नुक्त्याच जाहीर झालेल्या निवडणुकीच्या संदर्भात राजकीय पक्षांच्या गमती वाचायला मिळत आहेत तशाच
त्यासाठी शासनाकडून उचलली जाणारी पावले काय आहेत याविषयीच्या पण हालचाली वाचायला मिळताहेत. या
काळात निवडणूक ही सर्वोच्च महत्वाची बाब असते आणि शासनाच्या दृष्टीने त्यापुढे इतर कोणतीच गोष्ट महत्वाची
नसते, त्याचमुळे आय पी एल भारतातच खेळवण्याचे काही महत्वाच्या व्यक्तींचे मनसुबे पार धुळीस मिळाले त्यापुढे