माझे हैदराबादमधील प्रशिक्षण-१३

ही २ नवीन तंत्रे अत्ताच अस्तित्वात यायला हवी होती का असे मला राहून राहून वाटले. पण मी काहीही करू शकत नव्हते.माझे अवसान अक्षरशः गळाले होते. घरचेही आता कंटाळले होते. माझे प्रशिक्षण कधी संपतेय ह्याची सगळे चातकासारखी वाट पाहत होते. सध्याची प्रशिक्षण संपण्याची तारीख ६ मार्च होती. मी इतकी वैतागले होते की सरळ नोकरी सोडून निघून जावे इथून असेच वाटू लागले होते. पण मला घरच्यांनी समजावले की इतके दिवस काढले आहेस तर आता अजून थोडे दिवस कळ काढ. मलाही ते कळत नव्हते असे नाही पण मला कंटाळा आला होता एवढे खरे.

महाभारत- नेत्रदीपक वास्तविकता! ( एक वैज्ञानिक दृष्टिकोन )

हजारो वर्षांचा इतिहास लाभलेल्या, माझ्या या भारतवर्षाच्या सांस्कृतिक इतिहासामध्येच नव्हे, तर तात्त्विक, वैज्ञानिक, ज्योतिषी, काव्य, साहित्य, कथा इत्यादी आणि इतर सर्व क्षेत्रामध्ये महाभारत या महाकाव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाश्चिमात्य संस्कृतीचा असाधारण मारा म्हणा किंवा संबंधित सरकारचे उदासीन धोरण म्हणा, कदाचित भारतीयांची कमी होत जाणारी रुची म्हणा, महाभारतासारख्या "यदौछिष्टम् जगत्सर्वम्" ला भारतीय माणूस नव्हे, भारतीय रक्त विसरत आहे.