'हिंदी' ही भारताची राष्ट्रभाषा(कागदोपत्री फक्त!), पण तामिळ,कन्नडा,तेलुगू,मल्याळम ही नकाशाच्या दक्षिण भागातील मंडळी मात्र 'हिंदी' बोलणे आणि 'हिंदी बोलता येणे' हा अक्षम्य अपराध का समजतात हो? १४ प्रांतीय भाषा असलेल्या भारतात सामाईक भाषा म्हणून हिंदी वापरली जावी,पण प्रत्यक्ष आज स्थिती काय आहे? कामात आंग्ल भाषा अपरिहार्य, पण बाहेर भेटल्यावर, अनौपचारीक मेळाव्यातही दाक्षिणात्य मंडळी फक्त आंग्ल भाषा बोलतात. आणि 'मला हिंदी येतच नाही. आंग्ल आणि माझी भाषाच येते फक्त' हे सांगताना त्याना 'देशाची राष्ट्रभाषा येत नाही' याची शरम नसून 'आम्ही आंग्ल भाषा उशापायथ्याशी ठेवून असतो सारखे' याचा अभिमान असतो. याची पराकाष्ठा म्हणजे नवरा बायकोशी आणि मुलांशी चार चौघात आंग्ल भाषेत बोलतो.दाक्षिणात्यांनी आपल्या(यंडूगुंडू)मातृभाषेचा अभिमान जरुर ठेवावा, पण त्यामुळे एका परदेशी माणसाच्या डोळ्यासमोर 'इंग्रज गेले तरी अजूनही आंग्लभाषा भारताची राष्ट्रभाषा आहे आणि इंग्रजाचा पगडा भारतावर आहे' हे चित्र उभे करुन देऊ नये.
आमचाच एक तामिळ बंधू(???'दुर्बंधू' असा एखादा मराठी शब्द तयार करावा का?) बाहेर मित्रांच्या घोळक्यात पण शब्दमात्रही हिंदी का बोलत(आणि ऐकून घेत) नाही, यावर कालच २ हिंदी आणि एका मराठी माणसाची चर्चा ऐकली. आणि त्यातल्या मराठी माणसाचे म्हणणे असे होते कि 'दाक्षिणात्य हिंदीला राष्ट्रभाषाच समजत नाहीत. जवळजवळ हिंदी भाषिक आहेत तितकेच जगात तामिळ भाषिक आहेत. सिंगापूर, थायलंड, श्रीलंका, इंडोनेशिया सगळीकडे तामिळ लोक आहेत. त्यामुळे ते हिंदीला आवश्यक भाषा मानत नाहीत.' (वा!मराठी माणसाच्या पडखाऊपणाचे हे उत्तम उदाहरण म्हणता येईल.तामिळ देशबंधू सगळीकडे फक्त साहेबाची भाषाच बोलतो आणि इतरांनी त्याच्याशी फक्त साहेबाच्याच भाषेत बोलावे ही अपेक्षा करतो, आणि त्याला पदराखाली घेणारा 'सहिष्णू' आणि 'समजूतदार' माणूस हा नेमका माझाच मातृभाषाबंधू मराठी माणूस. हा हंत हंत!!)