दुसऱ्याचे मत लक्षात घ्या. कांही व्यक्ती अशा असतात की त्यांचे मतांतर करणे कधॉही शक्य नसते. अशांसाठी आपले श्रम आणि वेळ वाया घालवा कशाला आणि परत शत्रुत्वही विकत घ्या कशाला? त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ देत. योग्यवेळी त्यांना उपरती होईल. आपल्या वाणीवर आणि वागण्यावर नियंत्र्ण असेल, तर मनाला हानी पोहोचणार नाही आणि आपला जीवनप्रवाह स्फटिकाप्रमाणे नितळ राहील.