गांधारी (१)

गांधारी मरेनाला एकदाचं खडतर दणदण जीपचा प्रवास करत आदळले. हुश्श!!! करत इथल्या खोपटीच्या ओवरीत बसले. राहण्याचा इरादा पक्काच होता. इथं दादाची शेती होती. सांज होत आली तसं मला चहा प्यायची हुक्की आली. इतर ऋतूत मी चहाकडं न पाहणारी असल्या कडक गारव्यात हमखास चहाची याद यायचीच. आता चुलीवर चहा मांडायचा होता. शांतानं चूल पेटवून दिली. समोर धाड-धाड चूल पेटली. तसं मी उठले नि पातेल्यात सामग्री टाकून चहा कधी उकळते याकडं टुकूटुकू पाहत होते.

गेले ते दिवस, राहिल्या त्या फक्त आठवणी (भाग ३)

भुलाबाई एक आठवण

" भाद्रपदाचा महिना आला, आम्हा मुलींना आनंद झाला, पार्वती बोले शंकराला, चला हो माझ्या माहेराला. " काही मुली शेजारी भुलाबाईचे गाणे म्हणत होत्या.

मला माझा भूतकाळ आठवला. काळ साधारण १९५० -१९६०. माझ्या लहानपणीचा.

आध्यात्मिक उन्नती (भाग - २)

आणि एक दिवस दुपारचं जेवण झाल्यावर मामा म्हणाला "चल, कुळकर्ण्यांकडे जाऊ.  येतोस?"

उषा, आई आणि उषाची धाकटी बहिण तिघीही घरातच होत्या.  मला बघून उषाच्या आईला आनंद झाला. "एवढी सुंदर सुंदर चित्रं काढता, आमच्या या कानवलीच्या तरीचं एखादं चित्र काढा की..."  माझ्यासमोर दरवाजाच्या चौकटीला रेलून उभं राहत आई म्हणाली. 

उषा मात्र गंभीर चेहऱ्यानं मामाशीच बोलत राहिली.  कानवली गावातले प्रश्न, तिथल्या लोकांची दुरावस्था, इत्यादी, इत्यादी.  "काका, तुमच्या सारख्यान खरं तर आम्हाला या कामात मदत करायला पाहिजे, निदान मार्गदर्शन तरी"

आध्यात्मिक उन्नती (भाग - १)

(अंतोन चेकॉव्ह यांच्या 'द हाऊस विथ द मॅन्सार्ड' या कथेवरून)

माझं आजोळ कोकणातलं. देवगड तालुक्यातलं.  अगदी खास कोकणातलं कोकणपण असलेलं.  लहानपणी उन्हाळ्याच्या सुटीत कोकणात जाताना एसटीनं फोंडा घाट उतरला की कोकणाचा खास दरवळ नाकात शिरायचा आणि कोकण आल्याची मनाची खात्री पटायची. 

दासबोधः पत्रद्वारे अभ्यास

आजच्या ताण- तणावाच्या आणि धकाधकीची जीवनात आपल्याला थोडेसे मनः स्वास्थ्य, आंतरिक समाधान मिळाले तर हवेच आहे. पूजा-अर्चा, व्रत-वैकल्ये करण्यास विज्ञानवादी मन धजवत नाही आणि ते शक्य ही होत नाही.