पत्राद्वारे दासबोध अभ्यासक्रम -आता नेटद्वारे.

//श्री समर्थ //

चैत्र शुद्ध २, शके १९३१

सप्रेम नमस्कार,

नूतनवर्षाभिनंदन!

समर्थ भक्त श्री. द्वा. वा. केळकर यांच्या अभिनव कल्पनेतून आणि श्रीसमर्थांच्या आशीर्वादाने पत्रद्वारे दासबोध अभ्यासक्रमाची उत्तरोत्तर प्रगती होत गेली आणि या हजारो साधक- मुमुक्षुंनी याचा लाभ घेऊन आपली आणि पर्यायानें समाजाची अध्यात्मिक उन्नती साधण्याकडे यशस्वी वाटचाल केली आहे / करीत आहेत.

राजा २

राजा माझ्यापेक्षा २-३ वर्षांनी मोठा होता. त्याला त्याच्या बापाने पहिल्या वर्गात घातले अन हा पहिल्याच दिवशी पळून आला. बापही चिवट ! रोज तो राजाला शाळेत सोडून कामाला जायचा. अन राजा तो गेला की घरी पळायचा. एक दिवस त्याच्या मास्तरीण बाईनं त्याच्या बापाला सांगितलं. झालं बापाचं टक्कुरं फिरलं. दुसऱ्या दिवशी तो राजाला घेउन शाळेत गेला अन कामावर निघून जायच्यासारखं केल.

मन शुद्ध तुझं

मे १९९० मध्ये आमच्या एका ए. डी. ने, भाटिया त्यांचे नांव, सकाळी आंग्ल भाषेतील एक पत्रक माझ्या हाती सोपविले आणि ते स्वतः एम. बी. ए. च्या टिपण्या काढण्यात न बोलता घुसले. त्या पत्रकावरून धावती नजर फिरविली. तो विषय बहुधा त्या वेळेस त्यांना नको असावा. मी माझ्या जागेवर येऊन बसलो. पत्रकाचा विषय सर्वांसाठीच महत्त्वाचा वाटला. त्याचे यथाशक्ति मराठीत भाषांतर केले. मनाला शांती लाभवून देणारी ही गुरुकिल्ली सर्वांना मार्गदर्शक होईल असे वाटते. आपण क्रमशः पाहू...