वानवा - शब्दाचा स्रोत काय?

ऋषीचे कूळ आणि नदीचे मूळ शोधू नये असे म्हणतात, पण एखाद्या भाषेत विशिष्ट शब्द कसा आला याचा शोध घेणे रंजक असते. मराठीतील बहुतेक शब्द तत्सम किंवा तद्भव (संस्कृतातून जसेच्या तसे किंवा थोड्याफार फरकाने आलेले) आहेत; पण काही शब्द थोड्या वेगळ्या प्रकाराने मराठीत समाविष्ट झाले आहेत.

मुद्रिका-रहस्य - ६

मुद्रिका-रहस्य - ६


पंचमीच्या दिवशी राजाचा वेष धारण केलेला धुंडिराज आपला रथ घेऊन पहाटेच सिद्धयोगी आश्रमाकडे निघाला. बरोबर सारथी नव्हता. वाटेवर चतुराक्ष सारथ्याचा वेष करून उभा होताच. त्यानं आपलं स्थान ग्रहण केलं आणि थोड्याच वेळात ते मठात पोहोचले. मठात सिद्धयोगी अजून आलेले नव्हते. धुंडिराज याच संधीची वाट पहात होता. तो आत गेला आणि आता रहस्याच्या तळापर्यंत पोहोचण्यासाठी काय करावं याचा विचार करत असतानाच शेजारच्या दालनातून मायाचा स्वर ऐकू आला, "काय धुंडिराज, कसं काय चाललंय?"

वसंतराव,पु.ल - आठवणी

डॉ.वसंतराव देशपांडयांच्या काही आठवणी खाली देत आहे.


ही वसंतरावाबद्दलची आठवण 'पु.ल' नी लिहिलेली आहे.ती बहुतांशी पु.लंच्या शब्दातच देत आहे.

डॉ.वसंतराव देशपांडयाच्या एका मैफिलीत एक बुजुर्ग गायकबुवा पहिल्या रांगेतच बसले होते. पूर्ण मैफिलीभर त्यांच्या चेहऱ्यावर 'नुकतेच तीर्थरुपांचे और्ध्वदेहिक उरकून' आल्यासारखे भाव होते. गाणं संपल्यावर आंत येऊन,ते बुवा खवचटपणे वसंतरावांना म्हणाले "अरे वसंता, तू आताशा चांगला गायला लागलास की!"
वसंतराव म्हणाले 'बुवा, मी सुरवातीपासून चांगलाच गातो, तुम्हाला चांगलं गाणं आता कळायला लागलय !!

मुद्रिका-रहस्य - ५

मुद्रिका-रहस्य - ५


धुंडिराजाच्या हातापायातलं अवसानच गेलं. तो लपूनछपून आल्याचं मायाला समजलं की काय? पण ती तर मघापासून वारा घालतेय. मग तिला कसं समजलं? काही का असेना, आता ही जागा लवकरात लवकर सोडण्यात शहाणपण आहे. लगेचच एका ठिकाणी दोरीचा फास अडकवून तो भिंतीच्या आधारानं खाली उतरू लागला. तेवढ्यात त्याला कुणाच्या तरी कण्हण्याचा आवाज आला. कुणा व्यक्तीचा केविलवाणा आवाज -शकुंतले, शकुंतले - तो आवाज कुठून येतोय याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न धुंडिराजानं केला पण ते त्याला जमलं नाही. मठात पुन्हा प्रवेश करणं त्याक्षणी तरी शक्य नव्हतं.

खाद्य-उखाणे..

