दुःखातून लेखनाची निर्मिती होत असते, का?
शब्द, त्यातून उमटणारा सूर, त्याची तीव्रता, उदास भाव हे सारं
फोलपणातूनच वजनदार रूप धारण करतं.
मनाचा एखादा हळवा तंतू, उग्र रूप धारण करीत सगळे मनच काबीज करतो.
सुख, सुखाचा आनंद, समाधान हे सगळे तात्कालिक.
ते कधी सुरू झालं आणि कधी विरलं, सारच दिवास्वप्न.
दुःखाच्या डोहासारखे सुख कधी साठेल का?
स्वतःच्या पाऊलखुणांचे आभास ठेवून जाणार मनावर पसरलेलं धुकं जणू.
सुख गवसल्याचा जीवनांत असा फारच कमी कालखंड सापडेल,
तरीही त्या वितळत्या, तरल जाणीवेत माणूस गुंतलेला...
पण...