गांधारी (४)

आता उठावं हा मनी विचार आला. नि पावलांना आपोआपच गती मिळाली. जरा बऱ्यापैकी सरसर चालत मरेनावर पोचले. लगेच अंघोळ करून जेवून घेतलं. नि पेरूखाली बाजंवर पायावर ऊन घेत पडले. सुस्ती दाटून आली होती, त्याचा आनंद अवर्णनीय!... मी यात पार विरघळून गेलेली. विरघळून टाकण्याचं सामर्थ्य हिरवाईतल्या सळसळीत - पिवळ्या धम्म कडकडीत ऊनाला निश्चित आहे. बाजंखाली बिल्लो-गबरू-नाकेर नि बाजूला पिलावळ सुस्त लोळत होती. सारी हिरवाईच सुस्तीत लोळण घेतांना जाणवली. मग बराच वेळ मी गाढ गहिऱ्या सुस्तीच्या अधीन मे ही होते.

अर्थाचा विनोदी अनर्थ (गंभीर विनोदी चर्चा : १)

अर्थाचा विनोदी अनर्थ (गंभीर विनोदी चर्चा : १)

अर्थाचा विनोदी अनर्थ या मालिकेत यापूर्वी मी प्रसारमाध्यमांविषयी विनोदी कथा लिहिली होती. आता या नव्या चर्चात्मक विनोदी लेखनात आपल्याला तीन पात्रे भेटतील. कधी तिघेही एकत्र तर कधी दोघे तर कधी एकेकटे.

मिस्टर विनोद विरंगुळे, मिस्टर गंभीर विचारे, मिस चर्चा गुऱ्हाळे ही ती तीन मजेदार व्यक्तीमत्वे.

हा प्रत्यय’च’ हे करू शकतो!

वाक्यातल्या एखाद्या मुद्यावर भर द्यायचा असेल की आपण ’च’ किंवा ’सुद्धा’ असे प्रत्यय वापरतो. मराठी भाषेतल्या या ’च’च्या प्रत्ययाकडे फारसं कुणाचं लक्ष जात नाही. पण हा प्रत्यय ’लई पॉवरबाज’ आहे असं माझं मत आहे. ’कुठल्याही दोन काड्या हलवून चौकोनाचा अष्टकोन करा’ वगैरे असली जी कोडी असतात त्यांत त्या दोन काड्यांमध्ये जी समोरचं दृश्य क्षणार्धात बदलायची ताकद असते तशीच ताकद या ’च’च्या प्रत्ययात असते. वाक्यातल्या वेगवेगळ्या शब्दांना हा ’च’चा प्रत्यय लावला की त्या वाक्याचा अर्थ लगेच बदलतो.

उदाहरणादाखल एखादं अगदी साधं वाक्य घेऊ - ’मुलं प्रश्न विचारून मोठ्यांना भंडावून सोडतात. ’ हे ते वाक्य.

पुत्रप्रेमाच्या उमाळ्याचे 'बळी'


मुख्यमंत्रिपदावरून विलासराव देशमुख आज जाणार, उद्या जाणार अशा अटकळी बांधल्या
जात होत्या. बंडखोर नारायण राणेही गुडघ्याला बाशिंग बांधून होते. दिल्ली वाऱ्या,
पक्षश्रेष्ठींचे "मतपरिवर्तन', विलासरावांवर यथेच्छ टीका अशी सर्व कारस्थाने राणे
करीत होते; पण मुख्यमंत्रिपदाची खुर्ची काही विलासरावांना अंतर देण्यास तयार
नव्हती. विलासी "मुद्रे'ची तिला भुरळ पडली होती. अशातच 26 नोव्हेंबरला
दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला.