प्रिय मनोगती,
उखाण्यांचा एक नवीन प्रकार म्हणून 'खाद्य-उखाणे' ही संकल्पना मांडत आहे. यात नवीन उखाणे सुचवावेत.
अट एवढीच की हे उखाणे खाणे व इतर संबंधित विषयातील ( उदा.स्वयंपाक,स्वयंपाकघर,पाककृती,पदार्थ,चव..इ ) असावे.
खाणे-पिणे हा विषय असल्याने पिण्यात फक्त घरगुती खाद्यपेयांचाच उल्लेख असावा. (उदा. कढी,लस्सी,सार,सरबत,नारळपाणी.. इ)  मद्य व मद्यपान हे विषय (पूर्णपणे वर्ज्य! )म्हणून टाळावेत.

लंडनमध्ये उत्तरायण

महाराष्ट्र टाईम्स मधे हे वाचायला मिळाले. श्वास नंतर मराठी चित्रपट पुन्हा आंतरराष्ट्रीय महोत्सवात जात आहे हे वाचून आनंद झाला. आपल्याला ह्यावर चर्चा करता यावी म्हणून ही बातमी येथे उतरवून ठेवत आहे.


मूळ बातमी : लंडन फिल्म फेस्टिवलमध्ये 'उत्तरायण'पर्व!

अनिवार्य मराठी!

ईसकाळ मध्ये ही बातमी वाचून बरे वाटले. ह्यावर मराठीत चर्चा करता यावी ह्या हेतूने ती बातमी येथे उतरवून ठेवलेली आहे.


मूळ बातमी : दैनंदिन कामकाजात मराठीच वापरा!
अतिरिक्त आयुक्तांचा आदेश
सकाळ वृत्तसेवा

माझीही हायकु (शीघ्रकवी)

एक होता कावळा, झाडावरती  बसलेला


बसून बसून थकून गेला


आणि मग उडून गेला.


 


 


 

चीनी कोंबडी रस्सा (चीकन मंचूरीयन)

वाढणी
४ जणांसठी

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • १/२ किलो कोंबडीचे मांस (शक्यतो हाड विरहीत).
  • लसूण १०-१२ पाकळ्या.
  • २ हिरव्या मिरच्या.
  • १ इंच आल्याचा तुकडा
  • २ अंडी.
  • मक्याचे पीठ १/२ वाटी.
  • तांदळाचे पीठ १/२ वाटी.
  • मीठ चवी नुसार.
  • १ भोपळी मिरची.
  • तेल तळ्ण्यासाठी
  • सोया सॉस चवी नुसार.
  • तिखट गोड टोंमॅटो सॉस चवी नुसार.

मार्गदर्शन

पुर्व तयारीः

मुद्रिका-रहस्य - ४

मुद्रिका-रहस्य - ४


"हं, तीच ती. मेनकेनं सोडलेली. मी तिचं पालन पोषण केलं, तिला वाढवलं. तो ढोंगी विश्वामित्र. स्वत:ला ऋषी म्हणवतो. राजाकडे जाऊन यथेच्छ धन उकळतो पण स्वत:ची एक मुलगी नाही सांभाळता आली. हल्लीच एका यज्ञाच्या वेळी भेटले होते. मी शकुंतलेचा विषय काढला. म्हटलं मुलगी आता मोठी झालीय, तिचं लग्न करायचंय, पैसे द्या. तर म्हणाले मी तर तो प्रसंग केव्हाच विसरलोय. ती आता माझी नाही, तुमचीच मुलगी आहे. मी म्हटलं "ऋषी असून लाज नाही वाटत? मेनकेबरोबर मजा करायला तू आणि मुलं सांभाळायला आम्ही काय? मारे तप:श्चर्येचं ढोंग रचतो पण बाई दिसली की पाघळलाच! मी इथं वर्षानुवर्ष आश्रम चालवतोय. एकही प्रकरण घडलं नाही. पण, धुंडिराज तुम्हीच सांगा, ह्या बाहेरून येणाऱ्या लोकांचं मी काय करू? राजा दुष्यंताबद्दल मी बोलत होतो. शकुंतलेशी गांधर्वविवाह करून तो निघून गेला. मी काही काळासाठी बाहेर गेलो होतो. परतलो तर हे समजलं."