टर्मिनेटर सीड (भाग - ४)

सतीश सुन्न झाला होता.  रचनाच्या बागेत सतीशनं बघितलेला त्या सुंदर पक्षाचा आणि सरड्याचा अनाकलनीय मृत्यू, रचनाचं विचित्र वागणं, स्वतःला सतीशपासून अलिप्त ठेवणं आणि तिच्या स्पर्शानं कोमेजून गेलेली गुलाबाची फुलं... या साऱ्या घटना आणि संगीताच्या तालावर नाचणाऱ्या दिव्यांप्रमाणे क्षणाक्षणाला बदलणाऱ्या भावनांचा असा खेळ तो आयुष्यात प्रथमच अनुभवत होता.  त्याच्या मनःशक्तीला न पेलवणारा तो खेळ होता.  या आघातांनी तो दुबळा बनत चालला होता. 

घड्याळांचे कोडे/प्रश्न

कदाचित चाणाक्ष मनोगती या प्रश्नाचे उत्तर एका झटक्यात देऊ शकतील, पण तरीही...


आपण घड्याळ विक्री/दुरुस्तीच्या दुकानात कधी गेला असाल, तर कदाचित आपल्याला हे लक्षात आले असेल की दुकानातल्या भिंतीवर लावलेले प्रत्येक घड्याळ वेगळी वेळ दाखवते. थोडक्यात, घड्याळजीच्या दुकानातल्या भिंतीवरील घड्याळांवरून खरी वेळ कळणे अशक्य आहे.

फलज्योतिषातला फोलपणा

फलज्योतिष हे प्रकरण संपूर्णपणे बेगडी आणि पोकळ आहे अशा मताचा मी आहे.  याला महत्त्वाचं कारण म्हणजे ज्या गृहितकांवर हे उभं आहे ती गृहितकंच पूर्णपणे चुकीची आहेत.  यातली  काही गृहितकं आणि त्यांतील चुका खालील प्रमाणे -



  1. गृहितक - आकाशाचे बारा काल्पनिक भाग करण्यात आले आहेत.  ज्यांना राशी म्हटलं जातं.  प्रत्येक ग्रहाची भ्रमण कक्षा या राशींमधून जाते.  त्यामुळे विशिष्ट ग्रह विशिष्ट काळानंतरच विशिष्ट राशीत येतो आणि विशिष्ट काळ त्या राशीत रहातो.  या वास्तव्यात तो विशिष्ट प्रकारची फळं देतो. चूक - मुळात खगोलशास्त्रानुसार राशी बारा नसून तेरा आहेत. तेराव्या राशीचं नाव आहे ऑफीअश्यूस (ophiuchus).  म्हणजेच अमुक ग्रह अमुक वेळेस अमुक राशीत असण्याचं गणितच चुकीचं आहे कारण प्रत्येक ग्रहाला बारा नाही तेरा राशीतून भ्रमण करायला लागतं.  याचाच अर्थ अमुक एका ग्रहाला एका राशीतून जाऊन पुन्हा त्या ठिकाणी यायला तेवढा जास्त वेळ लागतो. अर्थातच विशिष्ट काळी विशिष्ट प्रकारची फळं देण्यासाठी तो ग्रहच त्या ठिकाणी हजर नसतो!

कडधान्याच्या निर्यातीवर बंदी

जीवनावश्‍यक वस्तूंच्या भाववाढीवर उपाय म्हणून केंद्र सरकाराने कडधान्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. काल (गुरुवारी) मंत्रिमंडळाच्या समितीने हा निर्णय घेतला.  गहू आणि साखरेच्या आयातीसाठी खासगी कंपन्यांना परवानगीही देण्यात आल्याचे अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितले. वरील वस्तूंच्या पुरवठ्यात वाढ करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

लग्नः एक अभ्यास


लग्न ठरल्यावर दोघांनी एका गावात असणं यात काही औरच मजा असते!! तुम्ही फ्रिक्वेण्ट्ली भेटू शकता आणि एकमेकांना चांगल्या रितीने समजून घेऊ शकता. त्यामुळे लग्नानंतरचा जो एकमेकांना ओळखण्याचा, एकमेकांच्या वृत्ती, आवड, निवड, स्वभाव, विचार करण्याच्या पद्धती, आणि कुठल्याही गोष्टीवर रीऍक्ट होण्याच्या पद्धती या गोष्टी जाणून घेण्याचा काळ कमी होतो आणि तुम्ही डोक्यावर अक्षता पडल्यावर ताबडतोब एका मॅच्युअर आणि १००% परस्पर सामंजस्य असलेल्या, एकमेकांविषयी खूप ओढ आणि आपुलकी निर्माण झालेल्या नात्यामध्ये प्रवेश करता. आणि शिवाय लग्न ठरल्यावर होणाऱ्या बायकोसोबत मनमुराद फिरण्याचा, सिनेमा बघण्याचा, तिच्याशी मनमोकळ्या गप्पा मारण्याचा, तिला स्पर्श करण्याचा, हळूच भुरभुरत्या पावसात तिचे चुंबन घेण्याचा आणि आकंठ तिच्या प्रेमात बुडाल्यावर ती सोबत नसतांना मनाच्या सांदीकोपऱ्यात तिचाच विचार करण्याचा, दिवसभर तिला भेटण्याचा विचार करण्याचा आणि तिच्या फक्त तुमच्यासाठी म्हणून असलेल्या नितळ नजरेचा अनुभव घेण्याचा जो आनंद असतो तो इतर कुठल्याही सुंदर अनुभवांपेक्षा श्रेष्ठ असतो!