ही सुद्धा आपली नेहमीचीच गोष्ट आहे बरं! पण थोडीशी नव्या वळणाची.
एक टोपीवाला आपल्या पेटीत बर्याच टोप्या घेऊन शहराकडे टोप्या विकायला निघाला होता. दुदैवाची गोष्ट ही होती की त्याच्याकडे त्या पेटीला लावायला कुलूप काही नव्हते. टोपीवाल्याच्या गावापासून शहरात जाण्यासाठी एक किर्र जंगल पार करावं लागे. त्याच्या आईने सकाळी त्याला भूकलाडू बांधून दिले आणि तो डोक्यावर पेटी घेऊन निघाला.