परवाच "गांधी-सावरकर", "टिळक-आगरकर" व अश्याच इतर गोष्टींवर चर्चा/वादविवाद करीत असताना एक प्रश्न पडला... अनेकांनी अनेक उत्तरे दिली परंतु अजुनही समाधान झाले नाही...
प्रश्न असा की: "इंग्रज भारत का सोडून गेले असावेत?"
- गांधीजींच्या अहिंसावादी सत्याग्रहाने त्यांचे मन द्रवले म्हणून?
- सर्व देशातील, एक झालेली जनता जर आता हिंसक बनली तर इथे आपला टीकाव लागणार नाही असे वाटून?
- कंटाळून?
- हा देश सोडण्यात त्यांचा काही फायदा होता म्हणून?
का इतर काही कारणे आहेत? मनोगतींचे काय म्हणणे आहे?