बोधकथा - ३

बघता बघता थंडी झपाट्याने नाहीशी झाली. उन्हाचा कडाका वाढायला लागला. पाने गळालेली झाडे सत्ता गेलेल्या राजकारण्यांसारखी केविलवाणी दिसू लागली. कोकिळांनी आपला घसा साफ करायला घेतला. उन्हाळा आला की पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार, आणि पर्यायाने आपल्याला पाण्याच्या खेपा चांगल्याच वाढणार या विचाराने ठिकठिकाणच्या गाढवांचे चेहरे उतरले. उन्हाळ्याच्या सुटीत पर्यटकांची झुंबड उडेल, आणि त्यांचे आचरट चाळे बघून आपली करमणूक होईल या विचाराने ठिकठिकाणच्या अभयारण्यातले प्राणी हुशारले. उन्हाळा संपल्यासंपल्या करायचे वर्षा-नृत्य शिकण्यासाठी 'मयूर क्लासेस'मध्ये तरुण मोरांची झुंबड उडाली.

मन शुद्ध तुझं... (४)

स्वतःच्या गरजा वाढवीत बसू नका; अन्यथा स्वतःला भिकाऱ्यासारखे बनवून घ्याल. गरजा कमीत कमी ठेवा आणि राजासारखे राहा. मानसिक शांतता आणि 'ऐहिक सुखाची हांव' या दोन गोष्टी विरुद्ध दिशेने जाणाऱ्या असतात. एक देते मुक्ती तर दुसरी चिंता. निवड तुमची; अर्थात जीवनमुक्ती. गरजा आणि पूर्ती, इच्छा आणि इच्छिताची मालकी या तुमची मनः शांती बिघडवून टाकतील. ऐहिक प्राप्ती आपल्याबरोबर दुःखाचे गांठोडेही आणत असते, हे लक्षात असू द्या. दुसरे म्हणजे इच्छेपोटी उत्सुकता आणि उत्सुकतेपोटी निराशा जन्म घेते. जी सुखदुःखे भोगणे क्रमप्राप्त आहे, ते भोग भोगायचे असतातच. भूतकाळ विसरा;  सदैव वर्तमानात राहा.

राजा ३

५ वीचा निकाल लागला अन राजानं प्रतिज्ञा केली. इंग्रजी बोलायच, अन तेही मराठेसरपेक्षा चांगलं पण आधिच तो "वात्रट" म्हणून प्रसिद्ध आणि गरिबही. कोणता शिक्षक त्याला इंग्रजी शिकवणार ? त्यातच आमच्या गावात केबल आलं. झालं, मानमोडेच्या केबलनं धमाल उडवली. राजा लगेच त्याच्याकडे गेला. म्हणाला, तु मला शिकव, चॅनल सेटींग आणि कनेक्षन. २०० रु महिना पुरेल मात्र रात्री मी केबल रुमला झोपणार.

मानमोडेला लॉटरीच लागली. तो राजाला घेउनच फिरू लागला. रात्रीची झोपायची व्यवस्थाही झाली त्याची.

*******************************************************

मन शुद्ध तुझं... (३)

'मी असे करायला नको होते', 'तसे केले असते तर मी असा झालो असतो-कुठल्या कुठे पोहोचलो असतो' असली पश्चात्तापाची बोलणी विसरा. ते सारे निष्फळ विचार असतात. त्यामध्ये उगाच वेळ आणि आत्मिक शक्ती वाया घालविण्यात काय अर्थ आहे? ज्या गोष्टी जशा घडावयाच्या असतात, तशाच त्या घडतात. प्रत्येक घटनेमागे ईश्वराची काही योजना असते, हे समजून तसे वागण्यातच खरे शहाणपण आहे. चांगल्या वा वाईट प्रसंगी जे वाट्यास आले, ते सुखदुःख शांतपणे उपभोगणे व इतरांनाही शांतता लाभू देणे, हेच शहाणपणाचे असते.