माझे आजोळ
त्या दिवषी पेपरमध्ये वाचले की गांधीजी नेहेमी म्हणत, "खेड्याकडे चला".
मला माझा भूतकाळ आठवला. तो काळ असावा साधारण १९५० ते १९६० दरम्यानचा. माझ्या मामाचे गांव म्हणजे पहूरजिरे. खामगांवपासून ३५ किलोमीटरवर. परीक्षा आटोपल्या म्हणजे आम्हाला वेध लागायचे ते पहूरला जाण्याचे. एक उन्हाळ्याच्या व दुसऱ्यांदा दिवाळीच्या सुटीत.