गांधारी (३)

शांता-सीताराम माझीच वाट पाहत होते. त्यांची जेवणं आटपली होती. माझ्यापुरता दाळ-भात शिजवून चुलीवर मांडला होता. ऊबदार निखाऱ्यावरचं मायेचं जेवण पाहून भूक खवळली. समोर आलेलं जेवण कधी संपलं कळलं नाही. अंघोळीकरता पाणी कडकडीत तापलेलं होतं. लगेचच अंघोळ आटपली. नि मी पेरुखाल्ची बाज पायावर ऊन येईल अशी ओढून आडवं झाले. जेवण-अंघोळ नि चालण्याची सुस्ती येऊन पापण्या लप लप करत कधी मी झोपेच्या स्वाधीन झाले कळलंच नाही. माझ्या पायावरचं ऊन गेलं तसं गार-गार जाणवून मला गाढ झोपेतनं जाग आली. मग परत माझी बाज ऊनात ओढली नि जरा वेळानं उठू म्हणता-म्हणता सायंकाळ झाली.

भरली मिरची

वाढणी
२ जणांसाठी

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • मिरची नेहमीच्या नाही थोड्या जाड्या स्वच्छ धुवुन, उभ्या चिरून
  • चण्याच्या डाळीचं पीठ -पाव वाटी
  • ओले खोबरं - १ वाटी
  • दाण्याचा कुट-४ चमचे
  • धने -जिरे पावडर, गरम मसाला, लाल तिखट, हळद -१ चमचा प्रत्येकी
  • चिंच-गु़ळ कोळ
  • मीठ - चवीनुसार

मार्गदर्शन
 

कृती :-
वरील सर्व साहित्य एका बाऊल मध्ये घेऊन नीट मिक्स करावे नि उभ्या चिरलेल्या मिरच्यांन मध्ये भरावे.
खालील प्रमाणे भरलेल्या मिरच्या दिसतील

बंगालच्या वाघिणी

स्त्री शक्तीचे प्रतीक असलेल्या देवीची अनेक रुपे आहेत, अनेक अवतार आहेत. मात्र बंगालच्या मुला मुलींना भावलेले देवीचे रूप म्हणजे कालीमाता किंवा दुर्गामाता - हातात शस्त्र घेऊन दैत्याचा वध करणारे हाती शस्त्र धारण केलेले रौद्र रूप. मात्र क्रांतिपर्वात याच देवींचे बालिकारूप पाहायला मिळाले.

सरकारी अधिकाऱ्यांनी वा मानकऱ्यांनी उन्मत्त होऊन जनतेवर अत्याचार करायचे हा जणू इंग्रजांचा शिरस्ताच होता. हिंदुस्थानात यायचे ते सत्ता आणि वैभव उपभोगायलाच, जणू आपल्या आजवरच्या कर्तबगारीचा राणीने केलेला सन्मान! मात्र विसाव्या शतकात क्रांतिपर्व उजाडले आणि चित्र पालटले.

दक्षिण मुंबईतील दांभिक गणंग

26 नोव्हेंबरच्या अतिरेक्यांच्या मुंबईवरील हल्ल्यानंतर मुंबईतील महाराष्ट्रद्वेषी अमराठी समाजाने उचल खाऊन मुंबई महाराष्ट्रापासून तोडून तिचे वेगळे नगरराज्य करण्यासाठी जोमाने प्रयत्न करण्यास सुरूवात केली आहे. मुंबईचे संरक्षण करण्यास महाराष्ट्र शासन असमर्थ आहे असा या समाजाचा दावा आहे. ताजमहाल हॉटेल व गेट वे परिसरात मेणबत्त्या लावून मूक (? ) निषेध करण्यात दक्षिण मुंबईतील हाच समाज अग्रभागी होता. हा उत्स्फूर्त वगैरे निषेध नसून त्यासाठी पद्धतशीर आखणी करण्यात आली होती. हजारो लोकांच्या अंगावर एकाच प्रकारचे टी-शर्ट असणे अथवा प्रचंड मोठ्या आकाराचे बॅनर असणे उत्स्फूर्तपणाचे लक्षण नव्हे.