आणि एक दिवस दुपारचं जेवण झाल्यावर मामा म्हणाला "चल, कुळकर्ण्यांकडे जाऊ. येतोस?"
उषा, आई आणि उषाची धाकटी बहिण तिघीही घरातच होत्या. मला बघून उषाच्या आईला आनंद झाला. "एवढी सुंदर सुंदर चित्रं काढता, आमच्या या कानवलीच्या तरीचं एखादं चित्र काढा की..." माझ्यासमोर दरवाजाच्या चौकटीला रेलून उभं राहत आई म्हणाली.
उषा मात्र गंभीर चेहऱ्यानं मामाशीच बोलत राहिली. कानवली गावातले प्रश्न, तिथल्या लोकांची दुरावस्था, इत्यादी, इत्यादी. "काका, तुमच्या सारख्यान खरं तर आम्हाला या कामात मदत करायला पाहिजे, निदान मार्गदर्शन तरी"