प्रिय मनोगतींना नमस्कार!
अलीकडेच मला एक विरोप आला. (कदाचित तुम्हांपैकी बऱ्याच जणांना/जणींनाही आला असण्याची शक्यता आहे!)
घटनेच्या ४९-ओ या कलमाबाबतीतला. यानुसार:
भारतीय राज्यघटनेच्या १९६९ कायद्याच्या कलम ४९-ओ अन्वये मतदार मतदान केंद्रावर जाऊन, आपली मतदार म्हणून ओळख पटवून ( यादीतील नाव आणि स्वतःजवळील ओळखपत्राच्या मदतीने), बोटावर खूण करून घेऊन, त्या केंद्रावरील निवडणूक अधिकाऱ्याला असे सांगू शकतो/ते कि "मला कुणालाही मत द्यावयाचे नाही"