ये सुरू करायची. की- आपण नळदुर्ग पाहायला जाऊ या. पण यावेळी मी कसलाही हट्ट केला नाही. तरी सकाळी-सकाळी रंजाची आंघोळीची लगबग पाहून मला आनंद होईल, असं ती कायतरी करेल म्हणून कुठं जाणीव होती. आठवडी बाजाराचा दिवस असल्यानं तिच तिथं जायची. मला गर्दीत- धुळीत रंजा न्यायची नाही. म्हणून माझी आंघोळ होऊन पण, ती एकटीच जाणार म्हणून माझा चेहरा तसं फुरंगटलेलाच होता. अज्जाबाबानं न्याहरी एका बुट्टीत बांधली. शेजारी लहानी बिंदगी पाण्याची ठेऊन त्याला कापड बांधलं. रंजा ठेवणीतला पोशाख घालून आली.

धागे उभे आडवे..

मनुष्य अनुभवाच्या साठ्यातून वेचून लिहितो म्हणतात. 'म. ला. व्यं. ' (महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व अर्थात पुलं ) च्या लिहिण्यावर इतकं लिहिलं गेलंय की आणखी लिहिणं म्हणजे पांढऱ्यावर (आणखी) काळं करणं..

पण तरीही पुलंचे  वाङ्मय वाचलेल्या वाचकास त्यांच्या लिहिण्यात अटळ पुनरावृत्ती आढळते. तसे पुलं म्हणजे 'उत्कट, भव्य त्या सगळ्यासमोर झुकणारे' - गुण गाईन आवडी, व्यक्ती आणि वल्ली, गणगोत या सगळ्या पुस्तकांतून हा गुण दिसून येतो.

हे सारं साहित्य पुन्हा पुन्हा वाचताना त्यांचे एकमेकांत गुंतलेले धागे मिळाले, त्यांची गाथा -

रुमाल

बालपणापासूनच " रुमालाशी " आपल्या सगळ्यांची ओळख होते. आपल्याकडे बहुतेक सगळेच दररोज रुमाल वापरतात. लहान मूल बालवाडीची पायरी चढते तेव्हा प्रथम ह्याची ओळख होते. त्याआधीही त्याने हा वापरलेला असतो फक्त वेगवेगळ्या स्वरूपात, लाळेरे, दुपटे, इत्यादी. बालवाडीत जाताना त्याच्या शर्टाला/तिच्या फ्रॉकला हा टाचला जातो.  सांगितले जाते की, नाक गळाले तर ह्याने पूस, जेवण झाले की तोंड ह्याला पूस. मुलींचे छान छान नाजूक , मुलांचे साधे पण टिकवू रुमाल. अनेकदा लक्षात येते की, आया आठवणीने रुमाल देतात पण तो न धुता. त्याची खळही काढत नाहीत. बिचारी पोरे.